शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

केंद्र सरकारवर कर्मचाऱ्यांचा दबाव

By admin | Updated: July 5, 2016 04:20 IST

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींबाबत नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेला निर्णय लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मान्य नाही. देशातले ४७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५0 लाख पेन्शनर्समधे सरकारचा

- सुरेश भटेवरा , नवी दिल्ली

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींबाबत नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेला निर्णय लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मान्य नाही. देशातले ४७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५0 लाख पेन्शनर्समधे सरकारचा निर्णय फील गुड वातावरण निर्माण करेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात हा निर्णय प्रत्यक्षात केंद्र सरकारच्या अंगलट आला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी या निर्णयाच्या विरोधात ११ जुलै रोजी देशव्यापी संप करण्याची धमकी दिल्यानंतर, मोदी सरकार दबावाखाली आले असून, कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाशी सरकारने सोमवारी झटपट चर्चेला सुरुवात केली. निर्णय घेण्यासाठी सरकारकडे आता अवघे सहा दिवस उरले आहेत. या काळात वाटाघाटींना कोणते मूर्त स्वरूप मिळते, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.प्राथमिक बैठकीनंतर प्रतिनिधी मंडळातले एक कर्मचारी नेते आॅल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे महासचिव शिवगोपाल मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले की चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे मात्र बंद खोलीतील वाटाघाटींबाबत सरकारवर किती विश्वास ठेवावा, असा आमच्यापुढे प्रश्न आहे. एक तर सरकारने लेखी स्वरूपात कर्मचाऱ्यांना आश्वासन द्यावे, अन्यथा आपली भूमिका स्पष्ट करणारी अधिसूचना सार्वजनिकरित्या जारी करावी, असे आमचे म्हणणे आहे. वेतनवाढीच्या निर्णयाच्या विरोधात केंद्रीय कर्मचाऱ्यांनी ११ जुलैपासून संप जाहीर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि गृहमंत्री राजनाथसिंग यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाला चर्चेसाठी बोलावले. चर्चेच्या पहिल्या फेरीत कर्मचाऱ्यांनी मुख्यत्वे दोन प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या. पहिली मागणी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ७ हजारांवरून थेट २६ हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी असून, दुसरी मागणी नव्या पेन्शन व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या तिढ्याची चिंता सरकारने विनाविलंब दूर करावी, ही आहे. प्राथमिक चर्चेनंतर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन वाढवण्याच्या मागणीचा विचार एका विशेष समितीकडे सोपवण्याचा प्रस्ताव सरकारने या प्रतिनिधींसमोर ठेवला. समितीच्या निर्णयासाठी कालबद्ध मुदत निश्चित करण्याचे आश्वासनही दिले. ...तर माघार घेतली जाईल- केंद्र सरकारच्या तोंडी आश्वासनावर मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाचा विश्वास नाही. सरकारने आम्हाला लेखी आश्वासन द्यावे अथवा अधिकृत अधिसूचना जारी करावी, तरच संप मागे घेण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे कर्मचारी नेत्यांचे म्हणणे आहे. - सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाला सरकारने सोमवारी आश्वासन दिले की किमान वेतनवाढ आणि नव्या व्यवस्थेत कर्मचाऱ्यांना पेन्शनविषयी वाटणाऱ्या चिंतांचा सर्वंकष विचार करण्यासाठी लवकरच एक समिती नियुक्त केली जाणार आहे. - आता दोन्ही पक्ष पुढचे पाउल काय उचलतात? यानंतर उभय पक्षात मुळात चर्चा होईल काय? वाटाघाटीतून प्रश्न खरोखर सुटेल काय? की कर्मचारी हरताळाचे शस्त्र उपसतील? असे प्रश्न निर्माण झाले असून सर्वांचे त्याकडे लक्ष वेधले गेले आहे.