शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

ताम्रपत्राविनाच झाले मान्यवरांचे स्वागत अखेरपर्यंत घोळ : नमुना तपासणीत विलंब

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

नाशिक : साधुग्राममध्ये उभारण्यात आलेल्या जगत्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा दिमाखात साजरा करायचा आणि येणार्‍या मान्यवर अतिथींचेही ताम्रपत्र देऊन थाटामाटात स्वागत करायचे, असा निश्चय महापालिकेने केला होता खरा; परंतु अखेरपर्यंत ताम्रपत्र हाती आलेच नाहीत आणि ताम्रपत्राविना केवळ पुष्पगुच्छ व शाल देऊन मान्यवरांचे स्वागत करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली. प्रशासनाकडूनच नमुना तपासणीला विलंब लागल्याने हा सारा घोळ झाल्याचे समजते.

नाशिक : साधुग्राममध्ये उभारण्यात आलेल्या जगत्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा दिमाखात साजरा करायचा आणि येणार्‍या मान्यवर अतिथींचेही ताम्रपत्र देऊन थाटामाटात स्वागत करायचे, असा निश्चय महापालिकेने केला होता खरा; परंतु अखेरपर्यंत ताम्रपत्र हाती आलेच नाहीत आणि ताम्रपत्राविना केवळ पुष्पगुच्छ व शाल देऊन मान्यवरांचे स्वागत करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली. प्रशासनाकडूनच नमुना तपासणीला विलंब लागल्याने हा सारा घोळ झाल्याचे समजते.
महापालिकेने प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा दिमाखात साजरा करण्याचा निश्चय केला आणि सोहळ्यात कसलीही कमतरता भासणार नाही यादृष्टीने तयारी केली. सोहळ्यासाठी येणार्‍या मान्यवर प्रमुख अतिथींसह प्रमुख आखाड्यांच्या संत-महंतांना महापालिकेच्या वतीने ताम्रपत्र देऊन सन्मानित करण्याची संकल्पना समोर आली. ताम्रपत्र हे कायमस्वरूपी त्यांच्याकडे राहील, असा विचार करत ते संस्कृत भाषेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रशासनाकडून निविदाही मागविण्यात आल्या. ताम्रपत्रावरील मायना ठरला, त्याचा आकार निश्चित झाला. त्यानुसार मक्तेदाराने नमुना तपासणीसाठी प्रशासनाकडे दिला. परंतु नमुना तपासणीला इतका विलंब लावण्यात आला की सोहळ्याच्या आदल्या दिवसापर्यंत घोळ सुरू होता. नमुनाच हाती न आल्याने मक्तेदाराचीही पंचाईत होत गेली. सुमारे १५ ते २० ताम्रपत्रांची ऑर्डर देण्यात आली होती. मंगळवारी रात्री उशिरा मक्तेदाराच्या हाती ताम्रपत्राचा नमुना पडल्याचे समजते. मात्र, ताम्रपत्र हे काही छापील प्रशस्तिपत्रक नव्हे तर त्यासाठी कारागिरांना कोरीवकाम करावे लागते. एक ताम्रपत्र तयार करण्यासाठी काही तास जातात. परंतु, शासकीयता भिनलेल्या प्रशासनाकडून अखेरपर्यंत घोळ घातला गेल्याने ताम्रपत्र तयारच होऊ शकले नाहीत. बुधवारी प्रत्यक्ष सोहळ्याप्रसंगी ताम्रपत्र न आल्याने महापालिकेला अखेर शाल व पुष्पगुच्छ देऊनच मान्यवरांना सन्मानित करावे लागले.