शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

डोवाल नव्हे, थंडी संपवेल भारत-चीनमधील तणाव

By admin | Updated: July 16, 2017 16:40 IST

गेल्या महिनाभरापासून भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव अद्याप कायम आहे. डोकलाम परिसरात एकमेकांसमोर असलेले दोन्ही

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - गेल्या महिनाभरापासून  भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव अद्याप कायम आहे. डोकलाम परिसरात एकमेकांसमोर असलेले  दोन्ही देशांचे लष्कर माघार घेण्यास तयार नसल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनचा दौरा करणार आहेत. मात्र या परिसरात जोपर्यंत कडाक्याची थंडी पडत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील तणाव निवळणार नसल्याचे सुरक्षाविषयक तज्ज्ञांचे मत आहे. तसेच डोवाल यांच्या चीन दौऱ्यातही सीमेवरील तणावाबाबत औपचारिक चर्चा होण्याची शक्यताही तज्ज्ञांना कमीच वाटत आहे.  
इन्स्टिट्युट ऑफ साऊथ अँड साऊथईस्ट एशियन अँड ओशन स्टडीजचे संचालक हू शिशेंग यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "जोपर्यंत भारतीय लष्कर डोकलाममधून माघार घेत नाही तोपर्यंत कोणत्याची प्रकारची चर्चा होणार नाही अशी चीनची भूमिका आहे. या परिस्थितीत चर्चा झाल्यास चीनमधील सर्वसामान्य जनतेची भावना भडकू शकतात."अधिक वाचा (डोकलाम प्रकरण - अजित डोवाल जाणार चीनला)(डोकलाम प्रकरणी चीनला नव्हती भारताकडून आक्रमकतेची अपेक्षा)(डोकलाम वाद : चीन लपवत आहे 1890 कराराचं सत्य ? )"कुठलाही देश माघार घेऊन स्वत:ला पराभूत म्हणून दाखवून देण्यास इच्छूक नसल्याने परिस्थिती अधिक बिघडली आहे. दोन्ही देश एकमेकांसमोर बसून चर्चा करण्याची शक्यता कमीच आहे. मात्र येथील हवामान जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत वाद सुरूच राहण्याची शक्यता आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर थंडी पडत असल्याने त्यावेळी येथे राहणे अशक्य होईल. त्यानंतर दोन्ही सैन्यदले मागे हटू शकतात.  मात्र त्यानंतरही हा तणाव संपण्याची शक्यता कमीच आहे. 
दरम्यान, अजित डोवाल या महिन्याच्या अखेरीस ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीसाठी चीनमध्ये जाणार आहेत. डोवाल यांच्या त्या दौऱ्यादरम्यान चीनला चर्चेसाठी तयार करणे कठीण असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न चीनी अधिकाऱ्यांकडून होण्याच्या शक्यता आहे.