शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

भूकंपामुळे नेपाळमधून पलायनाचा धोका वाढणार!

By admin | Updated: May 1, 2015 22:44 IST

रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीच्या आकर्षणाने गेल्या अनेक शतकांपासून नेपाळमधील लोक भारतात येत आहेत. परंतु २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने

डेहराडून : रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीच्या आकर्षणाने गेल्या अनेक शतकांपासून नेपाळमधील लोक भारतात येत आहेत. परंतु २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने झालेल्या विध्वंसामुळे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या देशातून लोकांचे वेगाने पलायन होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेपाळी अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या पर्यटन व्यवसायाचे अतोनात नुकसान झाल्यानंतर काठमांडूसह नेपाळच्या विविध भागातून लोकांचे स्थलांतरण सुरू झाले आहे. लोकांचा हा लोंढा कुठल्या दिशेने जात आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भारतातील आणि विशेषत: नेपाळला लागून असलेल्या उत्तराखंडमध्ये गुप्तचर संस्थांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर) अशोककुमार यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, आम्ही भारत-नेपाळ सीमेवर गुप्तचर यंत्रणेला सतर्क केले आहे. भारत आणि नेपाळदरम्यान उत्तराखंडमध्ये सुमारे २७५ किमी लांब सीमारेषा आहे. तूर्तास भारत सरकारने नियम श्थििल करून सीमेवरून लोकांना कुठल्याही पक्षपाताशिवाय देशात प्रवेशाची परवानगी दिली आहे. भूकंपाची आपत्ती लक्षात घेऊन माणुसकीच्या भावनेतून कुठलेही नागरिकत्व असलेल्या व्यक्तीस नेपाळच्या सीमेतून भारतात येऊ देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार भूकंपामुळे नेपाळमधील अर्थव्यवस्थेचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारत आणि नेपाळी जनतेमध्ये दृढ असे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. त्यामुळे नेपाळमधून पलायन करणारे लोक उत्तराखंड आणि सिक्किमच्या मार्गे भारतात येण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)