शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

UP ELECTION 2017 - उत्तरप्रदेशात 'कमळ' फुलणार - राजदीप सरदेसाई

By admin | Updated: March 3, 2017 11:35 IST

दोनवर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकीचा विचार करता उत्तरप्रदेश जिंकणे भाजपासाठी महत्वाचे असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 3 - राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाच्या असलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला अनुकूल निकाल लागतील असा अंदाज राजकीय विश्लेषक आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे. दोनवर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकीचा विचार करता उत्तरप्रदेश जिंकणे भाजपासाठी महत्वाचे असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले आहे. 
 
2014 लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला उत्तरप्रदेशात एकूण 42 टक्के मते मिळाली आणि राज्यातील 80 पैकी तब्बल 73 जागांवर भाजपा खासदार विजयी झाले. त्यावेळी मोदी लाट होती. यंदाच्या विधानसभेत त्या मतांमध्ये 10 टक्क्यांची घट गृहित धरली तरी, भाजपासाठी सहज सत्तेचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. कारण 2012 मध्ये 29 टक्के मते मिळवून उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेत आला. त्यापूर्वी 2007 मध्ये बसपाने 30 टक्के मते मिळवून राज्याची सत्ता मिळवली होती असे राजदीप यांनी म्हटले आहे. 
 
काही विश्लेषक काँग्रेस-समाजवादी पक्षाची आघाडी झाल्यामुळे 2015 बिहार विधानसभेच्या निवडणुकीशी तुलना करत आहेत. त्यावेळी बिहारमध्ये भाजपा विरोधात महागठबंधन झाल्यामुळे भाजपाला दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले. पण उत्तरप्रदेशात तिरंगी लढत आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष आणि बसपा अखिलेश स्वतंत्र लढत आहेत. नितीश कुमार-लालू प्रसाद यादव यांच्याप्रमाणे त्यांच्यात आघाडी झालेली नाही. उत्तरप्रदेशात काँग्रेसकडे कमकुवत पक्ष म्हणून पाहिले जाते असे निरीक्षण राजदीप यांनी नोंदवले आहे. 
 
उत्तरप्रदेशात विरोधक मोदींना 'आऊटसाईडर' ठरवत असले तरी, मोदींबद्दल एक विश्वास आहे. मोदींनी दत्तक घेतलेल्या वाराणासीतील जयापूर गावात रस्त्यांची दुरावस्था आहे. सोलार पॅनलच्या बॅटरींची चोरी झालीय, टॉयलेटमध्ये पाण्याची व्यवस्था नाही तरीही इथले मतदार मोदींना मतदान करणार असे म्हणतात. नोटाबंदीची झळ सोसावी लागले हे इथल्या लोकांना मान्य असले तरी, ते मोदींना साथ देण्याचा त्यांचा सूर आहे असे राजदीप यांचे निरीक्षण आहे.