शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणी-२

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

त्यांनी होकार दिला. परंतु प्रशासनाची दडपशाही यशस्वी ठरली. पोलिसांनी गंगाधररावांना अटक केली. अखेर ती निषेध सभा झालीच नाही. शासनाच्या विरोधातील कुठलीही जाहीर सभा, किंवा कार्यक्रम त्या संपूर्ण आणीबाणीच्या काळात होऊ शकला नाही. नागपूर हे आंदोलनाचे शहर होते. परंतु आणीबाणीच्या विरोधात पाहिजे तसे एकही जाहीर आंदोलन नागपुरात होऊ शकले नाही. काही प्रमाणात शासनाच्या विरोधात आंदोलन झाले परंतु ते भूमिगत नेते व कार्यकर्त्यांनी केले. परंतु त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.

त्यांनी होकार दिला. परंतु प्रशासनाची दडपशाही यशस्वी ठरली. पोलिसांनी गंगाधररावांना अटक केली. अखेर ती निषेध सभा झालीच नाही. शासनाच्या विरोधातील कुठलीही जाहीर सभा, किंवा कार्यक्रम त्या संपूर्ण आणीबाणीच्या काळात होऊ शकला नाही. नागपूर हे आंदोलनाचे शहर होते. परंतु आणीबाणीच्या विरोधात पाहिजे तसे एकही जाहीर आंदोलन नागपुरात होऊ शकले नाही. काही प्रमाणात शासनाच्या विरोधात आंदोलन झाले परंतु ते भूमिगत नेते व कार्यकर्त्यांनी केले. परंतु त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.
समाजवादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व नेते पोलिसांचे प्रमुख लक्ष्य होते. ते जिथे मिळतील त्यांना अटक केली जात होती. सर्वात मोठे संकट प्रेसवर ओढवले होते. आणीबाणीची घोषणा झाली तेव्हा प्रशासनाने सर्वात अगोदर प्रेसला आपल्या ताब्यात घेतले. घनश्याम सक्सेना नावाचे एक पत्रकार व त्यांच्या सोबतीला काही जणांची प्रशासनाने प्रेसवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्ती केली होती. ते पीआयबी कार्यालयात बसायचे. प्रेसमध्ये जे काही छापून येणार आहे, ते त्यांना दाखवायचे होते. प्रत्येक बातमी त्यांना दाखविणे बंधनकारक होते. वर्तमानपत्राच्या कार्यालयात दहशतीचे वातावरण होते. पहिल्या दिवशी वर्तमानत्रात अग्रलेखच छापून आले नाही. मी आपल्या जीवनात इतकी दहशतयुक्त भीती कधीच अनुभवली नाही. परंतु या अनुभवानेच मला लोकशाहीची खरी किंमत समजली.
लोहिया अध्ययन केंद्राचे प्रमुख व ज्येष्ठ समाजसेवी हरीश अड्याळकर म्हणाले, रेल्वेचे देशव्यापी आंदोलन नुकतेच पार पडले होते. त्या आंदोलनातील सक्रिय सहभागामुळे मी तुरुंगात होतो. नुकताच सुटून आलो होतो. त्यामुळे नोकरीवरून बाहेर करण्यात आलेे होते. अशातच आणीबाणी जाहीर झाली. शहरात सर्वत्र कर्फ्यु होता. प्रत्येक रस्त्यांवर पोलिसांचेच साम्राज्य दिसून यायचे. आणीबाणीचा सर्वाधिक प्रभाव प्रेसवर दिसून आला. जे काही लिहायचे आहे, ते अगोदर दाखवावे लागायचे. काहीही छापता येत नव्हते. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गळा घोटण्याचाच प्रयत्न सर्वत्र दिसून येत होता. परंतु कुणालाच काही करता येत नव्हते. जाहीर आंदोलने होत नव्हती. परंतु भूमिगत झालेल्या नेत्यांद्वारे शासनाच्या विरोधात जनमत तयार करण्याचे काम केले जात होते. भिंती रंगविणे, पत्रके वाटून शासनाचा विरोध करणे आदी कामे भूमिगत पद्धतीने सुरू होती. अशा नेत्यांना मदत करण्याचे काम मी तेव्हा करीत होतो, असेही त्यांनी सांगितले.