शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने कच-याच्या ढिगा-यात जाळला पत्नीचा मृतदेह

By admin | Updated: September 5, 2016 08:30 IST

पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी खिशात पैसे नसल्याने एका आदिवासी व्यक्तीला कच-याच्या ढिगा-यात मृतदेह जाळावा लागल्याची घटना घडली आहे

- ऑनलाइन लोकमत
निमच, दि. 5 - जिवंत असताना सर्व सुखसोयी अनुभवायच्या असतील तर पैसा अत्यंत गरजेचा असतो. खिशात पैसा नसेल तर आपली काहीच किंमत नसते, पण हाच पैसा मृत्यूनंतरही आपला पाठलाग सोडत नाही. असाच अनुभव देणारी एक घटना इंदोरपासून 275 किमी अंतरावर असणा-या रतनगड गावात घडली आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी खिशात पैसे नसल्याने एका आदिवासी व्यक्तीला कच-याच्या ढिगा-यात मृतदेह जाळावा लागल्याची घटना घडली आहे. 
 
जगदीश भील असं या व्यक्तीचं नाव आहे. जगदीशकडे साधं लाकूड खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. तीन तास तो कचरा जमा करत होता. शेवटी कच-याची चिता रचून त्याच्यावर पत्नीला मुखाग्नि दिला. पंचायतनेदेखील काहीच मदत न केल्याने जगदीशवर ही वेळ ओढवली. एका व्यक्तीने तर जगदीशला पत्नीचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरुन नदीत फेकून देण्याचा सल्लाही देऊन टाकला. ही घटना शुक्रवारी घडली आहे, मात्र रविवारी समोर आली जेव्हा संपुर्ण जग दीनदुबळे, निराधारांसाठी काम करून जगात आदर प्राप्त केलेल्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल झाल्याचा आनंद साजरा करत होतं.
 
'माझी पत्नी नोजीबाईचं शुक्रवारी सकाळी निधन झालं. अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यासाठी लाकूड लागणार होते, त्यासाठी मी रतनगडला गेलो होतो. पण ग्रामसचिवांनी मदत करण्यास नकार दिला. तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. नगरसेवक नथुलाल यांच्याकडून मला मदतीची अपेक्षा होती. पण ते गावाबाहेर गेले होते, कोणी माझं फोनवरुन त्यांच्याशी बोलणंही करुन दिलं नाही', असं जगदीश भील यांनी सांगितलं आहे. 
 
अनेक लोक शेजारुन गेले पण मदतीला कोणीच थांबलं नाही. शेवटी जगदीश आणि त्याच्या मित्रांनी कचरा जमा केला. आपली पत्नी घर चालवण्यासाठी लाकूड जमा करायची, मात्र तिचा मृत्यू झाला तेव्हा साधं चिता रचण्यासाठी लाकूड नाही याचं जगदीशला दुख: वाटत होतं.
 
'शेवटी हार मानून मृतदेह पुरण्याचं ठरवण्यात आलं. पण एका सामाजिक कार्यकर्त्याने आमच्याशी संपर्क साधला, लाकूड आणि काही गोष्टी त्यांनी मिळवून दिल्या ज्यानंतर आम्ही चिता जाळली', असं जगदीश यांनी सांगितलं आहे. सर्व झाल्यावर अधिका-यांची टीम पोहोचली. त्यांनी लाकूड पाठवलं होतं मात्र तोपर्यंत चिता जळाली होती.