शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

डोवाल नव्हे, थंडी संपवेल भारत-चीनमधील तणाव

By admin | Updated: July 16, 2017 16:40 IST

गेल्या महिनाभरापासून भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव अद्याप कायम आहे. डोकलाम परिसरात एकमेकांसमोर असलेले दोन्ही

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - गेल्या महिनाभरापासून  भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव अद्याप कायम आहे. डोकलाम परिसरात एकमेकांसमोर असलेले  दोन्ही देशांचे लष्कर माघार घेण्यास तयार नसल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनचा दौरा करणार आहेत. मात्र या परिसरात जोपर्यंत कडाक्याची थंडी पडत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील तणाव निवळणार नसल्याचे सुरक्षाविषयक तज्ज्ञांचे मत आहे. तसेच डोवाल यांच्या चीन दौऱ्यातही सीमेवरील तणावाबाबत औपचारिक चर्चा होण्याची शक्यताही तज्ज्ञांना कमीच वाटत आहे.  
इन्स्टिट्युट ऑफ साऊथ अँड साऊथईस्ट एशियन अँड ओशन स्टडीजचे संचालक हू शिशेंग यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "जोपर्यंत भारतीय लष्कर डोकलाममधून माघार घेत नाही तोपर्यंत कोणत्याची प्रकारची चर्चा होणार नाही अशी चीनची भूमिका आहे. या परिस्थितीत चर्चा झाल्यास चीनमधील सर्वसामान्य जनतेची भावना भडकू शकतात."अधिक वाचा (डोकलाम प्रकरण - अजित डोवाल जाणार चीनला)(डोकलाम प्रकरणी चीनला नव्हती भारताकडून आक्रमकतेची अपेक्षा)(डोकलाम वाद : चीन लपवत आहे 1890 कराराचं सत्य ? )"कुठलाही देश माघार घेऊन स्वत:ला पराभूत म्हणून दाखवून देण्यास इच्छूक नसल्याने परिस्थिती अधिक बिघडली आहे. दोन्ही देश एकमेकांसमोर बसून चर्चा करण्याची शक्यता कमीच आहे. मात्र येथील हवामान जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत वाद सुरूच राहण्याची शक्यता आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर थंडी पडत असल्याने त्यावेळी येथे राहणे अशक्य होईल. त्यानंतर दोन्ही सैन्यदले मागे हटू शकतात.  मात्र त्यानंतरही हा तणाव संपण्याची शक्यता कमीच आहे. 
दरम्यान, अजित डोवाल या महिन्याच्या अखेरीस ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीसाठी चीनमध्ये जाणार आहेत. डोवाल यांच्या त्या दौऱ्यादरम्यान चीनला चर्चेसाठी तयार करणे कठीण असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न चीनी अधिकाऱ्यांकडून होण्याच्या शक्यता आहे.