शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

बिहारचा निवडणूक आखाडाही तापला

By admin | Updated: July 7, 2015 23:23 IST

केंद्र सरकारने सामाजिक आणि आर्थिक चित्र स्पष्ट करणारी जनगणनेची माहिती जारी केली असली तरी जातनिहाय आकडेवारी रोखून ठेवल्याने बिहारमधील प्रचारादरम्यान नवा वाद उफाळला आहे.

पाटणा : केंद्र सरकारने सामाजिक आणि आर्थिक चित्र स्पष्ट करणारी जनगणनेची माहिती जारी केली असली तरी जातनिहाय आकडेवारी रोखून ठेवल्याने बिहारमधील प्रचारादरम्यान नवा वाद उफाळला आहे. जातनिहाय आणि अल्पसंख्याकांच्या संख्येसंबंधी आकडेवारी दडवून ठेवत सरकारने कट रचल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चानेही (एचएएम) या मागणीत सूर मिसळत रालोआची अडचण वाढविली आहे.‘मार्च’ नेण्याचा इशारा केंद्र सरकारने जातनिहाय आकडेवारी जारी न केल्यास १३ जुलै रोजी पाटण्यातील राजभवनावर मार्च नेण्याचा इशारा लालूप्रसाद यादव यांनी दिला आहे. आपल्या जातीची लोकसंख्या किती हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही जातींसंबंधी वेगवेगळे दावे ऐकले आहेत. या जनगणनेतून नेमकी संख्या समोर येईल, असे ते दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. जनतेच्या मागणीनुसार ही आकडेवारी जारी करायला हवी. केंद्र सरकार ही आकडेवारी जारी का करीत नाही, हे माझ्या आकलनापलीकडचे आहे, असे नितीशकुमार यांनी सोमवारी म्हटले. (वृत्तसंस्था) एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न -भाजप४जातनिहाय आकडेवारी जारी करण्याची मागणी करीत राजद आणि जेडीयूने समाजातील सलोखा बिघडविण्याचे काम चालविले आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर यादव यांनी केला. ४पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकासाकडे नेण्याची भाषा करीत असताना काही लोक जातीय राजकारणात तेल ओतत सामाजिक एकोपा बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.