शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

वाहतुकीची कोंडी पोलीस आयुक्तांनाच भोवली

By admin | Updated: July 31, 2016 05:30 IST

गुरगावमध्ये वाहतुकीची स्थिती सुधारत असली तरी नव्याने काही ठिकाणी पुन्हा कोंडी झाल्याचे वृत्त आहे.

गुरगाव : मुसळधार पावसानंतर शहरात वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरगावचे पोलीस आयुक्त नवदीपसिंग विर्क यांची शनिवारी रोहतक येथे बदली करण्यात आली. गुरगावमध्ये वाहतुकीची स्थिती सुधारत असली तरी नव्याने काही ठिकाणी पुन्हा कोंडी झाल्याचे वृत्त आहे. शहराच्या अनेक भागांत अद्यापही पाणी साचले असून, त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.मुसळधार पावसामुळे शुक्रवारी शहराचे अनेक भाग आणि रस्ते जलमय होऊन वाहतुकीची न भुतो अशी कोंडी झाली होती. महामार्गावर वाहनांच्या १५ कि.मी.पर्यंत रांगा लागल्यासह हजारो लोक अनेक तास अडकून पडले होते. हलता येईना अन् डुलता येईनाच्या स्थितीमुळे हाहाकार माजला होता. ही समस्या शनिवारी काही अंशी सुटली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी हीरो होंडा चौकासह शहरातील १४ महत्त्वपूर्ण ठिकाणी पोलीस ठेवण्यात आले आहेत. वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहतूककोंडी काही अंशी फुटली असली तरी सोहना रोडसह इतर प्रमुख मार्गांवर नव्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त असून, बादशाहपूर वाटिका चौकात ५ कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.दिल्ली व उपनगरांत मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ८वर प्रचंड पाणी साचल्यामुळे वाहतूककोंडी झाली. या मार्गावर दोन दिवसांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहर ठप्प झाल्यामुळे प्रशासनाला हीरो होंडा चौकात जमावबंदी लागू करण्यासह शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश द्यावे लागले होते. शहरातील मुख्य चौकांत जमावबंदी लागू केल्यानंतर वाहतूक काही अंशी सुधारली. वाहतूक सुरू झाल्यानंतर शुक्रवारी रात्री जमावबंदीचे आदेश मागे घेण्यात आले. मात्र, रात्रभरच्या पावसामुळे वाहनांची गती मंदावली. राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ आणि शहरात हीरो होंडा चौक, राजीव चौक, झरसा चौक, सिग्नेचर टॉवर चौक, इफ्को चौक, शंकर चौक, सुभाष चौक, सोहना रोड, गोल्फ कोर्स एक्सटेंशन रोड, सोहनाचा मुख्य चौक, महाराणा प्रताप चौक, मानेसर चौक, हुडा सिटी सेंटर स्टेशन येथे २४ तास पोलीस असून, ते वाहतुकीचे नियमन करीत आहेत. (वृत्तसंस्था)>हुड्डांचा हल्लामाजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी वाहतूककोंडीसाठी खट्टर सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मला अनेकांकडून ते अनेक तास अडकून पडल्याचे समजले. हे संकट टाळता आले असते. आमच्या काळात द्वारका द्रुतगती महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण केले होते. या सरकारला २ वर्षांत १० टक्के कामही पूर्ण करता आले नाही.