शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोग रिझर्व्ह बॅँकेवर नाराज

By admin | Updated: January 30, 2017 04:29 IST

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना अधिक रक्कम काढण्याची मुभा न देणाऱ्या रिझर्व्ह बॅँकेला निवडणूक आयोगाने खरमरीत पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना अधिक रक्कम काढण्याची मुभा न देणाऱ्या रिझर्व्ह बॅँकेला निवडणूक आयोगाने खरमरीत पत्र लिहिले आहे. नोटाबंदीनंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेली २४ हजार रुपयांची कमाल साप्ताहिक मर्यादा शिथिल करून पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना खास निवडणूक खर्चासाठी उघडलेल्या खात्यातून आठवड्याला दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम काढू द्यावी, ही विनंती गांभीर्याने विचार न करता अमान्य केल्याबद्दल निवडणूक आयोगाने रिझर्व्ह बँकेवर नाराजी व्यक्त केली आहे.आयोगाने रिझर्व्ह बँकेस काहीशा खरमरीत भाषेत नवे पत्र लिहून सध्या ही मर्यादा वाढविणे शक्य नसल्याच्या आधी कळविलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.आयोगाने हे पत्र थेट गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांना पाठविले असून हा विषय ज्या गांभीर्याने हाताळला जायला हवा होता तो तसा न हाताळला गेल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आयोग पत्रात म्हणतो, रिझर्व्ह बँकेस परिस्थितीचे गांभीर्य जाणवले नसावे असे दिसते. निवडणूक स्वतंत्र आणि नि:पक्ष वातावरणात घेणे आणि त्यासाठी सर्व उमेदवारांना एकसारखी संधी उपलब्ध करून देणे ही राज्यघटनेने निवडणूक आयोगावर टाकलेली जबाबदारी आहे. त्यामुळे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने दिलेल्या निर्देशांचे सर्वांनी पालन करणे अपेक्षित आहे.प्रत्येत उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र खाते उघडणे सक्तीचे आहे. त्यातून केल्या जाणाऱ्या खर्चा ची आयोगाकडून शहानिशा केली जाते. संबंधित व्यक्ती निवडणुकीत उमेदवार असल्याचे प्रमाणपत्र देईल व त्याआधारे त्या उमेदवारास त्याच्या निवडणूक खर्चाच्या खात्यातून ११ मार्च या मतदानाच्या दिवसापर्यंत दर आठवड्याला दोन लाखांपर्यंतची रक्म काढू द्यावी, असे आयोगाने रिझर्व्ह बँकेस कळविले होते. आयोग म्हणतो की, कायद्यानुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड व पंजाब या राज्यात प्रत्येक उमेदवार प्रचारावर २८ लाखांपर्यंत खर्च करू शकतो. गोवा व मणिपूरसाठी ही मर्यादा प्रत्येकी २० लाख आहे. प्रचार तीन-चार आठवडे चालतो. सध्याच्या मर्यादेनुसार उमेदवार जास्तीत जास्त ९६ हजार रुपये खात्यातून काढू शकेल. काही खर्च चेकने करायचा म्हटला, तरी ही रक्कम खूपच तुटपुंजी आहे. ग्रामीण भागांमध्ये उमेदवारांची आणखीनच अडचण होईल.