शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

भूकंपामुळे नेपाळमधून पलायनाचा धोका वाढणार!

By admin | Updated: May 1, 2015 22:44 IST

रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीच्या आकर्षणाने गेल्या अनेक शतकांपासून नेपाळमधील लोक भारतात येत आहेत. परंतु २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने

डेहराडून : रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीच्या आकर्षणाने गेल्या अनेक शतकांपासून नेपाळमधील लोक भारतात येत आहेत. परंतु २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने झालेल्या विध्वंसामुळे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या देशातून लोकांचे वेगाने पलायन होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेपाळी अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या पर्यटन व्यवसायाचे अतोनात नुकसान झाल्यानंतर काठमांडूसह नेपाळच्या विविध भागातून लोकांचे स्थलांतरण सुरू झाले आहे. लोकांचा हा लोंढा कुठल्या दिशेने जात आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भारतातील आणि विशेषत: नेपाळला लागून असलेल्या उत्तराखंडमध्ये गुप्तचर संस्थांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर) अशोककुमार यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, आम्ही भारत-नेपाळ सीमेवर गुप्तचर यंत्रणेला सतर्क केले आहे. भारत आणि नेपाळदरम्यान उत्तराखंडमध्ये सुमारे २७५ किमी लांब सीमारेषा आहे. तूर्तास भारत सरकारने नियम श्थििल करून सीमेवरून लोकांना कुठल्याही पक्षपाताशिवाय देशात प्रवेशाची परवानगी दिली आहे. भूकंपाची आपत्ती लक्षात घेऊन माणुसकीच्या भावनेतून कुठलेही नागरिकत्व असलेल्या व्यक्तीस नेपाळच्या सीमेतून भारतात येऊ देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार भूकंपामुळे नेपाळमधील अर्थव्यवस्थेचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारत आणि नेपाळी जनतेमध्ये दृढ असे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. त्यामुळे नेपाळमधून पलायन करणारे लोक उत्तराखंड आणि सिक्किमच्या मार्गे भारतात येण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)