शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

खूशखबर; पीएफवरचा व्याजदर सरकार वाढवणार, सहा कोटी कर्मचाऱ्यांना फायदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 05:27 IST

सहा कोटी सदस्यांना लाभ : तीन वर्षात पहिल्यांदाच वाढीचा विचार

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधीवरील (ईपीएफ) व्याजदर २०१८-१९ या वर्षासाठी वाढवून ८.६५ टक्के करण्यात येणार असून, यासंबंधीची अधिसूचना श्रम मंत्रालयाकडून लवकरच जारी केली जाईल, असे केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले. या निर्णयाचा सहा कोटी सदस्यांना फायदा होणार आहे. २०१७-१८ या वर्षासाठी ईपीएफवर ८.५५ टक्के व्याज दिले गेले होते.

फिक्कीने आयोजित केलेल्या खाजगी सुरक्षारक्षकांवरील परिषदेच्या पार्श्वभूमीवर गंगवार यांनी पत्रकारांना सांगितले की, २०१८-१९ या वित्त वर्षासाठी ईपीएफचा व्याजदर वाढवून ८.६५ टक्के करण्यास वित्त मंत्रालयाने नाकारलेले नाही. यासंबंधीचा निर्णय लवकरच अधिसूचित केला जाईल, असा मला विश्वास आहे.

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय फेब्रुवारीमध्येच घेतला आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांत पहिल्यांदाच ईपीएफचा व्याजदर वाढविण्यात येत आहे. श्रममंत्री विश्वस्त मंडळाचे नेतृत्व करतात. विश्वस्त मंडळाच्या निर्णयास वित्तमंत्रालयाची एक शाखा असलेल्या वित्तीय सेवा विभागाने एप्रिलमध्ये सहमती दर्शविली. वित्तमंत्रालयाच्या सहमतीनंतर प्राप्तिकर विभाग आणि श्रममंत्रालय यांनी व्याजदर अधिसूचित करणे आवश्यक आहे. निर्णय अधिसूचित झाल्यानंतर ईपीएफओ आपल्या १३६ क्षेत्रीय कार्यालयांच्या नावे आदेश काढून व्याज सदस्यांच्या खात्यावर जमा करण्यास सांगेल.१५१ कोटींची शिल्लकईपीएफओच्या अंदाजानुसार, २०१८-१९ या वर्षात ८.६५ टक्के दराने व्याज दिल्यानंतर १५१.६७ कोटी रुपये संघटनेच्या कोषात शिल्लक राहतील. ८.७ टक्के दराने व्याज दिल्यास मात्र संघटनेला १५८ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागेल. त्यामुळे संघटनेने ८.६५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे.