शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

समान नागरी कायदा सहमतीशिवाय नाही - नायडू

By admin | Updated: October 27, 2016 02:42 IST

समान नागरी कायदा मागच्या दाराने आणणार नाही आणि सर्वहमती झाल्याशिवाय तो येणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री एम. व्यंकया

नवी दिल्ली : समान नागरी कायदा मागच्या दाराने आणणार नाही आणि सर्वहमती झाल्याशिवाय तो येणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री एम. व्यंकया नायडू यांनी केले. वादग्रस्त विषय भाजप निवडणुकांमध्ये (विशेषत: उत्तर प्रदेश) मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी उपस्थित करीत असल्याचा आरोप नायडू यांनी फेटाळला. तीनवेळा तलाक, समान नागरी कायदा आणि राम मंदिर या विषयांचा वापर भाजप आगामी निवडणुकांमध्ये लाभासाठी करणार नाही तर निवडणुका विकासाच्या कार्यक्रमावर लढवू, असे नायडू म्हणाले. असे महत्वाचे विषय हे निवडणुकीतील फायद्यांच्या चष्म्यातून बघितले जाऊ नयेत, असे सांगून नायडू यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राइक्सला राजकीय रंग दिल्या गेल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळला. तीन वेळा तलाक हा विषय सरकार धार्मिक समजत नाही तर तो लिंग समानतेचा आहे. आम्ही मुस्लिमांच्या प्रश्नांत ढवळाढवळ करीत आहोत, असे म्हणणे चूक आहे. भारतीय संसदेने व राजकीय व्यवस्थेने हिंदू संहिता विधेयक (कोड बिल), घटस्फोट कायदा, हिंदू विवाह कायद्यावर बंदी, हुंड्यावर बंदी, सती प्रथेवर बंदी विधेयके संमत केली, असे त्यांनी म्हटले. समान नागरी कायदा आणण्यासाठी व्यापक एकमताची गरज आहे. समान नागरी कायद्याबाबत विधी आयोगाने प्रश्नावली लोकांनी मते सांगावीत म्हणून जारी केल्याचे नायडू म्हणाले. (वृत्तसंस्था)पाक कलाकारांवर बंदी नाही... पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास सरकारने बंदी घातलेली नाही, परंतु त्यांना कामे देताना चित्रपट निर्मात्यांनी लोकभावनेचा आदर ठेवला पाहिजे, असे नायडू म्हणाले. भारतात इतर देशांतील कलाकारांना काम करण्यास बंदी घालण्याविरोधात मी आहे. परंतु शेजारच्या देशाकडून छुपे युद्ध सुरू असल्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी ही परिस्थितीही लक्षात घेतली पाहिजे, असे व्यंकया नायडू म्हणाले.