शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

वाहतुकीची कोंडी पोलीस आयुक्तांनाच भोवली

By admin | Updated: July 31, 2016 05:30 IST

गुरगावमध्ये वाहतुकीची स्थिती सुधारत असली तरी नव्याने काही ठिकाणी पुन्हा कोंडी झाल्याचे वृत्त आहे.

गुरगाव : मुसळधार पावसानंतर शहरात वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरगावचे पोलीस आयुक्त नवदीपसिंग विर्क यांची शनिवारी रोहतक येथे बदली करण्यात आली. गुरगावमध्ये वाहतुकीची स्थिती सुधारत असली तरी नव्याने काही ठिकाणी पुन्हा कोंडी झाल्याचे वृत्त आहे. शहराच्या अनेक भागांत अद्यापही पाणी साचले असून, त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.मुसळधार पावसामुळे शुक्रवारी शहराचे अनेक भाग आणि रस्ते जलमय होऊन वाहतुकीची न भुतो अशी कोंडी झाली होती. महामार्गावर वाहनांच्या १५ कि.मी.पर्यंत रांगा लागल्यासह हजारो लोक अनेक तास अडकून पडले होते. हलता येईना अन् डुलता येईनाच्या स्थितीमुळे हाहाकार माजला होता. ही समस्या शनिवारी काही अंशी सुटली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी हीरो होंडा चौकासह शहरातील १४ महत्त्वपूर्ण ठिकाणी पोलीस ठेवण्यात आले आहेत. वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहतूककोंडी काही अंशी फुटली असली तरी सोहना रोडसह इतर प्रमुख मार्गांवर नव्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त असून, बादशाहपूर वाटिका चौकात ५ कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.दिल्ली व उपनगरांत मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ८वर प्रचंड पाणी साचल्यामुळे वाहतूककोंडी झाली. या मार्गावर दोन दिवसांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहर ठप्प झाल्यामुळे प्रशासनाला हीरो होंडा चौकात जमावबंदी लागू करण्यासह शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश द्यावे लागले होते. शहरातील मुख्य चौकांत जमावबंदी लागू केल्यानंतर वाहतूक काही अंशी सुधारली. वाहतूक सुरू झाल्यानंतर शुक्रवारी रात्री जमावबंदीचे आदेश मागे घेण्यात आले. मात्र, रात्रभरच्या पावसामुळे वाहनांची गती मंदावली. राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ आणि शहरात हीरो होंडा चौक, राजीव चौक, झरसा चौक, सिग्नेचर टॉवर चौक, इफ्को चौक, शंकर चौक, सुभाष चौक, सोहना रोड, गोल्फ कोर्स एक्सटेंशन रोड, सोहनाचा मुख्य चौक, महाराणा प्रताप चौक, मानेसर चौक, हुडा सिटी सेंटर स्टेशन येथे २४ तास पोलीस असून, ते वाहतुकीचे नियमन करीत आहेत. (वृत्तसंस्था)>हुड्डांचा हल्लामाजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी वाहतूककोंडीसाठी खट्टर सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मला अनेकांकडून ते अनेक तास अडकून पडल्याचे समजले. हे संकट टाळता आले असते. आमच्या काळात द्वारका द्रुतगती महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण केले होते. या सरकारला २ वर्षांत १० टक्के कामही पूर्ण करता आले नाही.