शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आधी भुमीपूत्र म्हणत ऑस्ट्रेलियाने केला व्हिसा प्रोग्राम समाप्त, भारतीयांची अडचण

By admin | Updated: April 18, 2017 13:22 IST

ऑस्ट्रेलियात काम करत असलेल्या तब्बल 95 हजार परदेशी कर्मचा-यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे

ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 18 - देशात वाढत चाललेली बेरोजगारी कमी करण्यासाठी ऑस्ट्रिलेयाने आपला व्हिसा प्रोग्राम रद्द केला आहे. पण यामुळे ऑस्ट्रेलियात काम करत असलेल्या तब्बल 95 हजार परदेशी कर्मचा-यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. या कर्मचा-यांमध्ये जास्त संख्या भारतीयांची आहे. या व्हिसा प्रोग्रामला 457 व्हिसा म्हणून ओळखलं जातं. या व्हिसाअंतर्गत कंपन्यांना कुशल रोजगारात ऑस्ट्रेलियन कर्मचा-यांची कमतरता भासत असल्यास चार वर्षांसाठी परदेशी कर्मचा-याची नियुक्ती करण्याची परवानगी मिळते. 
 
"आम्ही एक इमिग्रेशन देश आहोत, पण यामुळे वास्तव बदलणार नाही. देशातील नोक-यांमध्ये ऑस्ट्रेलियन कर्मचा-यांना प्रथम संधी दिली गेली पाहिजे. यासाठीच आम्ही 457 व्हिसा, ज्याच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपासाठी परदेशी कर्मचारी ऑस्ट्रेलियात येतात तो बंद करत आहोत", असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी सांगितलं आहे.
 
 
हा व्हिसा ज्यांच्याकडे आहे त्यांच्यामध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे. भारतानंतर ब्रिटन आणि चीनचा क्रमांक आहे. "457 व्हिसाला आता रोजगारासाठी पासपोर्ट होण्याची परवानगी मिळणार नाही, हे रोजगार ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना मिळाले पाहिजेत", असंही ते बोलले आहेत.
 
मिळालेल्या आकडेवारीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये एकूण 95,757 परदेशी नागरिक 457 व्हिसा अंतर्गत काम करत होते. आता हा व्हिसा कार्यक्रम रद्द करत दुसरा व्हिसा कार्यक्रम आणला जाणार आहे. या नव्या व्हिसा कार्यक्रमात नवे निर्बंध लागू करण्यात येतील. 
 
"नव्या व्हिसा कार्यक्रमात हे नक्की केलं जाईल की ज्या क्षेत्रामध्ये खरोखर कुशल कामगारांची कमतरता आहे तिथेच परदेशी नगारिकांना नोकरी मिळावी. फक्त आणि फक्त परदेशी नागरिकांना नोकरी देणं जास्त सोपं आहे या कारणासाठी त्यांना नोकरी न देता तिथे ऑस्ट्रेलियान नागरिकालाच नोकरी मिळेल याची काळजी घेतली जाईल", असं पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी स्पष्ट केलं आहे. पपंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी भारत दौ-यावरुन परतल्यानंतर ही घोषणा केली आहे.