शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

भूकंपामुळे नेपाळमधून पलायनाचा धोका वाढणार!

By admin | Updated: May 1, 2015 22:44 IST

रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीच्या आकर्षणाने गेल्या अनेक शतकांपासून नेपाळमधील लोक भारतात येत आहेत. परंतु २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने

डेहराडून : रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीच्या आकर्षणाने गेल्या अनेक शतकांपासून नेपाळमधील लोक भारतात येत आहेत. परंतु २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने झालेल्या विध्वंसामुळे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या देशातून लोकांचे वेगाने पलायन होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेपाळी अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या पर्यटन व्यवसायाचे अतोनात नुकसान झाल्यानंतर काठमांडूसह नेपाळच्या विविध भागातून लोकांचे स्थलांतरण सुरू झाले आहे. लोकांचा हा लोंढा कुठल्या दिशेने जात आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भारतातील आणि विशेषत: नेपाळला लागून असलेल्या उत्तराखंडमध्ये गुप्तचर संस्थांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर) अशोककुमार यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, आम्ही भारत-नेपाळ सीमेवर गुप्तचर यंत्रणेला सतर्क केले आहे. भारत आणि नेपाळदरम्यान उत्तराखंडमध्ये सुमारे २७५ किमी लांब सीमारेषा आहे. तूर्तास भारत सरकारने नियम श्थििल करून सीमेवरून लोकांना कुठल्याही पक्षपाताशिवाय देशात प्रवेशाची परवानगी दिली आहे. भूकंपाची आपत्ती लक्षात घेऊन माणुसकीच्या भावनेतून कुठलेही नागरिकत्व असलेल्या व्यक्तीस नेपाळच्या सीमेतून भारतात येऊ देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार भूकंपामुळे नेपाळमधील अर्थव्यवस्थेचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारत आणि नेपाळी जनतेमध्ये दृढ असे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. त्यामुळे नेपाळमधून पलायन करणारे लोक उत्तराखंड आणि सिक्किमच्या मार्गे भारतात येण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)