शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज गुजरातेत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 01:47 IST

गुजरात विधानसभा सदस्यांनी राज्यसभेवर पाठविण्याच्या तीन जागांसाठी उद्या, मंगळवारी मतदान होत असून, भाजपातर्फे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी व काँग्रेसमधून बाहेर पडलेले बलवंतसिंह राजपूत हे तिघे निवडणूक लढवत असून, काँग्रेसतर्फे सरचिटणीस अहमद पटेल रिंगणात आहेत.

बंगळुरू/ अहमदाबाद : गुजरात विधानसभा सदस्यांनी राज्यसभेवर पाठविण्याच्या तीन जागांसाठी उद्या, मंगळवारी मतदान होत असून, त्यामुळे तेथील काँग्रेसच्या ४४ आमदारांना सोमवारी सकाळी बंगळुरूमधून अहमदाबादमध्ये आणण्यात आले. भाजपातर्फे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी व काँग्रेसमधून बाहेर पडलेले बलवंतसिंह राजपूत हे तिघे निवडणूक लढवत असून, काँग्रेसतर्फे सरचिटणीस अहमद पटेल रिंगणात आहेत.राजपूत यांना तिसºया जागी निवडून आणण्याचे आणि अहमद पटेल यांना पाडण्याचे भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचा भाग म्हणून काँग्रेसच्या ५७ पैकी सहा आमदारांना आधीच राजीनामा दिला. त्यानंतर ५१ पैकी ४४ आमदारांना बंगळुरूला पाठविण्यात आले. उरलेले ७ आमदार कुठे आहेत, हे समजलेले नाहीत. मात्र काँग्रेसच्या आमदारांची मते फोडण्याचा भाजपाचा डाव आहे.पटेल निवडून येणार नाहीत, काँग्रेसची मते निश्चित फुटतील, असा दावा मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज केला. मात्र काँग्रेसची ४४ व राष्ट्रवादीची दोन मते मिळतील, असे अहमद पटेल यांचे म्हणणे आहे. पण कोणाला मतदान करायचे हा निर्णय आम्ही घेतलेला नाही, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसची सर्व मते अहमद पटेल यांना मिळाल्यास निश्चित निवडून येतील. पण आपली मते फुटणार नाहीत, याची खात्री काँग्रेसलाही दिसत नाही.निवडून येण्यासाठी ४६ मतांची गरज आहे. विधानसभेत भाजपाचे १२१ आमदार आहेत. प्रत्येक उमदेवाराला ४६ याप्रमाणे भाजपाला १३८ मतांची म्हणजेच १३८ मतांची गरज आहे. मात्र सदस्यांची संख्या ६ ने कमी झाल्याने तिघांना मिळून १३६ मते मिळाली तरी चालू शकेल. त्यासाठी काँग्रेसची काही मते फुटणे व राष्ट्रवादी तसेच अपक्षांची मते मिळणे गरजेचे आहे. राजपूत यांनी भाजपात प्रवेश करताना आपण मते फोडू असे आश्वासन दिले. त्याआधारेच भाजपाने त्यांना उमेदवारी दिली आहे. पण ती फोडता आली नाहीत, तरी भाजपाचे मूळचे दोन उमेदवार निश्चितच निवडून येतील. (वृत्तसंस्था)विधानसभांवर लक्षभाजपाने काँग्रेसला खिळखिळी करण्याचाच डाव आखला आहे. राज्यसभेपेक्षा भाजपाचे लक्ष या वर्षी होणाºया विधानसभा निवडणुकांवर आहे. काँग्रेसचे शंकरसिंह वाघेला यांनी पक्षातून बाहेर पडणे, हा भाजपाच्या रणनीतीचा भाग होता. भाजपा अनेक वर्षे सत्तेत असल्याचा, पटेल आरक्षण आंदोलनाचा आणि व्यापाºयांचा रोषाचा फायदा काँग्रेसला मिळू नये, यासाठीच हे सुरू असल्याचे सांगण्यात येते.