शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात निवडणूक आयोगाचा गोंधळ!

By admin | Updated: September 26, 2014 00:48 IST

शहरातील शिधावाटप कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांच्या निवडणूक नेमणुका दोन पेक्षा जास्त मतदारसंघात झाल्याने, त्यांच्यात गोंधळ उडाला

सदानंद नाईक, उल्हासनगरशहरातील शिधावाटप कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांच्या निवडणूक नेमणुका दोन पेक्षा जास्त मतदारसंघात झाल्याने, त्यांच्यात गोंधळ उडाला आहे. एकाच मतदारसंघात नेमणूका देण्याची विनंती कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. निवडणूक आयोगाच्या या सावळ्या गोंधळामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन शिक्षकांचा बळी गेला.उल्हासनगर शहराचा भाग तीन मतदारसंघात विभागाला असून शहरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवडणूक उल्हासनगर, अंबरनाथ व कल्याण पूर्व मतदारसंघात होणे अपेक्षित असते. मात्र शिधावाटप कार्यालयातील शिधावाटप निरिक्षक व लिपिक श्यामकुमार काकड, शंकर होणमाने, मधुरा पटवर्धन, हर्षा कंदारकर, संदेश हके, शांताराम नाकडे, अस्मिता चव्हाण, कमल कटारी आदी कर्मचाऱ्यांची निवडणूक नेमणूका एकाचवेळी ठाण्यातील माजीवडा, भार्इंदर व उल्हासनगर मतदारसंघात झाल्या आहेत.शिधावाटप अधिकारी बी. सी. मुंडे यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची निवडणूक नेमणुका, एकाच वेळी तीन मतदारसंघात झाल्याचे निवडणूक आधिकारी बी.जी. गावंडे यांच्या निर्दशनात आणून दिले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालय क्षेत्राजवळील मतदारसंघात नेमणूक देण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे. असंख्य कर्मचाऱ्यांची एका पेक्षा जास्त ठिकाणी नेमणूक झाल्याने कर्मचाऱ्यांत गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाच्या या सावळ्या गोंधळाने कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास झाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.गेल्या लोकसभा निवडणूकीत तक्षशिला शाळेतील एका शिक्षकाची नेमणूक घरोघरी निवडणूक स्लीप वाटण्यासाठी झाली होती. मात्र शिक्षकांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईला हलविण्यात आले होते. शिक्षकाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी सुट्टी देण्याची मागणी संबधीत अधिकारी यांना केली होती. मात्र सुट्टी न देता निवडणुकीच्या दिवशी शिक्षकाच्या गैरहजेरीत शिक्षकाच्या अल्पवयीन मुलीला निवडणूकीच्या कामाला जुपंले होते. मुंबई मधील रुग्णालयात उपचार घेत असतानां मतदानाच्या दिवशीच शिक्षकाचा दुपारी मृत्यू झाला. वडीलाच्या मृत्यूची माहिती मुलीना मिळाल्यावरही, संबधीत निवडणूक अधिका-याने मुलीला घरी जाऊ दिले नव्हते. निवडणूक संपल्यानंतरच निवडणूक भत्ता देऊन मुलीला जाऊ दिल्याचे उघड झाले होते. याप्रकाराने निवडणूक आयोगाचा सावळा-गोंधळ उघड झाला होता. आतातर एकाच कर्मचाऱ्याच्या निवडणूक नेमणूका तीन मतदारसंघात झाल्याने, आयोगाच्या गोंघळात भर पडली आहे. मात्र अशा लहान-मोठया चुका होतच असल्याची प्रतिक्रीया निवडणूक अधिकारी बी. जी. गांवडे यांनी दिली आहे.