शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मध्य प्रदेशात शौचालयावरुन जातीय संघर्ष

By admin | Updated: July 17, 2017 08:43 IST

मध्य प्रदेशातील बुंदेलखंडमधील एका गावात अनुसूचित अनुसूचित प्रवर्गात मोडणा-या लोकांनी असा आरोप केला आहे की, काही बड्या लोकांनी त्यांच्या शौचालयांची मोडतोड केली आहे.

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 17 - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात ""स्वच्छ भारत अभियान"" यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधण्यात यावे, असे आवाहन या अभियाना अंतर्गत देशवासियांना करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील एका ठिकाणी शौचालयावरुन जातीय संघर्ष सुरू झाला आहे. बुंदेलखंडमधील एका गावात अनुसूचित प्रवर्गात मोडणा-या लोकांनी असा आरोप केला आहे की,  काही बड्या लोकांनी त्यांच्या शौचालयांची मोडतोड केली आहे. 
 
""नवभारत टाइम्स""नं दिलेल्या वृत्तानुसार छतरपूर जिल्ह्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर बराखेरा गावातील दलित व पटेल यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दलित समाजातील महिलांनी पटेलांवर असा आरोप केला आहे की, त्यांच्यातील काही जणांनी यासाठी आमच्या शौचालयांची मोडतोड केली कारण शौचालयाचे दरवाजे त्यांच्या घरासमोर आहेत. शौचास जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे मात्र यावरही बंदी घालण्यात येत असल्याचे दलितांचे म्हणणे आहे. 
 
गावातील परिस्थितीबाबत दलित समाजातील लोकांचे असे म्हणणे आहे की, ""पटेल समाजातील लोकं शौचास बाहेर जाण्यासंबंधीही आम्हाला मारहाण करण्याची धमकी देतात. ते आम्हाला शौचालयदेखील वापरू देत नाहीत आणि उघड्यावर जाण्यासही मज्जाव करत आहेत"". 
 
आणखी बातम्या वाचा
 
या तणावाबाबत प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर शनिवारी अधिका-यांचं पथक गावात पोहोचलं जेणेकरुन चौकशी करुन पुन्हा शौचालयाची बांधणी केली जाईल. या गावात प्रजापती समाजातील अर्धा डझनहून कुटुंब आहेत. पटेल समाज हा वरील मागासवर्गीयांमध्ये मोडतो, मात्र परिसरातील समृद्ध व राजकीयदृष्ट्या प्रभावी असा हा समाज आहे.
 
स्थानिक मुकेश प्रजापती यांनी सांगितले की, आम्ही लोकं शौचासाठी आता घराच्या मागील बाजूस मातीच्या भांड्यांचा वापर करत आहोत. गावातील सरपंचही पटेल समाजातील आहे. आमची शौचालयं केवळ यासाठी तोडण्यात आली कारण त्यांचे दरवाजे पटेल समाजातील घरांसमोर आहेत. 
 
तर जिल्हा पंचायत समितीचे सीईओ हर्ष दीक्षित यांनी सांगितले की, प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक तेथे पाठवण्यात आले आहे. शौचालयं का तोडण्यात आली, याचा तपास हे पथक करेल. पथकाचा अहवाल आल्यानंतरच यासंदर्भात प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल.