शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणी-२

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

त्यांनी होकार दिला. परंतु प्रशासनाची दडपशाही यशस्वी ठरली. पोलिसांनी गंगाधररावांना अटक केली. अखेर ती निषेध सभा झालीच नाही. शासनाच्या विरोधातील कुठलीही जाहीर सभा, किंवा कार्यक्रम त्या संपूर्ण आणीबाणीच्या काळात होऊ शकला नाही. नागपूर हे आंदोलनाचे शहर होते. परंतु आणीबाणीच्या विरोधात पाहिजे तसे एकही जाहीर आंदोलन नागपुरात होऊ शकले नाही. काही प्रमाणात शासनाच्या विरोधात आंदोलन झाले परंतु ते भूमिगत नेते व कार्यकर्त्यांनी केले. परंतु त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.

त्यांनी होकार दिला. परंतु प्रशासनाची दडपशाही यशस्वी ठरली. पोलिसांनी गंगाधररावांना अटक केली. अखेर ती निषेध सभा झालीच नाही. शासनाच्या विरोधातील कुठलीही जाहीर सभा, किंवा कार्यक्रम त्या संपूर्ण आणीबाणीच्या काळात होऊ शकला नाही. नागपूर हे आंदोलनाचे शहर होते. परंतु आणीबाणीच्या विरोधात पाहिजे तसे एकही जाहीर आंदोलन नागपुरात होऊ शकले नाही. काही प्रमाणात शासनाच्या विरोधात आंदोलन झाले परंतु ते भूमिगत नेते व कार्यकर्त्यांनी केले. परंतु त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.
समाजवादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व नेते पोलिसांचे प्रमुख लक्ष्य होते. ते जिथे मिळतील त्यांना अटक केली जात होती. सर्वात मोठे संकट प्रेसवर ओढवले होते. आणीबाणीची घोषणा झाली तेव्हा प्रशासनाने सर्वात अगोदर प्रेसला आपल्या ताब्यात घेतले. घनश्याम सक्सेना नावाचे एक पत्रकार व त्यांच्या सोबतीला काही जणांची प्रशासनाने प्रेसवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्ती केली होती. ते पीआयबी कार्यालयात बसायचे. प्रेसमध्ये जे काही छापून येणार आहे, ते त्यांना दाखवायचे होते. प्रत्येक बातमी त्यांना दाखविणे बंधनकारक होते. वर्तमानपत्राच्या कार्यालयात दहशतीचे वातावरण होते. पहिल्या दिवशी वर्तमानत्रात अग्रलेखच छापून आले नाही. मी आपल्या जीवनात इतकी दहशतयुक्त भीती कधीच अनुभवली नाही. परंतु या अनुभवानेच मला लोकशाहीची खरी किंमत समजली.
लोहिया अध्ययन केंद्राचे प्रमुख व ज्येष्ठ समाजसेवी हरीश अड्याळकर म्हणाले, रेल्वेचे देशव्यापी आंदोलन नुकतेच पार पडले होते. त्या आंदोलनातील सक्रिय सहभागामुळे मी तुरुंगात होतो. नुकताच सुटून आलो होतो. त्यामुळे नोकरीवरून बाहेर करण्यात आलेे होते. अशातच आणीबाणी जाहीर झाली. शहरात सर्वत्र कर्फ्यु होता. प्रत्येक रस्त्यांवर पोलिसांचेच साम्राज्य दिसून यायचे. आणीबाणीचा सर्वाधिक प्रभाव प्रेसवर दिसून आला. जे काही लिहायचे आहे, ते अगोदर दाखवावे लागायचे. काहीही छापता येत नव्हते. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गळा घोटण्याचाच प्रयत्न सर्वत्र दिसून येत होता. परंतु कुणालाच काही करता येत नव्हते. जाहीर आंदोलने होत नव्हती. परंतु भूमिगत झालेल्या नेत्यांद्वारे शासनाच्या विरोधात जनमत तयार करण्याचे काम केले जात होते. भिंती रंगविणे, पत्रके वाटून शासनाचा विरोध करणे आदी कामे भूमिगत पद्धतीने सुरू होती. अशा नेत्यांना मदत करण्याचे काम मी तेव्हा करीत होतो, असेही त्यांनी सांगितले.