शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

देशावर वीजसंकट

By admin | Updated: July 18, 2014 03:15 IST

यंदा मान्सून लांबल्याने विजेची मागणी वाढली आहे. मात्र, वीज उत्पादक सरकारी कंपनी एनटीपीसीकडे केवळ दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे

नवी दिल्ली : यंदा मान्सून लांबल्याने विजेची मागणी वाढली आहे. मात्र, वीज उत्पादक सरकारी कंपनी एनटीपीसीकडे केवळ दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे मोठे वीजसंकट उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रीय ऊर्जा प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वांत मोठी वीज उत्पादक कंपनी असलेल्या एनटीपीसीच्या सहा प्रकल्पांमध्ये कोळशाच्या साठ्याची स्थिती चिंताजनक आहे. देशभरातील १०० पैकी ४६ प्रकल्पांत सात दिवस पुरेल एवढाच इंधन साठा शिल्लक आहे. एनटीपीसीने गेल्या १४ जुलै रोजी ऊर्जा मंत्रालयास लिहिलेल्या पत्रात यासंबंधीचा इशारा दिला होता. सरकारी कंपनी कोल इंडियाकडून पुरवठ्यात घट झाल्याने या वीज प्रकल्पांना संकटाचा सामना करावा लागत आहे. एनटीपीसीसह तिच्या उपकंपन्या वार्षिक अंदाजाच्या तुलनेत कमी प्रमाणात वीजपुरवठा करीत आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बाराव्या योजनेत सरकारने पारंपरिक स्रोतांद्वारे ८८,५३७ मेगावॅट आणि अपारंपरिक स्रोतांद्वारे ३०,००० मेगावॅट वीज उत्पादन करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. एप्रिल-जून या कालावधीत देशांत विजेच्या मागणी-पुरवठ्यात ५,२९५ मेगावॅटची तूट होती. सध्या देशाची एकूण वीज उत्पादन क्षमता ११३,२८० मेगावॅट एवढी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)