शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

खड्डे व स्पीड ब्रेकर्समुळे देशभरात एका वर्षात ११ हजार जणांचा मृत्यू

By admin | Updated: September 14, 2015 10:31 IST

रस्त्यावरील खड्डे व स्पीड ब्रेकर्स आता जीवघेणे ठरु लागले असून गेल्या वर्षभरात खड्डे व स्पीड ब्रेकर्समुळे देशभरात तब्बल ११ हजार ४०० जणांना जीव गमवावा लागला आहे.

ऑनलाइन लोकमत  

नवी दिल्ली, दि. १४ - रस्त्यावरील खड्डे व स्पीड ब्रेकर्स आता जीवघेणे ठरु लागले असून गेल्या वर्षभरात खड्डे व स्पीड ब्रेकर्समुळे देशभरात तब्बल ११ हजार ४०० जणांना जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात याच कारणामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण ३६८ एवढे आहे. 

 
केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाने 'रस्ते अपघात अहवाल - २०१४' हा अहवाल नुकताच प्रकाशित केला असून या अहवालात पहिल्यांदाच खड्डे व स्पीड ब्रेकर्समुळे होणारे अपघात याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. २०१४ या वर्षात ११,४०० जणांचा स्पीड ब्रेकर व खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यात सर्वात आघाडीवर उत्तर प्रदेश असून उत्तरप्रदेशमध्ये एका वर्षात तब्बल ४,४४५ जणांचा या कारणामुळे मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश (९१५), बिहार (८६७) या राज्यांचा क्रमांक लागला आहे. रस्त्यांची योग्य देखभाल न करणे व नियम पायदळी तुडवून स्पीड ब्रेकर तयार केल्याचे परिणाम या अहवालातून उघड झाले आहेत. आता सरकारी यंत्रणांनी या तक्रारींकडे गांभीर्याने बघावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.