शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने कच-याच्या ढिगा-यात जाळला पत्नीचा मृतदेह

By admin | Updated: September 5, 2016 08:30 IST

पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी खिशात पैसे नसल्याने एका आदिवासी व्यक्तीला कच-याच्या ढिगा-यात मृतदेह जाळावा लागल्याची घटना घडली आहे

- ऑनलाइन लोकमत
निमच, दि. 5 - जिवंत असताना सर्व सुखसोयी अनुभवायच्या असतील तर पैसा अत्यंत गरजेचा असतो. खिशात पैसा नसेल तर आपली काहीच किंमत नसते, पण हाच पैसा मृत्यूनंतरही आपला पाठलाग सोडत नाही. असाच अनुभव देणारी एक घटना इंदोरपासून 275 किमी अंतरावर असणा-या रतनगड गावात घडली आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी खिशात पैसे नसल्याने एका आदिवासी व्यक्तीला कच-याच्या ढिगा-यात मृतदेह जाळावा लागल्याची घटना घडली आहे. 
 
जगदीश भील असं या व्यक्तीचं नाव आहे. जगदीशकडे साधं लाकूड खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. तीन तास तो कचरा जमा करत होता. शेवटी कच-याची चिता रचून त्याच्यावर पत्नीला मुखाग्नि दिला. पंचायतनेदेखील काहीच मदत न केल्याने जगदीशवर ही वेळ ओढवली. एका व्यक्तीने तर जगदीशला पत्नीचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरुन नदीत फेकून देण्याचा सल्लाही देऊन टाकला. ही घटना शुक्रवारी घडली आहे, मात्र रविवारी समोर आली जेव्हा संपुर्ण जग दीनदुबळे, निराधारांसाठी काम करून जगात आदर प्राप्त केलेल्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल झाल्याचा आनंद साजरा करत होतं.
 
'माझी पत्नी नोजीबाईचं शुक्रवारी सकाळी निधन झालं. अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यासाठी लाकूड लागणार होते, त्यासाठी मी रतनगडला गेलो होतो. पण ग्रामसचिवांनी मदत करण्यास नकार दिला. तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. नगरसेवक नथुलाल यांच्याकडून मला मदतीची अपेक्षा होती. पण ते गावाबाहेर गेले होते, कोणी माझं फोनवरुन त्यांच्याशी बोलणंही करुन दिलं नाही', असं जगदीश भील यांनी सांगितलं आहे. 
 
अनेक लोक शेजारुन गेले पण मदतीला कोणीच थांबलं नाही. शेवटी जगदीश आणि त्याच्या मित्रांनी कचरा जमा केला. आपली पत्नी घर चालवण्यासाठी लाकूड जमा करायची, मात्र तिचा मृत्यू झाला तेव्हा साधं चिता रचण्यासाठी लाकूड नाही याचं जगदीशला दुख: वाटत होतं.
 
'शेवटी हार मानून मृतदेह पुरण्याचं ठरवण्यात आलं. पण एका सामाजिक कार्यकर्त्याने आमच्याशी संपर्क साधला, लाकूड आणि काही गोष्टी त्यांनी मिळवून दिल्या ज्यानंतर आम्ही चिता जाळली', असं जगदीश यांनी सांगितलं आहे. सर्व झाल्यावर अधिका-यांची टीम पोहोचली. त्यांनी लाकूड पाठवलं होतं मात्र तोपर्यंत चिता जळाली होती.