शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाकडे आपत्ती म्हणून का पाहिलं जात नाही ? सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

By admin | Updated: April 13, 2016 14:22 IST

दुष्काळ नैसर्गिक आपत्ती असून दुष्काळाला आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली का आणलं जाऊ शकत नाही अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १३ - दुष्काळ नैसर्गिक आपत्ती असून दुष्काळाला आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली का आणलं जाऊ शकत नाही अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे केली आहे. दहा राज्यांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती पाहता न्यायालयाने ही विचारणा केली आहे. दुष्काळाला  आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत आणल्यास पिडीत कुटुंबांच्या मदतीसाठी निधी दिला जाऊ शकतो असं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे.
 
अनेक राज्यांनी अजूनपर्यंत दुष्काळ जाहीर केलेला नाही त्यामुळे न्यायाधीश मदन लोकूर आणि रामाना यांच्या खंडपीठाने ही संकल्पना मांडली आहे. दुष्काळ जाहीर करणे राज्यांच्या अख्त्यारित येत असल्याने आपले हात बांधले असून आपण दुष्काळ जाहीर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही असं केंद्राने न्यायालयात सांगितलं आहे. .यावर दुष्काळामुळे गंभीर समस्या निर्माण झाली असेल आणि लोकांचे हाल होत असतील तरी केंद्र आपण मध्यस्थी न करता काहीच करु शकत नाही असं म्हणू शकते का ? असा सवाल न्यायालयाने केंद्राला विचारला. 
दुष्काळ जाहीर करण्यासाठी कोणताच नियम नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नरसिम्हा यांनी न्यायालयात सांगितलं आहे. दुष्काळाला आपत्ती व्यवस्थापन कायद्यात घेतलं गेलं नसलं तरी पिकांच्या नुकसानीअंतर्गत मदत दिली जाऊ शकते असं मत नरसिम्हा यांनी खंडपीठासमोर व्यक्त केलं आहे. न्यायालयाने दुष्काळाचा फटका किती जिल्ह्यांना आणि लोकांना बसला आहे याची माहिती मागवली आहे, तसंच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आपत्तीसाठी किती निधी मंजूर केला जातो याची माहितीदेखील देण्यास सांगितलं आहे. केंद्राने 19 एप्रिलला पुढील सुनावणीदरम्यान सर्व माहिती देण्याचं आश्वासन न्यायालयात दिलं आहे.