शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज गुजरातेत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 01:47 IST

गुजरात विधानसभा सदस्यांनी राज्यसभेवर पाठविण्याच्या तीन जागांसाठी उद्या, मंगळवारी मतदान होत असून, भाजपातर्फे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी व काँग्रेसमधून बाहेर पडलेले बलवंतसिंह राजपूत हे तिघे निवडणूक लढवत असून, काँग्रेसतर्फे सरचिटणीस अहमद पटेल रिंगणात आहेत.

बंगळुरू/ अहमदाबाद : गुजरात विधानसभा सदस्यांनी राज्यसभेवर पाठविण्याच्या तीन जागांसाठी उद्या, मंगळवारी मतदान होत असून, त्यामुळे तेथील काँग्रेसच्या ४४ आमदारांना सोमवारी सकाळी बंगळुरूमधून अहमदाबादमध्ये आणण्यात आले. भाजपातर्फे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी व काँग्रेसमधून बाहेर पडलेले बलवंतसिंह राजपूत हे तिघे निवडणूक लढवत असून, काँग्रेसतर्फे सरचिटणीस अहमद पटेल रिंगणात आहेत.राजपूत यांना तिसºया जागी निवडून आणण्याचे आणि अहमद पटेल यांना पाडण्याचे भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचा भाग म्हणून काँग्रेसच्या ५७ पैकी सहा आमदारांना आधीच राजीनामा दिला. त्यानंतर ५१ पैकी ४४ आमदारांना बंगळुरूला पाठविण्यात आले. उरलेले ७ आमदार कुठे आहेत, हे समजलेले नाहीत. मात्र काँग्रेसच्या आमदारांची मते फोडण्याचा भाजपाचा डाव आहे.पटेल निवडून येणार नाहीत, काँग्रेसची मते निश्चित फुटतील, असा दावा मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज केला. मात्र काँग्रेसची ४४ व राष्ट्रवादीची दोन मते मिळतील, असे अहमद पटेल यांचे म्हणणे आहे. पण कोणाला मतदान करायचे हा निर्णय आम्ही घेतलेला नाही, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसची सर्व मते अहमद पटेल यांना मिळाल्यास निश्चित निवडून येतील. पण आपली मते फुटणार नाहीत, याची खात्री काँग्रेसलाही दिसत नाही.निवडून येण्यासाठी ४६ मतांची गरज आहे. विधानसभेत भाजपाचे १२१ आमदार आहेत. प्रत्येक उमदेवाराला ४६ याप्रमाणे भाजपाला १३८ मतांची म्हणजेच १३८ मतांची गरज आहे. मात्र सदस्यांची संख्या ६ ने कमी झाल्याने तिघांना मिळून १३६ मते मिळाली तरी चालू शकेल. त्यासाठी काँग्रेसची काही मते फुटणे व राष्ट्रवादी तसेच अपक्षांची मते मिळणे गरजेचे आहे. राजपूत यांनी भाजपात प्रवेश करताना आपण मते फोडू असे आश्वासन दिले. त्याआधारेच भाजपाने त्यांना उमेदवारी दिली आहे. पण ती फोडता आली नाहीत, तरी भाजपाचे मूळचे दोन उमेदवार निश्चितच निवडून येतील. (वृत्तसंस्था)विधानसभांवर लक्षभाजपाने काँग्रेसला खिळखिळी करण्याचाच डाव आखला आहे. राज्यसभेपेक्षा भाजपाचे लक्ष या वर्षी होणाºया विधानसभा निवडणुकांवर आहे. काँग्रेसचे शंकरसिंह वाघेला यांनी पक्षातून बाहेर पडणे, हा भाजपाच्या रणनीतीचा भाग होता. भाजपा अनेक वर्षे सत्तेत असल्याचा, पटेल आरक्षण आंदोलनाचा आणि व्यापाºयांचा रोषाचा फायदा काँग्रेसला मिळू नये, यासाठीच हे सुरू असल्याचे सांगण्यात येते.