शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोग रिझर्व्ह बॅँकेवर नाराज

By admin | Updated: January 30, 2017 04:29 IST

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना अधिक रक्कम काढण्याची मुभा न देणाऱ्या रिझर्व्ह बॅँकेला निवडणूक आयोगाने खरमरीत पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना अधिक रक्कम काढण्याची मुभा न देणाऱ्या रिझर्व्ह बॅँकेला निवडणूक आयोगाने खरमरीत पत्र लिहिले आहे. नोटाबंदीनंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेली २४ हजार रुपयांची कमाल साप्ताहिक मर्यादा शिथिल करून पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना खास निवडणूक खर्चासाठी उघडलेल्या खात्यातून आठवड्याला दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम काढू द्यावी, ही विनंती गांभीर्याने विचार न करता अमान्य केल्याबद्दल निवडणूक आयोगाने रिझर्व्ह बँकेवर नाराजी व्यक्त केली आहे.आयोगाने रिझर्व्ह बँकेस काहीशा खरमरीत भाषेत नवे पत्र लिहून सध्या ही मर्यादा वाढविणे शक्य नसल्याच्या आधी कळविलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.आयोगाने हे पत्र थेट गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांना पाठविले असून हा विषय ज्या गांभीर्याने हाताळला जायला हवा होता तो तसा न हाताळला गेल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आयोग पत्रात म्हणतो, रिझर्व्ह बँकेस परिस्थितीचे गांभीर्य जाणवले नसावे असे दिसते. निवडणूक स्वतंत्र आणि नि:पक्ष वातावरणात घेणे आणि त्यासाठी सर्व उमेदवारांना एकसारखी संधी उपलब्ध करून देणे ही राज्यघटनेने निवडणूक आयोगावर टाकलेली जबाबदारी आहे. त्यामुळे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने दिलेल्या निर्देशांचे सर्वांनी पालन करणे अपेक्षित आहे.प्रत्येत उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र खाते उघडणे सक्तीचे आहे. त्यातून केल्या जाणाऱ्या खर्चा ची आयोगाकडून शहानिशा केली जाते. संबंधित व्यक्ती निवडणुकीत उमेदवार असल्याचे प्रमाणपत्र देईल व त्याआधारे त्या उमेदवारास त्याच्या निवडणूक खर्चाच्या खात्यातून ११ मार्च या मतदानाच्या दिवसापर्यंत दर आठवड्याला दोन लाखांपर्यंतची रक्म काढू द्यावी, असे आयोगाने रिझर्व्ह बँकेस कळविले होते. आयोग म्हणतो की, कायद्यानुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड व पंजाब या राज्यात प्रत्येक उमेदवार प्रचारावर २८ लाखांपर्यंत खर्च करू शकतो. गोवा व मणिपूरसाठी ही मर्यादा प्रत्येकी २० लाख आहे. प्रचार तीन-चार आठवडे चालतो. सध्याच्या मर्यादेनुसार उमेदवार जास्तीत जास्त ९६ हजार रुपये खात्यातून काढू शकेल. काही खर्च चेकने करायचा म्हटला, तरी ही रक्कम खूपच तुटपुंजी आहे. ग्रामीण भागांमध्ये उमेदवारांची आणखीनच अडचण होईल.