शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

UP ELECTION 2017 : कोण होणार ‘यूपी’चा मुख्यमंत्री?

By admin | Updated: March 8, 2017 01:56 IST

उत्तरप्रदेश विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान उद्या, बुधवारी होत असून, एका महिन्यापेक्षा अधिक काळ गरजणाऱ्या परस्परांविरोधी मुलुखमैदान तोफा

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

उत्तरप्रदेश विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान उद्या, बुधवारी होत असून, एका महिन्यापेक्षा अधिक काळ गरजणाऱ्या परस्परांविरोधी मुलुखमैदान तोफा थंडावल्यनंतर सर्र्वाचे लक्ष ११ मार्चला जाहीर होणाऱ्या निकालांकडे आहे. दिल्लीत संभाव्य निकालांबरोबरच या सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याबाबत वेगवेगळे कयास व्यक्त होऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशात सत्ता कोणाची येईल? समाजवादी व काँग्रेसच्या आघाडीला ही संधी मिळेल की निकालानंतर बसप आणि भाजप परस्परांशी युती करून एकत्रितरित्या सत्तेचा दावा करतील? मतदारांनी एकट्या भाजपच्या हाती सत्ता सोपवली तर त्या पक्षातर्फे कोण मुख्यमंत्री होईल? अशा प्रश्नांच्या चर्चेचे फड राजधानीत रंगू लागले आहेत. मतदानाच्या तीन टप्प्यांनंतर मुंबई, दिल्ली सट्टाबाजारांनी भाजपला ा सर्वाधिक जागा मिळतील, सरकार भाजपचेच असेल असे भाकित व्यक्त केले आहे. राजधानीतील काही राजकीय जाणकारांनीही त्यास दुजोरा दिल्याने मुख्यमंत्री कोण याची चर्चा आपसूकच सुरू झाली.समाजवादी व काँग्रेस आघाडीतर्फे अखिलेश यादव आणि बसपच्या मायावती मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारच आहेत. भाजपने मात्र आपला उमेदवार अखेरपर्यंत घोषित केला नाही. पक्षाच्या नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. तथापि भाजपकडे एकहाती सत्ता आल्यास त्याचे श्रेय प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांनाच मिळेल आणि तेच सर्वात प्रबळ दावेदार ठरतील. मौर्य भाजपचे जुने निष्ठावान आहेत. पंतप्रधान मोदी व अमित शाह यांचे निकटवर्ती आहेत. रा.स्व.संघाशीही त्यांचा निकटचा संबंध आहे. यंदा निवडणूक प्रचारात भाजपने ओबीसी मतांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले होते. मौर्य ओबीसी आहेत. भाजपकडे उत्तर प्रदेशात पहिल्यांदा सत्ता आली तेव्हाही पक्षाने लोध समाजातील कल्याणसिंगांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती.मौर्य यांच्याखेरीज रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, राज्यातले फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ, लखनौचे महापौर दिनेश शर्मा यांची नावेही चर्चेत आहेत. ज्येष्ठापेक्षा नवा चेहरा बरा?पंतप्रधानपद मोदींकडे आल्यानंतर महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडातील मुख्यमंत्रीपद सोपवण्याचा ट्रेन्ड पाहता, जुन्या,ज्येष्ठ नेत्यांऐवजी स्वच्छ प्रतिमेचा नवा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी दिल्याचे चित्र दिसते. विधानसभा निवडणुकांआधी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवले होते. सत्तेची संधी येताच मुख्यमंत्रीपद त्यांच्याच हाती सोपवले. त्याचप्रमाणे उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्षपद मौर्य यांच्याकडे असल्याने पहिली संधी त्यांनाच मिळेल, असा अंदाज आहे.