शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

मोदी सरकारच्या काळात मानवी हक्कांचे 'बुरे दिन'

By admin | Updated: February 25, 2015 12:58 IST

नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढले आहे असा दावा अॅमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. २५ - नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढले आहे असा दावा अॅमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने केले आहे. मोदी सरकारच्या भूमी अधिग्रहण अध्यादेशामुळे हजारो भारतीयांना धोका निर्माण झाला आहे असे परखड मतही अॅमनेस्टी इंटरनॅशनलने मांडले असून अॅमनेस्टीच्या अहवालामुळे मोदी सरकारची नाचक्की झाली आहे. 

अॅमनेस्टी इंटरनॅशनल या मानवी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेने २०१५ चा वार्षिक अहवाल नुकताच सादर केला. यामध्ये भारताच्या सद्य स्थितीवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या दंगली, ख्रिश्चन व मुसलमांना बळजबरीने हिंदू धर्म स्वीकारायला लावणे या घटनांवर अॅमनेस्टी इंटरनॅशनलने चिंता व्यक्त केली आहे.  याशिवाय भूमी अधिग्रहण अध्यादेशावरही अॅमनेस्टीने आक्षेप घेतला आहे. भूमी अधिग्रहण विधेयकात त्याच्या सामाजिक परिणामांचा विचारच केला गेला नाही. या विधेयकामुळे हजारो भारतीयांना त्यांच्या घर व जमिनीवर पाणी सोडावे लागेल अशी भितीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या विधेयकाचा प्रमुख फटका खाण, धरणाजवळ राहणा-या आदिवासी समाजालाच बसेल असे अॅमनेस्टीने म्हटले आहे. सरकारी अधिका-यांकडून व्यक्ती स्वातंत्र्यांचे उल्लंघन होत आहे असा उल्लेखही अहवालात आहे. 

अहवालात मोदी सरकारच्या कामाचे कौतुकही करण्यात आली आहे. सुशासन आणि विकासाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने गोरगरिबांपर्यंत सरकारी निधी पोहोचवण्याची कटीबद्धता दाखवून दिली असे कौतुक अॅमनेस्टीच्या अहवालात करण्यात आले.