शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

लाखो लीटर पाणी गटारीत

By admin | Updated: May 21, 2014 23:59 IST

अहमदनगर : औद्योगिक वसाहतीतून लष्कराकडे जाणार्‍या जलवाहिनीला भिंगार परिसरात गळती लागली असून, दररोज लाखो लीटर पाणी अक्षरश: गटारीत जात आहे़

अहमदनगर : औद्योगिक वसाहतीतून लष्कराकडे जाणार्‍या जलवाहिनीला भिंगार परिसरात गळती लागली असून, दररोज लाखो लीटर पाणी अक्षरश: गटारीत जात आहे़ एमआयडीसी प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली़ मात्र प्रशासनाकडून कार्यवाही होत नसून, ही गळती तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी भिंगार छावणी मंडळाच्या सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे केली आहे़ नागापूर औद्योगिक वसाहतीला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो़ औद्योगिक वसाहतीच्या जलवाहिनीतून लष्कराला पाणीपुरवठा करण्यात येतो़ त्यासाठी नागापूर ते नागरदेवळे येथील पाणी उपसा केंद्रांपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ ही जलवाहिनी भिंगारमधून जाते़ या जलवाहिनीला गेल्या ८ ते १० वर्षांपासून मोठ्याप्रमाणात गळती लागली आहे़ सुमारे १० अश्वशक्तीच्या विद्युत मोटारीइतके पाणी वाया जात आहे़ ही बाब नागापूर येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली़ याविषयी संबंधित अधिकार्‍यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत़ या विभागाकडून दुरुस्ती केली जाते़ मात्र पुन्हा ही गळती सुरू होते़ हे पाणी रस्त्यावर येत असल्याने मोठे खड्डे पडतात़परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघात होत आहेत़ पाणी गळती थांबविण्याची वेळोवेळी मागणी केली़ परंतु प्रशासनाकडून ठोस उपाय योजना करण्यात आली नाही़ त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गळती सुरू आहे़ नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही़ असे असताना लाखो लीटर पाणी वाया जात आहे़ हे पाणी वाया जाऊ नये अशी छावणी मंडळाची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे़ परंतु कार्यवाही होत नसून, जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना गळती थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे़ निवेदनावर बाळासाहेब पतके, प्रकाश लुणिया, शाम वाघस्कर, सुधीर कुलट, दिनेश बुºहाडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत़ (प्रतिनिधी)