शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

इंटकच्या संपाने बसेसचा चक्काजाम ९२७ फेर्‍या रद्द : सुमारे ७ लाखाचे नुकसान

By admin | Updated: December 18, 2015 00:29 IST

जळगाव : महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) संघटनेने २५ टक्के पगार वाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जळगाव आगाराच्या ९२७ फेर्‍या रद्द करण्यात आल्याने सुमारे ७ लाख रूपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे. संपामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सामान्य जनता, विद्यार्थी व प्रवाशांचे मात्र हाल झालेत.

जळगाव : महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) संघटनेने २५ टक्के पगार वाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जळगाव आगाराच्या ९२७ फेर्‍या रद्द करण्यात आल्याने सुमारे ७ लाख रूपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे. संपामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सामान्य जनता, विद्यार्थी व प्रवाशांचे मात्र हाल झालेत.
जो पर्यंत शासन २५ टक्के पगारवाढ करत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा पवित्रा घेत इटकचे विभागीय सचिव नरेंद्रसिंह राजपूत आणि जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील यांच्या नेतृत्वात आगारात पहाटे ४ वाजेपासून कामबंद आंदोलन करण्यात आले. बसस्थानक गेटच्या मधोमध बसून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आगार दणाणून सोडले.

प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हाल
संपामुळे अचानक बसफेर्‍या रद्द झाल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांचे मात्र हाल झालेत. कित्येक प्रवाशी बाहेरील राज्यातून आल्याने त्यांना घरी जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागले. संपामुळे प्रवाशांना का वेठीस धरले गेले म्हणून आंदोलनकर्त्यांवर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. महिला प्रवाशीही घरी जाण्यासाठी चिंतेत दिसत होत्या. पहाटेच्या सुमारास काही बसफेर्‍या सुरू असल्याने शिक्षणासाठी विद्यार्थी शहरात आले, मात्र ११ वाजेपासून सर्वच बसफे र्‍या बंद झाल्याने घरी परत कसे जायायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. विद्यार्थ्यांकडे पासेस असल्याने पैसे नव्हते, म्हणून त्यांना खाजगी वाहतूकीनेदेखील घरी जाता येत नव्हते. एकंदरीत स्थानकात प्रवाशी व विद्यार्थ्यांच्या गर्दीने यात्रेचे स्वरूप आले होते.

बसेसच्या चाकांची काढली हवा
विद्यार्थ्यांचे हाल होेऊ नये म्हणून दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर बस (एम.एच.२०, बी.एल.३३५९) एका चालकाने स्थानकाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता आंदोलनकर्त्यांनी बस अडवून थांबविली व चालकास संपामुळे कामबंद असल्याचा दम दिला. दोघात वादावाद झाल्याने गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली. तेवढ्यात गर्दीचा फायदा घेत एका आंदोलनकर्त्याने सदर बसच्या चाकाची हवा काढली. विद्यार्थ्यांनीही यावेळी गोंधळ केल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यामुळे पळापळ सुरू झाली होती.
कोट-
पुणे येथे कर्तव्यास असून नोकरीच्या कामानिमित्त डेहराडूनला गेलो होतो. एवढ्या लांबून वापस आल्याने बसेस बंदमुळे खुप त्रास होत आहे. विनाकारण प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. गावाला खाजगी वाहने जात नसल्याने घरी कसे जायायचे हा प्रश्न आहे.
-विजय पाटील, प्रवासी, तळई, ता.एरंडोल
बातमी अपूर्ण........