शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

शिक्षण पक्षाचा नाही, तर देशाचा विषय!

By admin | Updated: July 15, 2016 02:30 IST

मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्या शिक्षण धोरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमपत्रिकेला खो दिला आहे

नितीन अग्रवाल,  नवी दिल्लीमनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्या शिक्षण धोरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमपत्रिकेला खो दिला आहे. नव्या शिक्षण धोरणावर चर्चेसाठी रा.स्व. संघ परिवारातील संघटनांद्वारे आयोजित परिषदेत त्यांनी शिक्षण हा संपूर्ण राष्ट्राचा विषय असल्याचे ठणकावले. एवढेच नाही, तर उत्कृष्ट शिक्षण धोरण आखण्यासाठी भाजपा, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीसह सर्वांनी पक्षहिताला फाटा देऊन राष्ट्रहितासाठी पुढे यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. आपण लोकशाहीचे पाईक आहोत, असे सांगून त्यांनी शिक्षण धोरणावरील पहिल्या भाषणाची सुरुवात केली. शिक्षण जीवनाला आकार देणारे असावे. मुलांचे भविष्य चांगले व्हावे यासाठी गरीब आई-वडील पोटाला चिमटे घेऊन मुलांना शिकवितात. त्यामुळे हा भाजपा, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचा विषय नाही, तर राष्ट्रीय विषय असून, यात सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे. संघ परिवारातील भारत शिक्षण मंडळ आणि भारत निती या संघटनांनी नवीन शिक्षण धोरणावर चर्चेसाठी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-अपेक्षा आणि आव्हाने’ या परिषदेत जावडेकर यांच्याशिवाय भाजपाचे अतिरिक्त सरचिटणीस मुरलीधर राव, संघाचे मुकुल कानिटकर आणि एनसीईआरटीचे माजी संचालक जे.एस. ठाकूर प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाले होते. ठाकूर यांनी सरकारी शाळाप्रणाली भक्कम करण्यावर जोर दिला. भारताच्या सर्वंकष विकासाचा मार्ग गावच्या सरकारी शाळेतूनच जायला हवा; अन्यथा विद्यमान व्यवस्था वर्गभेदालाच जन्म देईल. सरकारी शाळांच्या स्थितीत सुधारणा होणार नाही तोपर्यंत बौद्धिक संपदा विकसित होऊ शकत नाही, असेही ठाकूर म्हणाले. मुकुल कानिटकर यांनी संपूर्ण शिक्षणव्यवस्था शिक्षकांच्या हातात सोपविण्याची मागणी करून शिक्षणव्यवस्थेचे सामाजिकीकरण करण्यावर भर दिला. मुरलीधर राव म्हणाले की, देशात सर्व वर्गांना समान अधिकार आहे. त्यामुळे येथील शिक्षणव्यवस्थेत विशेष शिक्षणप्रणाली चालू शकत नाही. भारतीय भाषांना महत्त्व देण्याची गरज असल्याचे सांगून नव्या धोरणात संस्कृतला पुनरुज्जीवित करण्याचा सल्ला त्यांनी दिला.आरोपाच्या भीतीमुळे संघाचे गुण कापले जातील?1जावडेकर यांनी निवृत्त प्राथमिक शिक्षिका असलेल्या त्यांच्या आईसोबतचा एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले की, मी चौथीच्या वर्गात असताना माझ्या वर्गाच्या उत्तरपत्रिका आईकडे तपासणीसाठी आल्या. आईने त्याबाबत काहीही सांगितले नाही; परंतु निकाल मिळाल्यानंतर मला कळले की, सर्व उत्तरे बिनचूक असूनही आईने दोन गुण कापले होते. 2याबाबत आईला असे का केलेस म्हणून विचारले असता, मुलगा असल्यामुळे दोन गुण जास्त दिल्याचा आरोप होऊ नये म्हणून गुण कापले होते, असे उत्तर मिळाले. या घटनेच्या उल्लेखाचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. 3जावडेकर यांनी या उदाहरणाद्वारे आरोपाच्या भीतीमुळे संघाचे गुण कापले जातील, असा संदेश संघ प्रचारकांना देण्याचा प्रयत्न केल्याचे मानण्यात येते. प्रस्तावित शिक्षण धोरणाबाबत सूचना मागविण्यात आल्या असून, अधिकाधिक लोकांनी सरकारला सूचना कळवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.