शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

टिकाऊ वस्तू तब्बल पाचपट महागणार!

By admin | Updated: January 8, 2015 23:43 IST

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कातील सवलत मागे घेतल्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. ही दरवाढ अंतिमत: ग्राहकांच्याच माथी जाणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उत्पादन शुल्कातील सवलत मागे घेतल्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. ही दरवाढ अंतिमत: ग्राहकांच्याच माथी जाणार आहे. कंपन्या टिकाऊ वस्तूंच्या किमतीत ५ पट वाढ करीत आहेत. हायर, व्हर्लपूल, पॅनासोनिक, गोदरेज आणि डाईकिन या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढविण्यास सुरुवात केली आहे. हायर इंडियाचे अध्यक्ष एरिक ब्रेगेंझा यांनी सांगितले की, उत्पादन शुल्काची सवलत संपल्यामुळे किमतीत वाढ करणे अपरिहार्य झाले आहे. आम्ही आमच्या उत्पादनाच्या किमती तीन ते पाच टक्क्यांपर्यंत वाढविणार आहोत. मॉडेलनुसार दरवाढीत फरक पडेल. ही दरवाढ नव्या स्टॉकवर लागू असेल. गोदरेज अप्लायंसेजचे व्यवसायप्रमुख कमल नंदी यांनी सांगितले की, आम्ही आमच्या उत्पादनाच्या किमतीत ४ ते पाच टक्के वाढ करीत आहोत. उत्पादन शुल्क वाढीबरोबरच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे कच्चा माल महागला आहे. त्यामुळे आम्हाला किमती वाढविणे आवश्यक झाले आहे. पॅनासोनिकचे प्रबंध संचालक मनीष शर्मा यांनी सांगितले की, उत्पादन शुल्क सवलत बंद करण्याचे व्यापक परिणाम होतील. वस्तू महाग झाल्याने बाजारातील धारणेवर परिणाम होईल. विक्री घटेल. टिकाऊ वस्तू बनविणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारने २ टक्के सवलत दिलेली होती. ही सवलत ३१ डिसेंबरला संपली. तिला मुदवाढ देण्यास सरकारने नकार दिल्यानंतर उत्पादन शुल्क १२ टक्के झाले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ते १0 टक्के होते. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या वस्तूंना टिकाऊ वस्तू असे म्हणतात. इंग्रजीत कंझ्युमर ड्यूरेबल्स या नावाने या वस्तू ओळखल्या जातात. यात टीव्ही, रेफ्रिजरेटर यासारखी घरगुती उपकरणे तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने यांचा समावेश होतो.कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवीत असताना शेतमालाचे भाव मात्र कोसळत आहेत. कापसासारख्या नगदी पिकाचा भावही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाला आहे. भाजीपाल्याचे भाव गेल्या आठवड्यापासून कोसळले आहेत. शेतकऱ्यांनाही भाववाढ करण्याची सोय असावी, अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.