शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

बिहारचा निवडणूक आखाडाही तापला

By admin | Updated: July 7, 2015 23:23 IST

केंद्र सरकारने सामाजिक आणि आर्थिक चित्र स्पष्ट करणारी जनगणनेची माहिती जारी केली असली तरी जातनिहाय आकडेवारी रोखून ठेवल्याने बिहारमधील प्रचारादरम्यान नवा वाद उफाळला आहे.

पाटणा : केंद्र सरकारने सामाजिक आणि आर्थिक चित्र स्पष्ट करणारी जनगणनेची माहिती जारी केली असली तरी जातनिहाय आकडेवारी रोखून ठेवल्याने बिहारमधील प्रचारादरम्यान नवा वाद उफाळला आहे. जातनिहाय आणि अल्पसंख्याकांच्या संख्येसंबंधी आकडेवारी दडवून ठेवत सरकारने कट रचल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चानेही (एचएएम) या मागणीत सूर मिसळत रालोआची अडचण वाढविली आहे.‘मार्च’ नेण्याचा इशारा केंद्र सरकारने जातनिहाय आकडेवारी जारी न केल्यास १३ जुलै रोजी पाटण्यातील राजभवनावर मार्च नेण्याचा इशारा लालूप्रसाद यादव यांनी दिला आहे. आपल्या जातीची लोकसंख्या किती हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही जातींसंबंधी वेगवेगळे दावे ऐकले आहेत. या जनगणनेतून नेमकी संख्या समोर येईल, असे ते दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. जनतेच्या मागणीनुसार ही आकडेवारी जारी करायला हवी. केंद्र सरकार ही आकडेवारी जारी का करीत नाही, हे माझ्या आकलनापलीकडचे आहे, असे नितीशकुमार यांनी सोमवारी म्हटले. (वृत्तसंस्था) एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न -भाजप४जातनिहाय आकडेवारी जारी करण्याची मागणी करीत राजद आणि जेडीयूने समाजातील सलोखा बिघडविण्याचे काम चालविले आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर यादव यांनी केला. ४पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकासाकडे नेण्याची भाषा करीत असताना काही लोक जातीय राजकारणात तेल ओतत सामाजिक एकोपा बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.