शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

डोवाल नव्हे, थंडी संपवेल भारत-चीनमधील तणाव

By admin | Updated: July 16, 2017 16:40 IST

गेल्या महिनाभरापासून भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव अद्याप कायम आहे. डोकलाम परिसरात एकमेकांसमोर असलेले दोन्ही

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - गेल्या महिनाभरापासून  भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव अद्याप कायम आहे. डोकलाम परिसरात एकमेकांसमोर असलेले  दोन्ही देशांचे लष्कर माघार घेण्यास तयार नसल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनचा दौरा करणार आहेत. मात्र या परिसरात जोपर्यंत कडाक्याची थंडी पडत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील तणाव निवळणार नसल्याचे सुरक्षाविषयक तज्ज्ञांचे मत आहे. तसेच डोवाल यांच्या चीन दौऱ्यातही सीमेवरील तणावाबाबत औपचारिक चर्चा होण्याची शक्यताही तज्ज्ञांना कमीच वाटत आहे.  
इन्स्टिट्युट ऑफ साऊथ अँड साऊथईस्ट एशियन अँड ओशन स्टडीजचे संचालक हू शिशेंग यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "जोपर्यंत भारतीय लष्कर डोकलाममधून माघार घेत नाही तोपर्यंत कोणत्याची प्रकारची चर्चा होणार नाही अशी चीनची भूमिका आहे. या परिस्थितीत चर्चा झाल्यास चीनमधील सर्वसामान्य जनतेची भावना भडकू शकतात."अधिक वाचा (डोकलाम प्रकरण - अजित डोवाल जाणार चीनला)(डोकलाम प्रकरणी चीनला नव्हती भारताकडून आक्रमकतेची अपेक्षा)(डोकलाम वाद : चीन लपवत आहे 1890 कराराचं सत्य ? )"कुठलाही देश माघार घेऊन स्वत:ला पराभूत म्हणून दाखवून देण्यास इच्छूक नसल्याने परिस्थिती अधिक बिघडली आहे. दोन्ही देश एकमेकांसमोर बसून चर्चा करण्याची शक्यता कमीच आहे. मात्र येथील हवामान जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत वाद सुरूच राहण्याची शक्यता आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर थंडी पडत असल्याने त्यावेळी येथे राहणे अशक्य होईल. त्यानंतर दोन्ही सैन्यदले मागे हटू शकतात.  मात्र त्यानंतरही हा तणाव संपण्याची शक्यता कमीच आहे. 
दरम्यान, अजित डोवाल या महिन्याच्या अखेरीस ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीसाठी चीनमध्ये जाणार आहेत. डोवाल यांच्या त्या दौऱ्यादरम्यान चीनला चर्चेसाठी तयार करणे कठीण असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न चीनी अधिकाऱ्यांकडून होण्याच्या शक्यता आहे.