शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

युद्ध न झाल्यामुळे लष्कराचे महत्व कमी झाले - पर्रीकर

By admin | Updated: June 15, 2015 17:47 IST

गेल्या ४०-५० वर्षात युद्ध न झाल्याने लष्कराचे महत्व कमी झाले आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. १५ - गेल्या ४०-५० वर्षात युद्ध न झाल्याने लष्कराचे महत्व कमी झाले आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. मात्र आपण युद्धाचा पुरस्कार करतो, असा अर्थ त्यातून काढू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले. जयपूरमधील एका सेमिनारदरम्यान ते बोलत होते. यावेळी माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड हेही उपस्थित होते.
'सध्या सर्वत्र शांतता असल्याने सामान्य जनतेचा जवानांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, त्यांच्या नजरेत लष्कराचे महत्व कमी झाले आहे. जवानांना योग्य आदर मिळेनासा झाला आहे, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. गेल्या अनेक वर्षांत युद्ध न होणं हेच त्यामागचे कारण आहे, असे ते म्हणाले. लष्कराच्या दोन पिढ्या कोणतेही युद्ध न लढताच निवृत्त झाल्या, हे जरी खरं असलं तरी त्याचा अर्थ जवानांना योग्य तो आदर मिळू नये असा होत नाही. जवानांच्या समस्यांविषयी आपण अनेक मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहीली असून काहींनी त्यावर कार्यवाही केल्याने सैनिकांचा त्रास कमी झाला आहे, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले.