शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तणावात भावनिक क्षण घेऊन आली 'समझोता एक्स्प्रेस'

By admin | Updated: September 28, 2016 10:18 IST

उरीमधल्या दहशतवाही हल्ल्यानंतर समझोता एक्स्प्रेस मंगळवारी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचली, त्यावेळी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव प्रवाशांचा चेह-यावर दिसत नव्हता.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर समझोता एक्स्प्रेस मंगळवारी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचली, त्यावेळी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव प्रवाशांचा चेह-यावर दिसत नव्हता. आठवड्यातून दोन दिवस लाहोरहून निघणारी ही एक्स्प्रेस पंजाबहून दिल्ली टर्मिनसला येते. मंगळवारी आलेल्या एक्स्प्रेसमध्ये एकूण 184 प्रवासी होते. यातले 84 प्रवासी हे पाकिस्तानी तर उरलेले सर्व भारतीय होते. गेल्या आठवड्यात उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर यावेळी प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.  मात्र, दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा समझोता एक्स्प्रेसनं प्रवास करणा-यांवर काहीही परिणाम झालेला दिसला नाही. 
 
मेरठमधले रहिवासी मोहम्मद नौशाद कराचीहून येणारा चुलत भाऊ शहजाद कुरेशीला भेटण्यासाठी प्रचंड आतूर होते. 'दोन्ही देशांमधली परिस्थिती तणावपूर्ण आहे. मात्र, टीव्हीच्या माध्यमातून खरे कमी आणि अफवा जास्त पसरवल्या जातात', असं नौशाद यांनी यावेळी  सांगितले.  याचवेळी एक भावनिक क्षणदेखील पाहायला मिळाला. 50 वर्षांचे शहजाद जेव्हा एक्स्प्रेसमधून उतरले, त्यावेळी त्यांनी आपल्या चुलत भावाला मिठी मारली. या दोघांच्या आयुष्यातील ही पहिली भेट. तब्बल 36 वर्षांनंतर पाकिस्तानमधून भारतात आलेले शहजाद याआधी आपल्या भावाला भेटले नव्हते. यापूर्वी मी इथे कधी आलो होतो, हे देखील मला आठवत नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी शहजाद यांनी दिली. 
 
एक्स्प्रेस येताच प्लेटफॉर्म पूर्णतः सामानांनी व्यापून गेले. पाकिस्तानातून आलेल्या लोकांनी आपल्या नातेवाईकांसाठी भरभरुन भेटवस्तूही आणल्या. दरियागंजमध्ये राहणारे मोहम्मद अकील आपल्या भावाला भेटण्यासाठी कराचीला गेले होते. इथून मायदेशी परतताना त्यांनी ब-याच भेटवस्तू भारतात राहणा-या नातेवाईक आणि मित्रमंडळींसाठी आणल्या. उरी दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधली परिस्थिती अस्थिर झालेली असतानाही अकील आपला व्हिसा 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात यशस्वी ठरले. सामान्यांना युद्ध वगैरे काही नकोय, आमच्यासाठी पाकिस्तान घराप्रमाणे आहे, कारण आमचे नातेवाईक त्याठिकाणी राहत आहेत, असेही यावेळी अकील यांनी म्हटले. 
 
काही तास प्लेटफॉर्मवर असेच भावनिक वातावरण होते, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अनेक जण आपल्या नातेवाईकांची भेट घेत होते. काही क्षण हृदयात, डोळ्यामध्ये साठवत होते. 1976 पासून समझोता एक्स्प्रेसची सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर 2001 मध्ये संसदेवरचा दहशतवादी हल्ला आणि 2007 मध्ये पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर ही एक्स्प्रेस थांबवण्यात आली होती.  या दोन घटना वगळता दोन देशांमधल्या सीमेमुळे दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचं काम गेल्या 40 वर्षांपासून ही एक्स्प्रेस आजपर्यंत करत आली आहे.