शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

मंदिरामध्ये निकाह होणारे खेरा सधन

By admin | Updated: September 12, 2014 16:17 IST

लव्ह जिहादवरुन उत्तरप्रदेशमधील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच आग्राजवळील खेरा सधन या गावातील हिंदू - मुस्लिमांना आंतरधार्मीय विवाह करण्यात काहीच गैर वाटत नाही.

ऑनलाइन लोकमत

आग्रा, दि. १२ - लव्ह जिहादवरुन उत्तरप्रदेशमधील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच आग्राजवळील खेरा सधन या गावातील हिंदू - मुस्लिमांना आंतरधार्मीय विवाह करण्यात काहीच गैर वाटत नाही. विशेष बाब म्हणजे या गावातील एकाच कुटुंबातील काही जण हिंदू तर काही जण मुस्लिम असून धर्मनिरपेक्षतेचा वस्तूपाठच या गावाने घालून दिला आहे. 

आग्र्यापासून ५० किलोमीटर अंतरावर खेरा सधन हे गाव आहे. औरंगजेबाच्या काळात या गावातील ग्रामस्थांना इस्लाम धर्म स्वीकारा अन्यथा ठार मारु अशी धमकी देण्यात आली होती. त्या काळात ग्रामस्थांनी भीतीपोटी इस्लाम धर्म स्वीकारला होता. ही गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. स्वातंत्र्यानंतर काही हिंदूत्ववादी संघटनांनी ग्रामस्थांनी पुन्हा हिंदू धर्मात परतावे यासाठी अथक प्रयत्न केले. यानंतर काहींनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला तर काहींनी मुस्लिम म्हणून राहणेच पसंत केले. उत्तरप्रदेशमध्ये जातीय हिंसा वाढत असतानाच या गावाने हिंदू - मुस्लिम सुखानेही राहू शकतात याचा आदर्शच निर्माण केला आहे. गावातील एकाच कुटुंबातील चार पैकी दोन भाऊ हिंदू आहेत. तर दोघे जण मुस्लिम. हेच चित्र गावातील अनेक घरांमध्ये दिसते. गावात हिंदू - मुस्लिम तरुणतरुणींचे सर्रास लग्न होते व यावर कोणाचाही आक्षेप नसतो. 'मला लव्ह जिहाद हा वाद निरर्थक वाटतो. माझी आई खुशनूमा मुस्लिम तर वडिल कमलेश सिंह हे ठाकूर आहेत. माझी बहिण सीताने इंझमामशी लग्न केले, माझी पत्नी शबानाला आमच्या मुलाचे नाव संतोष ठेवायचे आहे, यातच सर्वकाही आले' असे या गावात राहणारा विक्रम सिंह सांगतो. 
हिंदू - मुस्लिम एकोप्याची अनेक उदाहरणं गावात आहेत. ५५ वर्षीय शौकत अली यांचा लहान भाऊ राजू सिंह याने नुकतेच लाजोशी लग्न केले. लाजो ही सुनील ठाकूर व रेश्मी यांची मुलगी आहे. हा निकाह गावातील मंदिरातच पार पडला. हिंदू पूजेसाठी दर्ग्यात जातात आणि मुस्लिम मंदिरांमध्ये जातात. 
आमच्या पूर्वजांनी औरंगजेबाने दिलेल्या प्रस्तावानुसार इस्लाम धर्म स्वीकारला. सूंता करणे, मांस खाणे आणि मृतदेहाला पुरणे या तीन गोष्टींचे आम्ही प्रामुख्याने पालन करतो असे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. तर गावातील तरुणांना इतिहासाशी घेणदेणंच नाही. आम्हाला इतिहासात जायचे नाही. आमच्या गावात वेगळेपण आहे. जगा आणि जगू द्या हेच आमचे सूत्र आहे असे या गावातील एका तरुणीने सांगितले.