शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

दस्तऐवज नोटरी करण्याऐवजी स्व-साक्षांकनास प्रोत्साहन द्या!

By admin | Updated: July 16, 2014 02:01 IST

विविध सरकारी कामांसाठी लागणाऱ्या दस्तऐवजांचे नोटरीकडून अथवा राजपत्रित अधिकाऱ्याकडून साक्षांकन करून घेण्याऐवजी अर्जदाराने अशा दस्तऐवजांचे स्व-साक्षांकन

नवी दिल्ली : विविध सरकारी कामांसाठी लागणाऱ्या दस्तऐवजांचे नोटरीकडून अथवा राजपत्रित अधिकाऱ्याकडून साक्षांकन करून घेण्याऐवजी अर्जदाराने अशा दस्तऐवजांचे स्व-साक्षांकन (सेल्फ अ‍ॅटेस्टेशन) करण्याच्या पद्धतीस प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारने ठरविल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.दस्तऐवज नोटरीकडून किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांकडून साक्षांकित करून घेण्याच्या सध्याच्या नियमांचा फेरआढावा घ्यावा आणि शक्य असेल तेथे स्व-साक्षांकनाची सोय करावी, असे केंद्र सरकारने राज्यांना कळविले असल्याचे केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि लोकगाऱ्हाणी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.हा अधिकारी म्हणाला की, दस्तऐवज साक्षांकित करून घेणे किंवा त्यांच्या पुष्ट्यर्थ प्रतिज्ञापत्र करून घेणे हे फार वेळकाढू व किचकट काम आहे. नोटरीकडून साक्षांकन करून घेण्यासाठी लोकांना १०० ते ५०० रुपये खर्च करावे लागतात. शिवाय ताडून पाहण्यासाठी पुरेशी व सर्व मूळ कागदपत्रे हजर केल्याशिवाय बहुतांश राजपत्रित अधिकारी साक्षांकन करीत नाहीत. ग्रामीण भागांत व दुर्गम भागांमध्ये तर लोकांची खूपच अडचण होते. त्यामुळे राज्य सरकारांनी स्व-साक्षांकनाला प्रोत्साहन दिले तर नागरिकांची खूपच सोय होईल, असेही हा अधिकारी म्हणाला. या संदर्भात उपर्युक्त केंद्रीय विभागाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या आॅफिस मेमोमध्ये म्हटले आहे की, लोकांना सरकारी कामांसाठीच्या अर्जांसोबत सुरुवातीस स्व-साक्षांकित दस्तऐवज सादर करू दिले जावेत व सरते शेवटी मूळ कागदपत्रे सादर करण्यास सांगून साक्षांकित दस्तावेजांची सत्यता पडताळून पाहिली जाऊ शकेल. स्व-साक्षांकनाची पद्धत लोकोपयोगी असून राजपत्रित अधिकारी किंवा नोटरीकडून साक्षांकन करून घेण्याला खर्च येतो, एवढेच नाही तर हे करण्यासाठी नागरिक व राजपत्रित अधिकाऱ्यांचा वेळही वाया जातो. मात्र ज्या कामांसाठी नोटरी केलेले दस्तऐवज सादर करणे कायद्यानेच बंधनकारक असेल अशा कामांसाठी स्व-साक्षांकनाची पद्धत लागू केली जाऊ शकत नाही, असे या मेमोमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)