शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

दलितांवरील अत्याचारांमुळे माझी मान शरमेने खाली जाते

By admin | Updated: October 19, 2016 06:55 IST

स्वातंत्र्यानंतर ७0 वर्षांनीही भारतात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे माझी मान शरमेने खाली जाते

लुधियाना : स्वातंत्र्यानंतर ७0 वर्षांनीही भारतात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे माझी मान शरमेने खाली जाते, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काढले. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आणि दलितांवरील अत्याचार थांबवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत, असेही पंतप्रधान म्हणाले.गुरू गोविंदसिंग यांनी जातियवाद आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध आवाज उठविला होता, याचा उल्लेख करून ते म्हणाले की, समाजातील विसंगतींमुळेच आजही देशात दलित बंधू भगिनींवर अत्याचार होत असल्याचे आजही आपल्या कानावर पडते, तेव्हा मान शरमेने खाली गेल्याशिवाय राहत नाही. स्वातंत्र्याला आता ७0 वर्षे झाली आहेत. त्यामुळे अशा विसंगती, विषमता व अत्याचार थांबलेच पाहिजेत. (वृत्तसंस्था)>उद्योजकांना १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातील उद्योजकांना साह्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय हब (उपक्रम)चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते म्हणाले की, या हबद्वारे दलित आणि आदिवासी तरुणांमधील उद्योजकतेला वाव दिला जाणार आहे. त्यासाठी त्यांना सर्वतोपरि मदत केली जाईल. या योजनेतून किमान साडेतीन लाख नवे उद्योजक तयार व्हावेत, अशी सरकारची इच्छा आणि प्रयत्न आहेत. स्टार्टअप योजनेखाली राष्ट्रीयीकृत बँकांनी या उद्योजकांना १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज द्यावे आणि त्यात महिलांचाही समावेश असावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.>आर्थिक उन्नती हाच प्रमुख मार्ग लघु, मध्यम व अतिसुक्ष्म मंत्रालयाची ही योजना आहे. सुरुवातीला योजनेसाठी ४९0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दलित व आदिवासी उद्योजकांना अर्थसाह्य मिळवून देणे, त्यांना उत्पादने तयार करण्यासाठी मदत करणे, तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे काम या हबतर्फे केले जाणार आहे. दलित आणि आदिवासींनी तयार केलेल्या उत्पादनांपैकी किमान ४ टक्के वस्तू विविध मंत्रालये तसेच राज्य सरकारे यांनी विकत घ्यावीत, असे सांगून मोदी म्हणाले की समाजातील या मागास वर्गाच्या विकासासाठी त्यांची आर्थिक उन्नती हाच प्रमुख मार्ग आहे आणि त्यासाठी सरकार प्रयत्न करेल.