शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

इंटकच्या संपाने बसेसचा चक्काजाम ९२७ फेर्‍या रद्द : सुमारे ७ लाखाचे नुकसान

By admin | Updated: December 18, 2015 00:29 IST

जळगाव : महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) संघटनेने २५ टक्के पगार वाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जळगाव आगाराच्या ९२७ फेर्‍या रद्द करण्यात आल्याने सुमारे ७ लाख रूपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे. संपामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सामान्य जनता, विद्यार्थी व प्रवाशांचे मात्र हाल झालेत.

जळगाव : महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) संघटनेने २५ टक्के पगार वाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जळगाव आगाराच्या ९२७ फेर्‍या रद्द करण्यात आल्याने सुमारे ७ लाख रूपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे. संपामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सामान्य जनता, विद्यार्थी व प्रवाशांचे मात्र हाल झालेत.
जो पर्यंत शासन २५ टक्के पगारवाढ करत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा पवित्रा घेत इटकचे विभागीय सचिव नरेंद्रसिंह राजपूत आणि जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील यांच्या नेतृत्वात आगारात पहाटे ४ वाजेपासून कामबंद आंदोलन करण्यात आले. बसस्थानक गेटच्या मधोमध बसून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आगार दणाणून सोडले.

प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हाल
संपामुळे अचानक बसफेर्‍या रद्द झाल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांचे मात्र हाल झालेत. कित्येक प्रवाशी बाहेरील राज्यातून आल्याने त्यांना घरी जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागले. संपामुळे प्रवाशांना का वेठीस धरले गेले म्हणून आंदोलनकर्त्यांवर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. महिला प्रवाशीही घरी जाण्यासाठी चिंतेत दिसत होत्या. पहाटेच्या सुमारास काही बसफेर्‍या सुरू असल्याने शिक्षणासाठी विद्यार्थी शहरात आले, मात्र ११ वाजेपासून सर्वच बसफे र्‍या बंद झाल्याने घरी परत कसे जायायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. विद्यार्थ्यांकडे पासेस असल्याने पैसे नव्हते, म्हणून त्यांना खाजगी वाहतूकीनेदेखील घरी जाता येत नव्हते. एकंदरीत स्थानकात प्रवाशी व विद्यार्थ्यांच्या गर्दीने यात्रेचे स्वरूप आले होते.

बसेसच्या चाकांची काढली हवा
विद्यार्थ्यांचे हाल होेऊ नये म्हणून दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर बस (एम.एच.२०, बी.एल.३३५९) एका चालकाने स्थानकाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता आंदोलनकर्त्यांनी बस अडवून थांबविली व चालकास संपामुळे कामबंद असल्याचा दम दिला. दोघात वादावाद झाल्याने गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली. तेवढ्यात गर्दीचा फायदा घेत एका आंदोलनकर्त्याने सदर बसच्या चाकाची हवा काढली. विद्यार्थ्यांनीही यावेळी गोंधळ केल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यामुळे पळापळ सुरू झाली होती.
कोट-
पुणे येथे कर्तव्यास असून नोकरीच्या कामानिमित्त डेहराडूनला गेलो होतो. एवढ्या लांबून वापस आल्याने बसेस बंदमुळे खुप त्रास होत आहे. विनाकारण प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. गावाला खाजगी वाहने जात नसल्याने घरी कसे जायायचे हा प्रश्न आहे.
-विजय पाटील, प्रवासी, तळई, ता.एरंडोल
बातमी अपूर्ण........