शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

देशात जातीय दंगली वाढल्या

By admin | Updated: August 3, 2015 02:35 IST

२०१५ या वर्षातील सहा महिन्यांच्या काळात गत वर्षातील याच काळाच्या तुलनेत जातीय दंगलींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या जूनपर्यंत देशात

नवी दिल्ली : २०१५ या वर्षातील सहा महिन्यांच्या काळात गत वर्षातील याच काळाच्या तुलनेत जातीय दंगलींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या जूनपर्यंत देशात जातीय दंगलीच्या ३३० घटना घडल्या, ज्यात ५१ लोकांना आपला जीव गमवावा लागला असून, १०९२ जण जखमी झाले आहेत.केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०१५ ते जून २०१५ या सहा महिन्यांत जातीय दंगलीच्या ३३० घटना घडल्या. २०१४मध्ये पहिल्या सहा महिन्यांत अशा २५२ घटना घडल्या होत्या. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांमधील जातीय दंगलीच्या घटनांमध्ये ३३ जण मृत्युमुखी पडले होते. २०१४ या वर्षभरात देशात ६४४ दंगली घडल्या आणि त्यात ९५ जण मारले गेले, तर १९२१ जखमी झाले होते.भाजपाचे सरकार असलेल्या गुजरातमध्ये गेल्या सहा महिन्यांत जातीय दंगलीच्या २५ घटना घडल्या आणि त्यात ७ जण मारले गेले तर ७९ जखमी झाले. गेल्या वर्षी राज्यात दंगलीच्या ७४ घटना घडल्या होत्या, ज्यात ७ जण मारले गेले होते आणि २१५ जखमी झाले होते. काँग्रेसशासित कर्नाटकात गेल्या सहा महिन्यांत ३६ दंगली घडल्या, ज्यात २ जण मारले गेले, तर १२३ जखमी झाले. या राज्यातील गतवर्षीचा दंगलीचा आकडा ७३ आहे. त्यात ६ जण मारले गेले होते आणि १७७ जखमी झाले होते. महाराष्ट्रात दंगलींची संख्या घटलीभाजपाचे सरकार असलेल्या महाराष्ट्रात गेल्या जानेवारी ते जून २०१५ या सहा महिन्यांच्या काळात सांप्रदायिक दंगलीच्या ५९ घटना घडल्या. यात ४ मारले गेले आणि १९६ जखमी झाले. २०१४ या वर्षी महाराष्ट्रात ९७ सांप्रदायिक दंगली घडल्या, ज्यात १२ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर १९८ जण जखमी झाले होते.