शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आधी भुमीपूत्र म्हणत ऑस्ट्रेलियाने केला व्हिसा प्रोग्राम समाप्त, भारतीयांची अडचण

By admin | Updated: April 18, 2017 13:22 IST

ऑस्ट्रेलियात काम करत असलेल्या तब्बल 95 हजार परदेशी कर्मचा-यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे

ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 18 - देशात वाढत चाललेली बेरोजगारी कमी करण्यासाठी ऑस्ट्रिलेयाने आपला व्हिसा प्रोग्राम रद्द केला आहे. पण यामुळे ऑस्ट्रेलियात काम करत असलेल्या तब्बल 95 हजार परदेशी कर्मचा-यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. या कर्मचा-यांमध्ये जास्त संख्या भारतीयांची आहे. या व्हिसा प्रोग्रामला 457 व्हिसा म्हणून ओळखलं जातं. या व्हिसाअंतर्गत कंपन्यांना कुशल रोजगारात ऑस्ट्रेलियन कर्मचा-यांची कमतरता भासत असल्यास चार वर्षांसाठी परदेशी कर्मचा-याची नियुक्ती करण्याची परवानगी मिळते. 
 
"आम्ही एक इमिग्रेशन देश आहोत, पण यामुळे वास्तव बदलणार नाही. देशातील नोक-यांमध्ये ऑस्ट्रेलियन कर्मचा-यांना प्रथम संधी दिली गेली पाहिजे. यासाठीच आम्ही 457 व्हिसा, ज्याच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपासाठी परदेशी कर्मचारी ऑस्ट्रेलियात येतात तो बंद करत आहोत", असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी सांगितलं आहे.
 
 
हा व्हिसा ज्यांच्याकडे आहे त्यांच्यामध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे. भारतानंतर ब्रिटन आणि चीनचा क्रमांक आहे. "457 व्हिसाला आता रोजगारासाठी पासपोर्ट होण्याची परवानगी मिळणार नाही, हे रोजगार ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना मिळाले पाहिजेत", असंही ते बोलले आहेत.
 
मिळालेल्या आकडेवारीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये एकूण 95,757 परदेशी नागरिक 457 व्हिसा अंतर्गत काम करत होते. आता हा व्हिसा कार्यक्रम रद्द करत दुसरा व्हिसा कार्यक्रम आणला जाणार आहे. या नव्या व्हिसा कार्यक्रमात नवे निर्बंध लागू करण्यात येतील. 
 
"नव्या व्हिसा कार्यक्रमात हे नक्की केलं जाईल की ज्या क्षेत्रामध्ये खरोखर कुशल कामगारांची कमतरता आहे तिथेच परदेशी नगारिकांना नोकरी मिळावी. फक्त आणि फक्त परदेशी नागरिकांना नोकरी देणं जास्त सोपं आहे या कारणासाठी त्यांना नोकरी न देता तिथे ऑस्ट्रेलियान नागरिकालाच नोकरी मिळेल याची काळजी घेतली जाईल", असं पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी स्पष्ट केलं आहे. पपंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी भारत दौ-यावरुन परतल्यानंतर ही घोषणा केली आहे.