शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाळू व्यवसायामुळेच बापानंतर मुलाचाही मृत्यू

By admin | Updated: December 29, 2015 23:51 IST

जळगाव- वाळू व्यवसायात मजूर म्हणून काम करतानाच खेडी खुर्द येथील अपघातात मयत झालेल्या गोपालचे वडील संतोष नन्नवरे यांचाही १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ही वाळू अशी किती कुटुंब उद्ध्वस्त करील, असा संतापजनक सवाल खेडी खुर्द वासीयांनी उपस्थित केला आहे.

जळगाव- वाळू व्यवसायात मजूर म्हणून काम करतानाच खेडी खुर्द येथील अपघातात मयत झालेल्या गोपालचे वडील संतोष नन्नवरे यांचाही १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ही वाळू अशी किती कुटुंब उद्ध्वस्त करील, असा संतापजनक सवाल खेडी खुर्द वासीयांनी उपस्थित केला आहे.
मयत गोपालचेे वडीलही वाळू भरण्याचे काम करायचे. त्या वेळेस मजुरी कमी होती. पण आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांना हे अवजड काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. १५ वर्षांपूर्वी म्हणजेच गोपाल हा सात वर्षांचा असताना संतोष नन्नवरे हे खेडी खुर्दनजीकच्या गिरणा नदीत वाळू भरण्यासाठी गेले होते. वाळू वाहतुकीमुळे नदीत खोल खड्डे पडले होते. या खड्ड्यात काम करताना संतोष यांच्या अंगावर वाळूचा ढिगारा पडला होता. त्यात संतोष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता गोपालचाही वाळूमुळे मृत्यू झाला.

घरात एकटा, तीन बहिणी, पत्नी गर्भवती
मयत गोपालचे लग्न एप्रिल २०१५ मध्ये झाले होते. त्याची पत्नी गर्भवती आहे. तो घरात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, तीन बहिणी, पत्नी असा परिवार आहे. एका बहिणीचे लग्न झालेे आहे. शिकण्याच्या वयातच त्याने कुटुंबासाठी रोजगार पत्करला. गोपालचा मृत्यू झाल्याने त्यांच्या घराचा मोठा आधार हरपला आहे.