शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीची कोंडी पोलीस आयुक्तांनाच भोवली

By admin | Updated: July 31, 2016 05:30 IST

गुरगावमध्ये वाहतुकीची स्थिती सुधारत असली तरी नव्याने काही ठिकाणी पुन्हा कोंडी झाल्याचे वृत्त आहे.

गुरगाव : मुसळधार पावसानंतर शहरात वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरगावचे पोलीस आयुक्त नवदीपसिंग विर्क यांची शनिवारी रोहतक येथे बदली करण्यात आली. गुरगावमध्ये वाहतुकीची स्थिती सुधारत असली तरी नव्याने काही ठिकाणी पुन्हा कोंडी झाल्याचे वृत्त आहे. शहराच्या अनेक भागांत अद्यापही पाणी साचले असून, त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.मुसळधार पावसामुळे शुक्रवारी शहराचे अनेक भाग आणि रस्ते जलमय होऊन वाहतुकीची न भुतो अशी कोंडी झाली होती. महामार्गावर वाहनांच्या १५ कि.मी.पर्यंत रांगा लागल्यासह हजारो लोक अनेक तास अडकून पडले होते. हलता येईना अन् डुलता येईनाच्या स्थितीमुळे हाहाकार माजला होता. ही समस्या शनिवारी काही अंशी सुटली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी हीरो होंडा चौकासह शहरातील १४ महत्त्वपूर्ण ठिकाणी पोलीस ठेवण्यात आले आहेत. वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहतूककोंडी काही अंशी फुटली असली तरी सोहना रोडसह इतर प्रमुख मार्गांवर नव्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त असून, बादशाहपूर वाटिका चौकात ५ कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.दिल्ली व उपनगरांत मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ८वर प्रचंड पाणी साचल्यामुळे वाहतूककोंडी झाली. या मार्गावर दोन दिवसांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहर ठप्प झाल्यामुळे प्रशासनाला हीरो होंडा चौकात जमावबंदी लागू करण्यासह शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश द्यावे लागले होते. शहरातील मुख्य चौकांत जमावबंदी लागू केल्यानंतर वाहतूक काही अंशी सुधारली. वाहतूक सुरू झाल्यानंतर शुक्रवारी रात्री जमावबंदीचे आदेश मागे घेण्यात आले. मात्र, रात्रभरच्या पावसामुळे वाहनांची गती मंदावली. राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ आणि शहरात हीरो होंडा चौक, राजीव चौक, झरसा चौक, सिग्नेचर टॉवर चौक, इफ्को चौक, शंकर चौक, सुभाष चौक, सोहना रोड, गोल्फ कोर्स एक्सटेंशन रोड, सोहनाचा मुख्य चौक, महाराणा प्रताप चौक, मानेसर चौक, हुडा सिटी सेंटर स्टेशन येथे २४ तास पोलीस असून, ते वाहतुकीचे नियमन करीत आहेत. (वृत्तसंस्था)>हुड्डांचा हल्लामाजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी वाहतूककोंडीसाठी खट्टर सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मला अनेकांकडून ते अनेक तास अडकून पडल्याचे समजले. हे संकट टाळता आले असते. आमच्या काळात द्वारका द्रुतगती महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण केले होते. या सरकारला २ वर्षांत १० टक्के कामही पूर्ण करता आले नाही.