शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

लाखो लीटर पाणी गटारीत

By admin | Updated: May 21, 2014 23:59 IST

अहमदनगर : औद्योगिक वसाहतीतून लष्कराकडे जाणार्‍या जलवाहिनीला भिंगार परिसरात गळती लागली असून, दररोज लाखो लीटर पाणी अक्षरश: गटारीत जात आहे़

अहमदनगर : औद्योगिक वसाहतीतून लष्कराकडे जाणार्‍या जलवाहिनीला भिंगार परिसरात गळती लागली असून, दररोज लाखो लीटर पाणी अक्षरश: गटारीत जात आहे़ एमआयडीसी प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली़ मात्र प्रशासनाकडून कार्यवाही होत नसून, ही गळती तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी भिंगार छावणी मंडळाच्या सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे केली आहे़ नागापूर औद्योगिक वसाहतीला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो़ औद्योगिक वसाहतीच्या जलवाहिनीतून लष्कराला पाणीपुरवठा करण्यात येतो़ त्यासाठी नागापूर ते नागरदेवळे येथील पाणी उपसा केंद्रांपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ ही जलवाहिनी भिंगारमधून जाते़ या जलवाहिनीला गेल्या ८ ते १० वर्षांपासून मोठ्याप्रमाणात गळती लागली आहे़ सुमारे १० अश्वशक्तीच्या विद्युत मोटारीइतके पाणी वाया जात आहे़ ही बाब नागापूर येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली़ याविषयी संबंधित अधिकार्‍यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत़ या विभागाकडून दुरुस्ती केली जाते़ मात्र पुन्हा ही गळती सुरू होते़ हे पाणी रस्त्यावर येत असल्याने मोठे खड्डे पडतात़परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघात होत आहेत़ पाणी गळती थांबविण्याची वेळोवेळी मागणी केली़ परंतु प्रशासनाकडून ठोस उपाय योजना करण्यात आली नाही़ त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गळती सुरू आहे़ नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही़ असे असताना लाखो लीटर पाणी वाया जात आहे़ हे पाणी वाया जाऊ नये अशी छावणी मंडळाची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे़ परंतु कार्यवाही होत नसून, जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना गळती थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे़ निवेदनावर बाळासाहेब पतके, प्रकाश लुणिया, शाम वाघस्कर, सुधीर कुलट, दिनेश बुºहाडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत़ (प्रतिनिधी)