शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

दलितांवरील अत्याचारांमुळे माझी मान शरमेने खाली जाते

By admin | Updated: October 19, 2016 06:55 IST

स्वातंत्र्यानंतर ७0 वर्षांनीही भारतात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे माझी मान शरमेने खाली जाते

लुधियाना : स्वातंत्र्यानंतर ७0 वर्षांनीही भारतात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे माझी मान शरमेने खाली जाते, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काढले. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आणि दलितांवरील अत्याचार थांबवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत, असेही पंतप्रधान म्हणाले.गुरू गोविंदसिंग यांनी जातियवाद आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध आवाज उठविला होता, याचा उल्लेख करून ते म्हणाले की, समाजातील विसंगतींमुळेच आजही देशात दलित बंधू भगिनींवर अत्याचार होत असल्याचे आजही आपल्या कानावर पडते, तेव्हा मान शरमेने खाली गेल्याशिवाय राहत नाही. स्वातंत्र्याला आता ७0 वर्षे झाली आहेत. त्यामुळे अशा विसंगती, विषमता व अत्याचार थांबलेच पाहिजेत. (वृत्तसंस्था)>उद्योजकांना १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातील उद्योजकांना साह्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय हब (उपक्रम)चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते म्हणाले की, या हबद्वारे दलित आणि आदिवासी तरुणांमधील उद्योजकतेला वाव दिला जाणार आहे. त्यासाठी त्यांना सर्वतोपरि मदत केली जाईल. या योजनेतून किमान साडेतीन लाख नवे उद्योजक तयार व्हावेत, अशी सरकारची इच्छा आणि प्रयत्न आहेत. स्टार्टअप योजनेखाली राष्ट्रीयीकृत बँकांनी या उद्योजकांना १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज द्यावे आणि त्यात महिलांचाही समावेश असावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.>आर्थिक उन्नती हाच प्रमुख मार्ग लघु, मध्यम व अतिसुक्ष्म मंत्रालयाची ही योजना आहे. सुरुवातीला योजनेसाठी ४९0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दलित व आदिवासी उद्योजकांना अर्थसाह्य मिळवून देणे, त्यांना उत्पादने तयार करण्यासाठी मदत करणे, तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे काम या हबतर्फे केले जाणार आहे. दलित आणि आदिवासींनी तयार केलेल्या उत्पादनांपैकी किमान ४ टक्के वस्तू विविध मंत्रालये तसेच राज्य सरकारे यांनी विकत घ्यावीत, असे सांगून मोदी म्हणाले की समाजातील या मागास वर्गाच्या विकासासाठी त्यांची आर्थिक उन्नती हाच प्रमुख मार्ग आहे आणि त्यासाठी सरकार प्रयत्न करेल.