शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

उल्हासनगरात निवडणूक आयोगाचा गोंधळ!

By admin | Updated: September 26, 2014 00:48 IST

शहरातील शिधावाटप कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांच्या निवडणूक नेमणुका दोन पेक्षा जास्त मतदारसंघात झाल्याने, त्यांच्यात गोंधळ उडाला

सदानंद नाईक, उल्हासनगरशहरातील शिधावाटप कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांच्या निवडणूक नेमणुका दोन पेक्षा जास्त मतदारसंघात झाल्याने, त्यांच्यात गोंधळ उडाला आहे. एकाच मतदारसंघात नेमणूका देण्याची विनंती कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. निवडणूक आयोगाच्या या सावळ्या गोंधळामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन शिक्षकांचा बळी गेला.उल्हासनगर शहराचा भाग तीन मतदारसंघात विभागाला असून शहरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवडणूक उल्हासनगर, अंबरनाथ व कल्याण पूर्व मतदारसंघात होणे अपेक्षित असते. मात्र शिधावाटप कार्यालयातील शिधावाटप निरिक्षक व लिपिक श्यामकुमार काकड, शंकर होणमाने, मधुरा पटवर्धन, हर्षा कंदारकर, संदेश हके, शांताराम नाकडे, अस्मिता चव्हाण, कमल कटारी आदी कर्मचाऱ्यांची निवडणूक नेमणूका एकाचवेळी ठाण्यातील माजीवडा, भार्इंदर व उल्हासनगर मतदारसंघात झाल्या आहेत.शिधावाटप अधिकारी बी. सी. मुंडे यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची निवडणूक नेमणुका, एकाच वेळी तीन मतदारसंघात झाल्याचे निवडणूक आधिकारी बी.जी. गावंडे यांच्या निर्दशनात आणून दिले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालय क्षेत्राजवळील मतदारसंघात नेमणूक देण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे. असंख्य कर्मचाऱ्यांची एका पेक्षा जास्त ठिकाणी नेमणूक झाल्याने कर्मचाऱ्यांत गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाच्या या सावळ्या गोंधळाने कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास झाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.गेल्या लोकसभा निवडणूकीत तक्षशिला शाळेतील एका शिक्षकाची नेमणूक घरोघरी निवडणूक स्लीप वाटण्यासाठी झाली होती. मात्र शिक्षकांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईला हलविण्यात आले होते. शिक्षकाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी सुट्टी देण्याची मागणी संबधीत अधिकारी यांना केली होती. मात्र सुट्टी न देता निवडणुकीच्या दिवशी शिक्षकाच्या गैरहजेरीत शिक्षकाच्या अल्पवयीन मुलीला निवडणूकीच्या कामाला जुपंले होते. मुंबई मधील रुग्णालयात उपचार घेत असतानां मतदानाच्या दिवशीच शिक्षकाचा दुपारी मृत्यू झाला. वडीलाच्या मृत्यूची माहिती मुलीना मिळाल्यावरही, संबधीत निवडणूक अधिका-याने मुलीला घरी जाऊ दिले नव्हते. निवडणूक संपल्यानंतरच निवडणूक भत्ता देऊन मुलीला जाऊ दिल्याचे उघड झाले होते. याप्रकाराने निवडणूक आयोगाचा सावळा-गोंधळ उघड झाला होता. आतातर एकाच कर्मचाऱ्याच्या निवडणूक नेमणूका तीन मतदारसंघात झाल्याने, आयोगाच्या गोंघळात भर पडली आहे. मात्र अशा लहान-मोठया चुका होतच असल्याची प्रतिक्रीया निवडणूक अधिकारी बी. जी. गांवडे यांनी दिली आहे.