शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2017 : कैराना, अलीगढ व मुजफ्फरनगरला फाळणीसदृष स्थिती

By admin | Updated: February 28, 2017 17:12 IST

निवडणुकांच्या तापलेल्या वातावरणात उत्तर प्रदेशमधील कैराना, अलीगढ आणि मुजफ्फरनगर येथे हिंदू व मुस्लीमांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - निवडणुकांच्या तापलेल्या वातावरणात उत्तर प्रदेशमधील कैराना, अलीगढ आणि मुजफ्फरनगर येथे हिंदू व मुस्लीमांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या भागांमध्ये दौरा केल्यानंतर फर्स्टपोस्टमध्ये आपलं निरीक्षण नोंदवताना ज्येष्ठ पत्रकार टुफेल अहमद यांनी या भागामध्ये फाळणीसारखी स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

काय आहे कैराना, मुजफ्फरनगर आणि अलीगढमधली स्थिती:

- मुजफ्फरनगर आणि शामली परिसरात छोट्या कारणामुळे दोन गटात झालेल्या भांडणानंतर जातीय दंगल उसळली होती. यामध्ये झालेल्या हिंसाचारात 60 च्यावर लोक मृत्युमुखी पडले होते. तर सुमारे 40,000 लोकांना स्थलांतर करावे लागले होते. याप्रकरणी 110 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दंगलग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती.

- पश्चिम उत्तरप्रदेश मधल्या शामली जिल्ह्यातलं कैराना हे एक छोटंसं गांव. मुसलमान लोक बहुसंख्येने असले तरी हिंदूंचीही संख्या कमी नाही. हिंदू मुस्लिम लोक मिळून-मिसळून राहायचे. पण 2013 मध्ये कैरानाच्या लोकसंख्येमध्ये एक खूप मोठं स्थित्यंतर झालं. अर्थात, असं स्थलांतर झाल्याचं भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे, तर विरोधकांना हे मान्य नाही.

- जर समाजवादी पार्टीचा उमेदवार विजयी झाला तर कैरानामधून आणखी मोठ्या प्रमाणावर हिंदू स्थलांतर करतील असं स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितलं.

- कैरानामध्ये ड्रग्ज, लुटमार, मद्यविक्रि, वेश्याव्यवसाय अशा अनेक अनेक अनैतिक धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लीम युवक सहभागी असून हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही समाजाचे लोक त्रस्त असल्याचे अहररूल इस्लामचे युपी प्रमुख मोहम्मद अली यांनी सांगितले आहे.

- कैरानामध्ये तर लष्कर पाचारण करायला हवं असं मत काहींनी व्यक्त केलं आहे.

- खंडणीखोरांचा फटका प्रामुख्यानं हिंदूंना बसलेला असला तरी अनेक मुस्लीम व्यापारीही खंडणीखोरांमुळे त्रस्त आहेत.

- पोलीसांनी काही कारवाई करायचा प्रयत्न केला तर संपूर्ण समाज पोलीस ठाण्याला वेढा घालतो आणि गुन्हेगारीचा प्रश्न हिंदू मुस्लीम समाजातील तेढ असा बनतो असा अनुभव आहे, त्यामुळे पोलीसांचे कामही जिकिरीचे आहे.

- यापूर्वी हिंदू व मुस्लीम येथे साहचर्यानं राहत होते, परंतु आता मुस्लीमांची संख्या प्रचंड वाढल्याने तणाव निर्माण झाल्याचं मत सुधीर चौधरी या पत्रकारानं व्यक्त केलं आहे.

- स्थानिक आमदार नाहिद हुसैन गुन्हेगारांना पाठिसी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

- मुजफ्फरनगरमध्येही अशीच परिस्थिती असून जर पोलीसांना गुन्हेगाराला मुस्लीम वस्तीतून अटक करायची असेल, तर सैनिकांची बटालियन लागते असा अनुभव एका डॉक्टरने व्यक्त केला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या या भागामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण असून हिंदू व मुस्लीमांमध्ये फाळणीसारकी स्थिती निर्माण झाल्याचे मत निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.