दुष्काळाचा धसका; शेतकर्याचा मृत्यू
By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST
मुंडगाव: दुष्काळाचा धसका घेतल्याने अल्पभूधारक शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी आकोट तालुक्यातील मुंडगाव येथे दुपारी घडली. श्रीराम महादेव फुसे (वय ५५) हे मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्याचे नाव आहे.
दुष्काळाचा धसका; शेतकर्याचा मृत्यू
मुंडगाव: दुष्काळाचा धसका घेतल्याने अल्पभूधारक शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी आकोट तालुक्यातील मुंडगाव येथे दुपारी घडली. श्रीराम महादेव फुसे (वय ५५) हे मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्याचे नाव आहे. जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्या आठवड्यात जिल्ात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणी केली; मात्र गत २० पेक्षा जास्त दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकत आहेत. काही ठिकाणची पिकांची वाढही खुंटली आहे. अशीच काहीशी स्थिती मुंडगाव परिसरातील पिकांची आहे. मुंडगाव येथील श्रीराम फुसे यांच्याकडे वडिलोपार्जित २ एकर शेती आहे. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी शेतात गेले. पावसाअभावी पीक सुकत असल्याने ते चिंतेत पडले. घरी परत येत असतानाच त्यांच्या छातीत वेदना सुरू झाल्या. त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले; मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली व १ मुलगा असा आप्त परिवार आहे. ०८सीटीसीएल०५:- श्रीराम फुसे