शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
5
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
6
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
7
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
8
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
9
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
10
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
11
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
12
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
13
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
14
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
15
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
16
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
17
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
18
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
19
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
20
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!

वाळू व्यवसायामुळेच बापानंतर मुलाचाही मृत्यू

By admin | Updated: December 29, 2015 23:51 IST

जळगाव- वाळू व्यवसायात मजूर म्हणून काम करतानाच खेडी खुर्द येथील अपघातात मयत झालेल्या गोपालचे वडील संतोष नन्नवरे यांचाही १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ही वाळू अशी किती कुटुंब उद्ध्वस्त करील, असा संतापजनक सवाल खेडी खुर्द वासीयांनी उपस्थित केला आहे.

जळगाव- वाळू व्यवसायात मजूर म्हणून काम करतानाच खेडी खुर्द येथील अपघातात मयत झालेल्या गोपालचे वडील संतोष नन्नवरे यांचाही १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ही वाळू अशी किती कुटुंब उद्ध्वस्त करील, असा संतापजनक सवाल खेडी खुर्द वासीयांनी उपस्थित केला आहे.
मयत गोपालचेे वडीलही वाळू भरण्याचे काम करायचे. त्या वेळेस मजुरी कमी होती. पण आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांना हे अवजड काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. १५ वर्षांपूर्वी म्हणजेच गोपाल हा सात वर्षांचा असताना संतोष नन्नवरे हे खेडी खुर्दनजीकच्या गिरणा नदीत वाळू भरण्यासाठी गेले होते. वाळू वाहतुकीमुळे नदीत खोल खड्डे पडले होते. या खड्ड्यात काम करताना संतोष यांच्या अंगावर वाळूचा ढिगारा पडला होता. त्यात संतोष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता गोपालचाही वाळूमुळे मृत्यू झाला.

घरात एकटा, तीन बहिणी, पत्नी गर्भवती
मयत गोपालचे लग्न एप्रिल २०१५ मध्ये झाले होते. त्याची पत्नी गर्भवती आहे. तो घरात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, तीन बहिणी, पत्नी असा परिवार आहे. एका बहिणीचे लग्न झालेे आहे. शिकण्याच्या वयातच त्याने कुटुंबासाठी रोजगार पत्करला. गोपालचा मृत्यू झाल्याने त्यांच्या घराचा मोठा आधार हरपला आहे.