शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या गदारोळात आठवडा गेला वाहून

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधी पक्षांच्या गदारोळात वाहून गेला. पहिल्या दिवशीप्रमाणेच शुक्रवारीसुद्धा संसदेच्या दोन्ही

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधी पक्षांच्या गदारोळात वाहून गेला. पहिल्या दिवशीप्रमाणेच शुक्रवारीसुद्धा संसदेच्या दोन्ही सभागृहात ललित मोदी प्रकरण आणि व्यापमं घोटाळ्याचे ढग कायम होते. सरकार आणि विरोधकांमधील कोंडी फुटू न शकल्याने कामकाज ठप्पच राहिले.इकडे विरोधकांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी सकाळी संसद भवन परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमक्ष धरणे दिले.लोकसभेत सतत तिसऱ्या दिवशी गोंधळामुळे कुठलेही कामकाज होऊ शकले नाही. काळ्या पट्ट्या बांधून सभागृहात येऊ नका अशी ताकीद लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दिली असतानाही काँग्रेसचे सदस्य काळ्या पट्ट्या बांधून आले होते. कामकाज सुरू होताच त्यांनी हातात फलक घेऊन नारेबाजी सुरू केली. त्यामुळे काही मिनिटातच अध्यक्षांना कामकाज तहकूब करावे लागले.राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दीक चकमकी उडाल्यानंतर सुरुवातीला दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आले. सकाळी कामकाज सुरू होताच काँग्रेसचे सदस्य प्रमोद तिवारी यांनी आपण ललित मोदीप्रकरणी स्थगन प्रस्ताव नोटीस दिली असल्याचे सांगितले. आणि भाजप नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सत्ताधाऱ्यांनी त्यांना तीव्र विरोध केला. विरोधकांमध्ये पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर आदी केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश होता. गोंधळातच संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी सत्ताधारी पक्षाच्याच सदस्यांनी धरणे दिल्याचे यापूर्वी कधी घडले नसावे अशी टीका केली. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनीही त्यांना पाठिंबा देत सत्ताधारीच सभागृहाचे कामकाज चालू देत नसल्याचे साऱ्या देशाला कळेल, असे सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)