शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दुष्काळी स्थितीत आयपीएल बाद?

By admin | Updated: June 24, 2017 03:18 IST

भविष्यात दुष्काळी स्थिती ओढावली, तर राज्यात आयपीएलचे सामने आयोजित केले जाणार नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भविष्यात दुष्काळी स्थिती ओढावली, तर राज्यात आयपीएलचे सामने आयोजित केले जाणार नाहीत, अशी हमी देण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) उच्च न्यायालयाला शुक्रवारी नकार दिला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने दुष्काळी स्थितीत आयपीएलसाठी पाणी न पुरवण्याचे निर्देश, राज्य सरकार व महापालिकेला देण्याचे संकेत दिले आहेत.भविष्यात दुष्काळ पडला, तर राज्यात आयपीएलचे सामने आयोजित करणार नाही, अशी हमी द्या, तरच आम्ही याचिका निकाली काढू, असे न्यायालयाने म्हटले. मात्र, बीसीसीआयने आश्वासन देण्यास नकार दिला. आमचे स्वत:चे स्टेडियम नाही किंवा आम्ही पाणीही पुरवत नाही. त्यामुळे आम्ही असे आश्वासन देऊ शकत नाही, असे बीसीसीआयने न्यायालयाला सांगितले.बीसीसीआयने आश्वासन देण्यास नकार दिल्याने, न्यायालयाने ही याचिका निकाली काढण्यास नकार दिला. तुम्ही (बीसीसीआय) आश्वासन देण्यास नकार देत असाल, तर आम्हीच राज्य सरकार आणि महापालिकेला दुष्काळी स्थितीत आयपीएलसाठी पाणी न पुरवण्याचे निर्देश देतो,’ असे म्हणत न्यायालयाने सुनावणी ३० जूनला ठेवली आहे.एनजीओने घेतली होती न्यायालयात धावगेल्या वर्षी राज्यात दुष्काळ पडूनसुद्धा आयपीएलच्या सामन्यांसाठी पाणी पुरविण्यात आल्याने, एका सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलविण्याचा आदेश बीसीसीआयला दिला होता. आता या याचिकेत तथ्य न राहिल्याने, याचिका निकाली काढावी किंवा प्रतिवादी म्हणून बीसीसीआयचे नाव वगळावे, अशी विनंती बीसीसीआयने न्यायालयाला केली. मात्र न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांनी याचिका निकाली काढण्यास शुक्रवारी स्पष्ट नकार दिला.