शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

UP ELECTION 2017 - उत्तरप्रदेशात 'कमळ' फुलणार - राजदीप सरदेसाई

By admin | Updated: March 3, 2017 11:35 IST

दोनवर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकीचा विचार करता उत्तरप्रदेश जिंकणे भाजपासाठी महत्वाचे असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 3 - राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाच्या असलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला अनुकूल निकाल लागतील असा अंदाज राजकीय विश्लेषक आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे. दोनवर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकीचा विचार करता उत्तरप्रदेश जिंकणे भाजपासाठी महत्वाचे असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले आहे. 
 
2014 लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला उत्तरप्रदेशात एकूण 42 टक्के मते मिळाली आणि राज्यातील 80 पैकी तब्बल 73 जागांवर भाजपा खासदार विजयी झाले. त्यावेळी मोदी लाट होती. यंदाच्या विधानसभेत त्या मतांमध्ये 10 टक्क्यांची घट गृहित धरली तरी, भाजपासाठी सहज सत्तेचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. कारण 2012 मध्ये 29 टक्के मते मिळवून उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेत आला. त्यापूर्वी 2007 मध्ये बसपाने 30 टक्के मते मिळवून राज्याची सत्ता मिळवली होती असे राजदीप यांनी म्हटले आहे. 
 
काही विश्लेषक काँग्रेस-समाजवादी पक्षाची आघाडी झाल्यामुळे 2015 बिहार विधानसभेच्या निवडणुकीशी तुलना करत आहेत. त्यावेळी बिहारमध्ये भाजपा विरोधात महागठबंधन झाल्यामुळे भाजपाला दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले. पण उत्तरप्रदेशात तिरंगी लढत आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष आणि बसपा अखिलेश स्वतंत्र लढत आहेत. नितीश कुमार-लालू प्रसाद यादव यांच्याप्रमाणे त्यांच्यात आघाडी झालेली नाही. उत्तरप्रदेशात काँग्रेसकडे कमकुवत पक्ष म्हणून पाहिले जाते असे निरीक्षण राजदीप यांनी नोंदवले आहे. 
 
उत्तरप्रदेशात विरोधक मोदींना 'आऊटसाईडर' ठरवत असले तरी, मोदींबद्दल एक विश्वास आहे. मोदींनी दत्तक घेतलेल्या वाराणासीतील जयापूर गावात रस्त्यांची दुरावस्था आहे. सोलार पॅनलच्या बॅटरींची चोरी झालीय, टॉयलेटमध्ये पाण्याची व्यवस्था नाही तरीही इथले मतदार मोदींना मतदान करणार असे म्हणतात. नोटाबंदीची झळ सोसावी लागले हे इथल्या लोकांना मान्य असले तरी, ते मोदींना साथ देण्याचा त्यांचा सूर आहे असे राजदीप यांचे निरीक्षण आहे.