शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

भूकंपामुळे नेपाळमधून पलायनाचा धोका वाढणार!

By admin | Updated: May 1, 2015 22:44 IST

रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीच्या आकर्षणाने गेल्या अनेक शतकांपासून नेपाळमधील लोक भारतात येत आहेत. परंतु २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने

डेहराडून : रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीच्या आकर्षणाने गेल्या अनेक शतकांपासून नेपाळमधील लोक भारतात येत आहेत. परंतु २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने झालेल्या विध्वंसामुळे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या देशातून लोकांचे वेगाने पलायन होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेपाळी अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या पर्यटन व्यवसायाचे अतोनात नुकसान झाल्यानंतर काठमांडूसह नेपाळच्या विविध भागातून लोकांचे स्थलांतरण सुरू झाले आहे. लोकांचा हा लोंढा कुठल्या दिशेने जात आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भारतातील आणि विशेषत: नेपाळला लागून असलेल्या उत्तराखंडमध्ये गुप्तचर संस्थांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर) अशोककुमार यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, आम्ही भारत-नेपाळ सीमेवर गुप्तचर यंत्रणेला सतर्क केले आहे. भारत आणि नेपाळदरम्यान उत्तराखंडमध्ये सुमारे २७५ किमी लांब सीमारेषा आहे. तूर्तास भारत सरकारने नियम श्थििल करून सीमेवरून लोकांना कुठल्याही पक्षपाताशिवाय देशात प्रवेशाची परवानगी दिली आहे. भूकंपाची आपत्ती लक्षात घेऊन माणुसकीच्या भावनेतून कुठलेही नागरिकत्व असलेल्या व्यक्तीस नेपाळच्या सीमेतून भारतात येऊ देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार भूकंपामुळे नेपाळमधील अर्थव्यवस्थेचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारत आणि नेपाळी जनतेमध्ये दृढ असे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. त्यामुळे नेपाळमधून पलायन करणारे लोक उत्तराखंड आणि सिक्किमच्या मार्गे भारतात येण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)