शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

बार्शी तालुक्यातील दुबार पेरणीचे संकट ,पावसाने दिला महिन्याचा ब्रेक ८१ टक्के क्षेत्रावर झाल्या पेरण्या, तूर, सोयाबीनचे प्रमाण जास्त, काही भागात पेरणीच नाही

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

बार्शी: पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटून गेला तरी बार्शी तालुक्यात वरुणराजाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्याने व काही भागात काहीच न पडल्याने खरीप हंगामात ज्यांनी पेरणी केली आहे त्यांची पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत़ त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे तर काही भागात उन्हाळादेखील मोडला नसल्यामुळे पेरण्याच झाल्या नाहीत़ शेतकरी अक्षरश: सैरभैर झाला आहे़ याचबरोबर पाऊस पडेनासा झाल्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल मंदावली आहे़

बार्शी: पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटून गेला तरी बार्शी तालुक्यात वरुणराजाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्याने व काही भागात काहीच न पडल्याने खरीप हंगामात ज्यांनी पेरणी केली आहे त्यांची पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत़ त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे तर काही भागात उन्हाळादेखील मोडला नसल्यामुळे पेरण्याच झाल्या नाहीत़ शेतकरी अक्षरश: सैरभैर झाला आहे़ याचबरोबर पाऊस पडेनासा झाल्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल मंदावली आहे़
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे एक जून ते दहा जून या कालावधीत तालुक्याच्या काही भागात पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली़ त्यामुळे जूनमध्ये काही शेतकर्‍यांनी तो आणखीन पडेल या आशेने आहे त्या ओलीवर सोयाबीन, तूर, कापूस, उडीद,मूग आदी पिकांच्या पेरण्या उरकून घेतल्या़ ही परिस्थिती तालुक्यातील जवळपास पंचवीस ते तीस गावांत आहे़ मात्र उर्वरित तालुक्यांतील जवळपास बहुतांश गावात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे पेरणीच झाली नाही़ ज्या शेतकर्‍यांनी धाडस करुन पेरणी केली त्यांची पिके चांगल्या प्रमाणात उगवून आली मात्र १४ जूननंतर तब्बल एक महिना झाला पावसाने दडी मारल्यामुळे ही पिके माना टाकून सुकत आहेत़ त्यामुळे शेतकरी वर्गाबरोबरच सर्वच लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
खरिपाची पिके ही शेतकर्‍यांसाठी पैसे मिळवून देणारी असतात तसेच खरिपाच्या हंगामात चांगले उत्पादन झाल्यास दसरा,दिवाळी, गौरी गणपती आदी सणांबरोबरच रब्बी हंगामात पुढील शेतीच्या मशागतीसाठी शेतकर्‍यांना पैसे उपलब्ध होतात़ मात्र यंदा खरिपाचा हंगाम वाया गेल्यातच जमा आहे़
याचबरोबर मागील पंधरा ते वीस दिवसांपासून दररोज सकाळी ढग येत आहेत़ त्यामुळे पाऊस पडेल असे वाटत असतानाच दुपारनंतर ढग गायब होत असल्यामुळे रोजच निराशा होत आहे़ मागील तीन-चार दिवसांपासून वार्‍याबरोबरच कडक उन्हाचे प्रमाणदेखील वाढू लागल्यामुळे कशीबशी आलेली पिके सुकू लागली आहेत़
कोट
जुलैअखेरपर्यंत खरीप हंगामातील तूर, सोयाबीन हे पिके येऊ शकतात, मात्र त्यासाठी येत्या आठवडाभरात पाऊस पडणे अत्यंत गरजेचे आहे़ बार्शी तालुक्यातील काही गावात झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी जेमतेम पावसावर पेरण्या उरकल्या आहेत, मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे़
राजेंद्र चौधरी
तालुका कृषी अधिकारी
चौकट
बार्शी तालुक्यात खरीप हंगामात सरासरी २७१४४ हे़ क्षेत्रापैकी २२०५९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ८१ टक्के पेरण्या झाल्या आहेत़ यामध्ये मका ७८७ हे़, तूर ४९५७, उडीद २९६५, मूग ७४८,सोयाबीन १२१६८,कापूस २७८ हे़ या पिकांचा समावेश आहे़ बहुतांश शेतकर्‍यांनी सोयाबीन व तूरची पेरणी जास्त केल्याचे दिसत असून ही पिके लांबलेल्या पावसामुळे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे़