शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

बार्शी तालुक्यातील दुबार पेरणीचे संकट ,पावसाने दिला महिन्याचा ब्रेक ८१ टक्के क्षेत्रावर झाल्या पेरण्या, तूर, सोयाबीनचे प्रमाण जास्त, काही भागात पेरणीच नाही

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

बार्शी: पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटून गेला तरी बार्शी तालुक्यात वरुणराजाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्याने व काही भागात काहीच न पडल्याने खरीप हंगामात ज्यांनी पेरणी केली आहे त्यांची पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत़ त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे तर काही भागात उन्हाळादेखील मोडला नसल्यामुळे पेरण्याच झाल्या नाहीत़ शेतकरी अक्षरश: सैरभैर झाला आहे़ याचबरोबर पाऊस पडेनासा झाल्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल मंदावली आहे़

बार्शी: पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटून गेला तरी बार्शी तालुक्यात वरुणराजाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्याने व काही भागात काहीच न पडल्याने खरीप हंगामात ज्यांनी पेरणी केली आहे त्यांची पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत़ त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे तर काही भागात उन्हाळादेखील मोडला नसल्यामुळे पेरण्याच झाल्या नाहीत़ शेतकरी अक्षरश: सैरभैर झाला आहे़ याचबरोबर पाऊस पडेनासा झाल्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल मंदावली आहे़
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे एक जून ते दहा जून या कालावधीत तालुक्याच्या काही भागात पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली़ त्यामुळे जूनमध्ये काही शेतकर्‍यांनी तो आणखीन पडेल या आशेने आहे त्या ओलीवर सोयाबीन, तूर, कापूस, उडीद,मूग आदी पिकांच्या पेरण्या उरकून घेतल्या़ ही परिस्थिती तालुक्यातील जवळपास पंचवीस ते तीस गावांत आहे़ मात्र उर्वरित तालुक्यांतील जवळपास बहुतांश गावात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे पेरणीच झाली नाही़ ज्या शेतकर्‍यांनी धाडस करुन पेरणी केली त्यांची पिके चांगल्या प्रमाणात उगवून आली मात्र १४ जूननंतर तब्बल एक महिना झाला पावसाने दडी मारल्यामुळे ही पिके माना टाकून सुकत आहेत़ त्यामुळे शेतकरी वर्गाबरोबरच सर्वच लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
खरिपाची पिके ही शेतकर्‍यांसाठी पैसे मिळवून देणारी असतात तसेच खरिपाच्या हंगामात चांगले उत्पादन झाल्यास दसरा,दिवाळी, गौरी गणपती आदी सणांबरोबरच रब्बी हंगामात पुढील शेतीच्या मशागतीसाठी शेतकर्‍यांना पैसे उपलब्ध होतात़ मात्र यंदा खरिपाचा हंगाम वाया गेल्यातच जमा आहे़
याचबरोबर मागील पंधरा ते वीस दिवसांपासून दररोज सकाळी ढग येत आहेत़ त्यामुळे पाऊस पडेल असे वाटत असतानाच दुपारनंतर ढग गायब होत असल्यामुळे रोजच निराशा होत आहे़ मागील तीन-चार दिवसांपासून वार्‍याबरोबरच कडक उन्हाचे प्रमाणदेखील वाढू लागल्यामुळे कशीबशी आलेली पिके सुकू लागली आहेत़
कोट
जुलैअखेरपर्यंत खरीप हंगामातील तूर, सोयाबीन हे पिके येऊ शकतात, मात्र त्यासाठी येत्या आठवडाभरात पाऊस पडणे अत्यंत गरजेचे आहे़ बार्शी तालुक्यातील काही गावात झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी जेमतेम पावसावर पेरण्या उरकल्या आहेत, मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे़
राजेंद्र चौधरी
तालुका कृषी अधिकारी
चौकट
बार्शी तालुक्यात खरीप हंगामात सरासरी २७१४४ हे़ क्षेत्रापैकी २२०५९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ८१ टक्के पेरण्या झाल्या आहेत़ यामध्ये मका ७८७ हे़, तूर ४९५७, उडीद २९६५, मूग ७४८,सोयाबीन १२१६८,कापूस २७८ हे़ या पिकांचा समावेश आहे़ बहुतांश शेतकर्‍यांनी सोयाबीन व तूरची पेरणी जास्त केल्याचे दिसत असून ही पिके लांबलेल्या पावसामुळे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे़