शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

UP Election 2017 : पाचव्या टप्प्याने वाढविली राजकीय पक्षांची चिंता

By admin | Updated: March 2, 2017 13:09 IST

पाचव्या टप्प्यातील मतदान ६० टक्क्यांपेक्षाही कमी झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत

लखनौ : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान ६० टक्क्यांपेक्षाही कमी झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत आणि अंदाज बांधण्याला सुरुवात झाली आहे.भाजपा, बसपा आणि काँग्रेस-सपा सर्वच पक्ष कमी मतदानाचा आपल्या संभाव्य कामगिरीवर अंदाज बांधत आहेत. पाचव्या टप्प्यात ११ जिल्ह्यांमधील ५१ जागांसाठी ५७.३६ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपा नेते वरुण गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघातील अमेठी आणि सुलतानपूर येथेही मतदानाची टक्केवारी कमीच राहिली. अमेठीत ५६.२५ टक्के आणि सुलतानपूर येथे ५६.३५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.या दोन जिल्ह्यांशिवाय सिद्धार्थनगर (५१.८२ टक्के), संत कबीरनगर (५२.३१ टक्के), बलरामपूर (५४.२५ टक्के) आणि गोनडा (५६.७३ टक्के) या सहा जिल्ह्यांमध्येही मतदान कमीच राहिले. आपलेच मतदार मोठ्या संख्येत मतदान केंद्रावर आले आणि विरोधकांचे मतदार फिरकलेच नाहीत, असा दावा प्रत्येक पक्ष करीत आहे.सपा आणि काँग्रेस हे दोघेही आपल्या परंपरागत मतदारांवर निर्भर आहेत तर बसपाला दलित मतदारांवर विश्वास आहे. भाजपा निश्चिंत आहे. ज्या भागांत कमी मतदान झाले तो भाग मुस्लीमबहुल असल्याने आपल्याला चिंता नाही, असे भाजपा नेते सांगत आहेत. (वृत्तसंस्था)