शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोदी सरकारच्या काळात मानवी हक्कांचे 'बुरे दिन'

By admin | Updated: February 25, 2015 12:58 IST

नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढले आहे असा दावा अॅमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. २५ - नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढले आहे असा दावा अॅमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने केले आहे. मोदी सरकारच्या भूमी अधिग्रहण अध्यादेशामुळे हजारो भारतीयांना धोका निर्माण झाला आहे असे परखड मतही अॅमनेस्टी इंटरनॅशनलने मांडले असून अॅमनेस्टीच्या अहवालामुळे मोदी सरकारची नाचक्की झाली आहे. 

अॅमनेस्टी इंटरनॅशनल या मानवी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेने २०१५ चा वार्षिक अहवाल नुकताच सादर केला. यामध्ये भारताच्या सद्य स्थितीवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या दंगली, ख्रिश्चन व मुसलमांना बळजबरीने हिंदू धर्म स्वीकारायला लावणे या घटनांवर अॅमनेस्टी इंटरनॅशनलने चिंता व्यक्त केली आहे.  याशिवाय भूमी अधिग्रहण अध्यादेशावरही अॅमनेस्टीने आक्षेप घेतला आहे. भूमी अधिग्रहण विधेयकात त्याच्या सामाजिक परिणामांचा विचारच केला गेला नाही. या विधेयकामुळे हजारो भारतीयांना त्यांच्या घर व जमिनीवर पाणी सोडावे लागेल अशी भितीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या विधेयकाचा प्रमुख फटका खाण, धरणाजवळ राहणा-या आदिवासी समाजालाच बसेल असे अॅमनेस्टीने म्हटले आहे. सरकारी अधिका-यांकडून व्यक्ती स्वातंत्र्यांचे उल्लंघन होत आहे असा उल्लेखही अहवालात आहे. 

अहवालात मोदी सरकारच्या कामाचे कौतुकही करण्यात आली आहे. सुशासन आणि विकासाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने गोरगरिबांपर्यंत सरकारी निधी पोहोचवण्याची कटीबद्धता दाखवून दिली असे कौतुक अॅमनेस्टीच्या अहवालात करण्यात आले.