शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

शिर्डीच्या साईबाबांची पुजा केल्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ - शंकराचार्य स्वामी

By admin | Updated: April 11, 2016 08:44 IST

शिर्डीच्या साईबाबांची पूजा केल्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळसदृष्य परिस्थिती आली असल्याचं द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हंटलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
हरिद्वार, दि. ११ - 'शिर्डीच्या साईबाबांची पूजा केल्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळसदृष्य परिस्थिती आली असल्याचं', द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हंटलं आहे. हरिद्वारमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. साईबाबांची पूजा करण्यावरुन शंकराचार्य स्वामी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याअगोदरही शंकराचार्य स्वामी यांनी साईबाबा देव नाहीत त्यांची पुजा करु नये असं बोलले होते.
 
'साईबाबा जे एक फकीर होते त्यांनी देव म्हणून पूजलं जात हे अशुभ आहे. ज्या ठिकाणी त्यांची पूजा केली जाते त्याठिकाणी निसर्गाचा प्रकोप होतो. त्या ठिकाणी दुष्काळ, पूर यासारखी संकट येऊन मृत्यूच भय निर्माण होतं', असं विधान शंकराचार्य स्वामी यांनी केलं आहे. 
 
याअगोदरही शंकराचार्य स्वामी यांनी 2014मध्ये साईबाबांची पूजा करण्याला विरोध केला होता. साईबाबा देव नसून त्यांची पूजा करु नये असं फर्मानच त्यांनी काढलं होतं. तसंच आपल्या भक्तांना साईबाबांचे फोटो आणि मुर्ती मंदिरातून हटवण्यासही सांगितलं होतं. 
 
शनिशिंगणापूरमध्ये महिलांना चौथ-यावर प्रवेश देण्याला त्यांनी विरोध केला आहे. त्यांनी चौथ-यावर प्रवेश करायला नको होता असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. यामुळे महिलांना वाईट गोष्टींचा सामना करावा लागेल. शनी हा पाप ग्रह आहे. त्याची पूजा केल्यामुळे महिलांविरोधातील गुन्हे वाढतील असा अजब तर्क त्यांनी लावला आहे.