शहरं
Join us  
Trending Stories
1
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
2
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

मंदिरामध्ये निकाह होणारे खेरा सधन

By admin | Updated: September 12, 2014 16:17 IST

लव्ह जिहादवरुन उत्तरप्रदेशमधील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच आग्राजवळील खेरा सधन या गावातील हिंदू - मुस्लिमांना आंतरधार्मीय विवाह करण्यात काहीच गैर वाटत नाही.

ऑनलाइन लोकमत

आग्रा, दि. १२ - लव्ह जिहादवरुन उत्तरप्रदेशमधील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच आग्राजवळील खेरा सधन या गावातील हिंदू - मुस्लिमांना आंतरधार्मीय विवाह करण्यात काहीच गैर वाटत नाही. विशेष बाब म्हणजे या गावातील एकाच कुटुंबातील काही जण हिंदू तर काही जण मुस्लिम असून धर्मनिरपेक्षतेचा वस्तूपाठच या गावाने घालून दिला आहे. 

आग्र्यापासून ५० किलोमीटर अंतरावर खेरा सधन हे गाव आहे. औरंगजेबाच्या काळात या गावातील ग्रामस्थांना इस्लाम धर्म स्वीकारा अन्यथा ठार मारु अशी धमकी देण्यात आली होती. त्या काळात ग्रामस्थांनी भीतीपोटी इस्लाम धर्म स्वीकारला होता. ही गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. स्वातंत्र्यानंतर काही हिंदूत्ववादी संघटनांनी ग्रामस्थांनी पुन्हा हिंदू धर्मात परतावे यासाठी अथक प्रयत्न केले. यानंतर काहींनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला तर काहींनी मुस्लिम म्हणून राहणेच पसंत केले. उत्तरप्रदेशमध्ये जातीय हिंसा वाढत असतानाच या गावाने हिंदू - मुस्लिम सुखानेही राहू शकतात याचा आदर्शच निर्माण केला आहे. गावातील एकाच कुटुंबातील चार पैकी दोन भाऊ हिंदू आहेत. तर दोघे जण मुस्लिम. हेच चित्र गावातील अनेक घरांमध्ये दिसते. गावात हिंदू - मुस्लिम तरुणतरुणींचे सर्रास लग्न होते व यावर कोणाचाही आक्षेप नसतो. 'मला लव्ह जिहाद हा वाद निरर्थक वाटतो. माझी आई खुशनूमा मुस्लिम तर वडिल कमलेश सिंह हे ठाकूर आहेत. माझी बहिण सीताने इंझमामशी लग्न केले, माझी पत्नी शबानाला आमच्या मुलाचे नाव संतोष ठेवायचे आहे, यातच सर्वकाही आले' असे या गावात राहणारा विक्रम सिंह सांगतो. 
हिंदू - मुस्लिम एकोप्याची अनेक उदाहरणं गावात आहेत. ५५ वर्षीय शौकत अली यांचा लहान भाऊ राजू सिंह याने नुकतेच लाजोशी लग्न केले. लाजो ही सुनील ठाकूर व रेश्मी यांची मुलगी आहे. हा निकाह गावातील मंदिरातच पार पडला. हिंदू पूजेसाठी दर्ग्यात जातात आणि मुस्लिम मंदिरांमध्ये जातात. 
आमच्या पूर्वजांनी औरंगजेबाने दिलेल्या प्रस्तावानुसार इस्लाम धर्म स्वीकारला. सूंता करणे, मांस खाणे आणि मृतदेहाला पुरणे या तीन गोष्टींचे आम्ही प्रामुख्याने पालन करतो असे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. तर गावातील तरुणांना इतिहासाशी घेणदेणंच नाही. आम्हाला इतिहासात जायचे नाही. आमच्या गावात वेगळेपण आहे. जगा आणि जगू द्या हेच आमचे सूत्र आहे असे या गावातील एका तरुणीने सांगितले.