शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

येवला मनमाड रास्त्यावरील शासकीय जागेवरील अतिक्र मणे काढली

By admin | Updated: December 14, 2015 19:11 IST

येवला : येवला मनमाड रास्त्यावरील शासकीय जागेवर कोणतीही परवानगी न घेता अतिक्र मण केलेल्या सुमारे ११० टपरी धारकांना सार्वजनिक बांधकाम व बोओटी विभागाकडून संयुक्त कारवाई करून सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अतिक्र मण काढण्याची मोहीम राबवली.सोमवारी सकाळी ११ वाजता सेवाजानिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमोल पवार, बोओटी विभागाचे ...


येवला : येवला मनमाड रास्त्यावरील शासकीय जागेवर कोणतीही परवानगी न घेता अतिक्र मण केलेल्या सुमारे ११० टपरी धारकांना सार्वजनिक बांधकाम व बोओटी विभागाकडून संयुक्त कारवाई करून सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अतिक्र मण काढण्याची मोहीम राबवली.सोमवारी सकाळी ११ वाजता सेवाजानिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमोल पवार, बोओटी विभागाचे एम.यु.शेख,बी.एम.तांबे यांनी ४० कर्मचार्यासह पोलीस पथकाच्या मदतीने,अतिक्र मण काढण्याची मोहीम सुरु केली.सोबत एक जेसीबी आणि हातोडा व साहित्य घेतलेले कर्मचारी,यांनी रस्त्याच्या मध्यापासून,दोन्ही बाजूला १५ मीटर रेखांकन करून अतिक्र मण काढण्यास सांगितले.अनेकांनी स्वताहून अतिक्र मणे काढली.अपवादात्मक परिस्थितीत जेसीबीने हस्तक्षेप करून वाढीव बांधकामे पाडण्यात आली.गरिबांची अतिक्र मणे पडतात परंतु शहरात व नासिक औरंगाबाद रस्त्यावर धनदांडग्यानी केलेली अतिक्र मणे आपण पाडण्यासाठी हिम्मत दाखवावी अशी प्रतिक्रि या नागरिक व्यक्त करीत होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील ११० अतिक्र मणधारकांना गेल्या मिहनाभरापूर्वी नोटीसा एका तक्र ार अर्जावरून नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.परंतु अतिक्र मण मोहीम या रस्त्यापुरतीच मर्यादित असल्याने अतिक्र मणाच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम प्रशासन,बीओटीचे अधिकारी व पालिका प्रशासन केवळ कागदोपत्री कायदेशीर कार्यवाही करून केवळ कागदावर असणारे सर्वांग सुंदर येवला शहर कधी चागले बनवणार? असा सवाल नागरिक करत होते.केवळ गरिबांची अतिक्र मणे काढणार्या सरकारी अधिकार्यांनी शहरातील धनदांडग्याची अतिक्र मणे काढण्याची हिम्मत दाखवावी अशी चर्चा नागरिक करीत होते.सध्या मनमाड येवला कोपरगाव रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूस शासकीय जागेवर बेकायदेशीर बांधकाम करून अतिक्र मण करणार्या ११० टपरीधारकानी सार्वजनिक बांधकाम खात्याची अथवा शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती .त्यामुळे हे अतिक्र मण बेकायदेशीर असल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमा प्रमाणे त्यांना मिळालेल्या नोटीसी च्या दिवसापासून सात दिवसाच्या आत अतिक्र मण काढून सरकारी जमीन मोकळी करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कळविण्यात आले होते.अतिक्र मण न काढल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ते अतिक्र मण हटवले जाईल. व होणार्या नुकसानीस बांधकाम खाते जबाबदार राहणार नाही तसेच अतिक्र मण केलेल्या सामुग्रीस संरक्षण देण्यात येणार नाहीत व ते बेवारस टाकण्यात येईल, अतिक्र मण काढण्यासाठी येणारा खर्च अतिक्र मण धारकाकडून वसूल करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सांगण्यात आले होते.ध्वनीक्षेपक फिरवून येथील अतिक्र मण धारकांना या बाबत पूर्वकल्पना देण्यात आली होती.यापूर्वीहि येवला मनमाड रस्त्यावर अतिक्र मण हटविण्याची मोहीम राबविली गेली. परंतु पुन्हा पुन्हा अतिक्र मणे होतच राहतात. याचा वाहतुकीला अडथळा होतो. कोणीतरी अतिक्र मणाच्या विरोधात अर्ज करावा, आणि त्यानंतर सार्वजानिक बांधकाम खात्याने तात्पुरती मलम पट्टी करण्यासाठी नोटीसा काढाव्यात. तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो अशी परिस्थिती बांधकाम विभाग व टपरीधारकामधे निर्माण झाली होती.याशिवाय अतिक्र मण मोहीमेचा फार्स सुरु झाला कि राजकीय हस्तक्षेप अपेक्षति असतो. केवळ येवला मनमाड रस्ताच नाही तर शहरात व कॉलोनी भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्र मणे झाली असल्याचे चित्र आहे. परंतु जोपर्यत कोणाची तक्र ार येत नाही तो पर्यत प्रशासन मग ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे असो बीओटी ,किंवा नगरपालिकेचे असो घटनाक्र म असाच असतो. याचा सातत्याने अनुभव येवला शहरवासीयांनी घेतला आहे.आता अतिक्र मणे काढली गेली असली असली तरी पुन्हा अतिक्र मण होणार नाही याची काळजी संबंधित अधिकारी घेतील काय?

बेकायदेशीरपणे कोणीही अतिक्र मणे करावीत आणि ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी डोळेझाक करावी,झालेल्या अतिक्र मणाबाबत त्रयस्त माणसाने तक्र ार करावी आणि त्यानंतर जबाबदार अधिकार्यांनी कारवाई करण्याचा फार्स करावा हे नित्याचे झाले आहे.अधिकारी स्वताहून बेकायदेशीर कामाला पायबंद घालण्याची मानिसकता जो पर्यंत ठेवत नाही तोपर्यंत अतिक्र मणाचा विळखा पडतच राहणार.