शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

टिकाऊ वस्तू तब्बल पाचपट महागणार!

By admin | Updated: January 8, 2015 23:43 IST

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कातील सवलत मागे घेतल्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. ही दरवाढ अंतिमत: ग्राहकांच्याच माथी जाणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उत्पादन शुल्कातील सवलत मागे घेतल्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. ही दरवाढ अंतिमत: ग्राहकांच्याच माथी जाणार आहे. कंपन्या टिकाऊ वस्तूंच्या किमतीत ५ पट वाढ करीत आहेत. हायर, व्हर्लपूल, पॅनासोनिक, गोदरेज आणि डाईकिन या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढविण्यास सुरुवात केली आहे. हायर इंडियाचे अध्यक्ष एरिक ब्रेगेंझा यांनी सांगितले की, उत्पादन शुल्काची सवलत संपल्यामुळे किमतीत वाढ करणे अपरिहार्य झाले आहे. आम्ही आमच्या उत्पादनाच्या किमती तीन ते पाच टक्क्यांपर्यंत वाढविणार आहोत. मॉडेलनुसार दरवाढीत फरक पडेल. ही दरवाढ नव्या स्टॉकवर लागू असेल. गोदरेज अप्लायंसेजचे व्यवसायप्रमुख कमल नंदी यांनी सांगितले की, आम्ही आमच्या उत्पादनाच्या किमतीत ४ ते पाच टक्के वाढ करीत आहोत. उत्पादन शुल्क वाढीबरोबरच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे कच्चा माल महागला आहे. त्यामुळे आम्हाला किमती वाढविणे आवश्यक झाले आहे. पॅनासोनिकचे प्रबंध संचालक मनीष शर्मा यांनी सांगितले की, उत्पादन शुल्क सवलत बंद करण्याचे व्यापक परिणाम होतील. वस्तू महाग झाल्याने बाजारातील धारणेवर परिणाम होईल. विक्री घटेल. टिकाऊ वस्तू बनविणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारने २ टक्के सवलत दिलेली होती. ही सवलत ३१ डिसेंबरला संपली. तिला मुदवाढ देण्यास सरकारने नकार दिल्यानंतर उत्पादन शुल्क १२ टक्के झाले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ते १0 टक्के होते. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या वस्तूंना टिकाऊ वस्तू असे म्हणतात. इंग्रजीत कंझ्युमर ड्यूरेबल्स या नावाने या वस्तू ओळखल्या जातात. यात टीव्ही, रेफ्रिजरेटर यासारखी घरगुती उपकरणे तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने यांचा समावेश होतो.कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवीत असताना शेतमालाचे भाव मात्र कोसळत आहेत. कापसासारख्या नगदी पिकाचा भावही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाला आहे. भाजीपाल्याचे भाव गेल्या आठवड्यापासून कोसळले आहेत. शेतकऱ्यांनाही भाववाढ करण्याची सोय असावी, अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.