शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

UP ELECTION 2017 - उत्तरप्रदेशात 'कमळ' फुलणार - राजदीप सरदेसाई

By admin | Updated: March 3, 2017 11:35 IST

दोनवर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकीचा विचार करता उत्तरप्रदेश जिंकणे भाजपासाठी महत्वाचे असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 3 - राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाच्या असलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला अनुकूल निकाल लागतील असा अंदाज राजकीय विश्लेषक आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे. दोनवर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकीचा विचार करता उत्तरप्रदेश जिंकणे भाजपासाठी महत्वाचे असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले आहे. 
 
2014 लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला उत्तरप्रदेशात एकूण 42 टक्के मते मिळाली आणि राज्यातील 80 पैकी तब्बल 73 जागांवर भाजपा खासदार विजयी झाले. त्यावेळी मोदी लाट होती. यंदाच्या विधानसभेत त्या मतांमध्ये 10 टक्क्यांची घट गृहित धरली तरी, भाजपासाठी सहज सत्तेचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. कारण 2012 मध्ये 29 टक्के मते मिळवून उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेत आला. त्यापूर्वी 2007 मध्ये बसपाने 30 टक्के मते मिळवून राज्याची सत्ता मिळवली होती असे राजदीप यांनी म्हटले आहे. 
 
काही विश्लेषक काँग्रेस-समाजवादी पक्षाची आघाडी झाल्यामुळे 2015 बिहार विधानसभेच्या निवडणुकीशी तुलना करत आहेत. त्यावेळी बिहारमध्ये भाजपा विरोधात महागठबंधन झाल्यामुळे भाजपाला दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले. पण उत्तरप्रदेशात तिरंगी लढत आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष आणि बसपा अखिलेश स्वतंत्र लढत आहेत. नितीश कुमार-लालू प्रसाद यादव यांच्याप्रमाणे त्यांच्यात आघाडी झालेली नाही. उत्तरप्रदेशात काँग्रेसकडे कमकुवत पक्ष म्हणून पाहिले जाते असे निरीक्षण राजदीप यांनी नोंदवले आहे. 
 
उत्तरप्रदेशात विरोधक मोदींना 'आऊटसाईडर' ठरवत असले तरी, मोदींबद्दल एक विश्वास आहे. मोदींनी दत्तक घेतलेल्या वाराणासीतील जयापूर गावात रस्त्यांची दुरावस्था आहे. सोलार पॅनलच्या बॅटरींची चोरी झालीय, टॉयलेटमध्ये पाण्याची व्यवस्था नाही तरीही इथले मतदार मोदींना मतदान करणार असे म्हणतात. नोटाबंदीची झळ सोसावी लागले हे इथल्या लोकांना मान्य असले तरी, ते मोदींना साथ देण्याचा त्यांचा सूर आहे असे राजदीप यांचे निरीक्षण आहे.