शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अकरा वर्षापूर्वी झाली सायबर सेलची स्थापना

By admin | Updated: February 28, 2016 22:32 IST

जळगाव: सोशल मिडिया, इंटरनेट, फेसबुक आदीच्या गुन्‘ांसंदर्भात राज्यात २००५ मध्ये एकाच वेळी जिल्हा पोलीस मुख्यालय व आयुक्तालयाच्या ठिकाणी सायबर सेलची निर्मिती करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली या सेलचे कामकाज चालते. दरम्यान, जळगाव उपविभागात वर्षभरात सायबर सेलचे फक्त तीनच गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्‘ांचे प्रमाण अधिक असले तरी प्रत्यक्ष तक्रार देण्यासाठी पुढे येणार्‍यांची संख्या अगदीच नगण्य आहे.

जळगाव: सोशल मिडिया, इंटरनेट, फेसबुक आदीच्या गुन्‘ांसंदर्भात राज्यात २००५ मध्ये एकाच वेळी जिल्हा पोलीस मुख्यालय व आयुक्तालयाच्या ठिकाणी सायबर सेलची निर्मिती करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली या सेलचे कामकाज चालते. दरम्यान, जळगाव उपविभागात वर्षभरात सायबर सेलचे फक्त तीनच गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्‘ांचे प्रमाण अधिक असले तरी प्रत्यक्ष तक्रार देण्यासाठी पुढे येणार्‍यांची संख्या अगदीच नगण्य आहे.
जळगाव उपविभागात जिल्हा पेठ, जळगाव शहर, शनी पेठ, एमआयडीसी, जळगाव तालुका व रामानंद नगर आदी सहा पोलीस स्टेशनचा समावेश आहे. २०१३ मध्ये उपविभागात सायबरचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. २०१४ मध्ये मात्र सहा गुन्हे दाखल झाले. जिल्हा पेठला तीन, तालुका, एमआयडीसी व रामानंद नगरला प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. त्यातील जिल्हा पेठचे दोन गुन्हे अद्यापही प्रलंबित आहेत फक्त एक गुन्हा निकाली काढण्यात आलेला आहे. उर्वरित पोलीस स्टेशनच्याही गुन्‘ांचा तपास अद्याप सुरुच आहे.
गेल्या वर्षी २०१५ मध्ये जिल्हा पेठ, एमआयडीसी व रामानंद नगरला प्रत्येकी एक असे एकुण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी फक्त एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्‘ातील दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यात आले आहे तर अन्य दोघं पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रलंबित आहेत.चालु वर्षात दोन दिवसापूर्वी जिल्हा पेठला आणखी एक गुन्हा दाखल झाला त्याचा तपास सुरु आहे. येत्या आठवड्यात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचा तपास सायबर सेलकडेच आहे. त्यात नावे निष्पन्न झालीत तर गुन्हा दाखल होवू शकतो.
सायबर सेलमधून कर्मचारीही घटले
सायबरच्या गुन्‘ांबाबतचा तपास पुर्वी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याकडे सोपविण्यात येत होता.आता पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांनाच त्याचे अधिकार देण्यात आले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेच्या नियंत्रणात असलेल्या सायबर सेलकडे सद्यस्थितीत चार कर्मचारी कार्यरत आहेत. यापुर्वी तेथे सात कर्मचारी होते.त्यातील तीन कर्मचार्‍यांच्या काही महिन्यापुर्वीच बदल्या करण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण अधिक
सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकुर अथवा फोटो अपलोड करण्यासह ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण अधिक वाढले आहे. बॅँकेच्या नावाने फोन करणे अथवा मेसेज पाठवून माहिती घेवून गंडा घालण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र बहुतांश प्रकरणात तक्रारदार पुढे येत नाही,त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे.