अहमदनगर : औद्योगिक वसाहतीतून लष्कराकडे जाणार्या जलवाहिनीला भिंगार परिसरात गळती लागली असून, दररोज लाखो लीटर पाणी अक्षरश: गटारीत जात आहे़ एमआयडीसी प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली़ मात्र प्रशासनाकडून कार्यवाही होत नसून, ही गळती तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी भिंगार छावणी मंडळाच्या सदस्यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे़ नागापूर औद्योगिक वसाहतीला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो़ औद्योगिक वसाहतीच्या जलवाहिनीतून लष्कराला पाणीपुरवठा करण्यात येतो़ त्यासाठी नागापूर ते नागरदेवळे येथील पाणी उपसा केंद्रांपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ ही जलवाहिनी भिंगारमधून जाते़ या जलवाहिनीला गेल्या ८ ते १० वर्षांपासून मोठ्याप्रमाणात गळती लागली आहे़ सुमारे १० अश्वशक्तीच्या विद्युत मोटारीइतके पाणी वाया जात आहे़ ही बाब नागापूर येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली़ याविषयी संबंधित अधिकार्यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत़ या विभागाकडून दुरुस्ती केली जाते़ मात्र पुन्हा ही गळती सुरू होते़ हे पाणी रस्त्यावर येत असल्याने मोठे खड्डे पडतात़परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघात होत आहेत़ पाणी गळती थांबविण्याची वेळोवेळी मागणी केली़ परंतु प्रशासनाकडून ठोस उपाय योजना करण्यात आली नाही़ त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गळती सुरू आहे़ नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही़ असे असताना लाखो लीटर पाणी वाया जात आहे़ हे पाणी वाया जाऊ नये अशी छावणी मंडळाची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे़ परंतु कार्यवाही होत नसून, जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांना गळती थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे़ निवेदनावर बाळासाहेब पतके, प्रकाश लुणिया, शाम वाघस्कर, सुधीर कुलट, दिनेश बुºहाडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत़ (प्रतिनिधी)
लाखो लीटर पाणी गटारीत
By admin | Updated: May 21, 2014 23:59 IST