शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

डॉ. वीरेंद्र कुमार हंगामी लोकसभाध्यक्ष, दोनदा अध्यक्षपद पाच जणांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 08:28 IST

लोकसभेचे अध्यक्ष पुढील सभागृहात नसण्याची गेल्या १५ वर्षांपासूनची परंपरा यंदाही कायम राहिल्याने आता हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ खासदार वीरेंद्र कुमार काम पाहणार आहेत.

नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष पुढील सभागृहात नसण्याची गेल्या १५ वर्षांपासूनची परंपरा यंदाही कायम राहिल्याने आता हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ खासदार वीरेंद्र कुमार काम पाहणार आहेत. ते मध्यप्रदेशच्या टिकमकढ मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले आहेत. तेच सर्व निर्वाचित खासदारांना शपथ देतील. १६ व्या लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी यावेळी निवडणूक न लढविल्याने त्या १७ व्या लोकसभेमध्ये नाहीत. आतापर्यंतच्या लोकसभांमध्ये सदनाचे अध्यक्षपद दोनदा भूषविण्याची संधी पाच व्यक्तींना मिळाली आहे.वर्ष २०१४ मध्ये अस्तित्वात आलेल्या १४ व्या लोकसभेत आधीचे अध्यक्ष नव्हते. यंदाही ही परंपरा कायम आहे. सुमित्रा महाजन यांनी निवडणूक लढवली नव्हती. १३ व्या लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी २००४ मधील निवडणुकीत पराभूत झाले.त्यानंतर १४ व्या लोकसभेचे अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनीही निवडणूक लढविली नव्हती, तर पंधराव्या लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमार २०१४ च्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या आणि सोळाव्या लोकसभेमध्ये दिसल्या नाहीत.आतापर्यंत गणेश मावळणकर, शिवराज पाटील, मनोहर जोशी आणि सुमित्रा महाजन या मराठी व्यक्तींना या पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. पहिले अध्यक्ष गणेश मावळणकर हे द्विभाषिक मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व करीत होते.लोकसभेचे अध्यक्षपद दोन वेळा भूषविण्याची संधी आतापर्यंत पाच जणांना मिळाली. यामध्ये एम.ए. अय्यंगार (पहिली व दुसरी लोकसभा), गुरुदयालसिंह धिल्लाँ (चौथी व पाचवी लोकसभा), बलराम जाखड (सातवी व आठवी लोकसभा), जी.एम.सी. बालयोगी (बारावी व तेरावी लोकसभा) यांचा समावेशआहे.>संजीव रेड्डी यांचा आदर्शचौथ्या आणि सहाव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून एन. संजीव रेड्डी यांची निवड झाली होती. लोकसभेचे अध्यक्ष पक्षातीत असावेत, या संसदीय परंपरेचे पालन करण्यासाठी त्यांनी लगेचच कॉँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.त्यानंतर मात्र कोणीही या आदर्शाचे पालन केलेले नाही. रेड्डी यांना दोनदा राष्टÑपतीपदाची उमेदवारी मिळाली. पहिल्या वेळेस, १९६९ मध्ये त्यांचा पराभव झाला, तर दुसऱ्या वेळेस (१९७७) त्यांना राष्टÑपतीपद मिळाले.>रवी राय यांची मागणीभारताने ब्रिटनच्या संसदीय लोकशाहीनुसार संसदीय व्यवस्था ठेवली आहे. त्यामुळे तेथील अनेक प्रथा, परंपरांचे ब्रिटनमध्ये निवडणूक जाहीर झाल्यावर सदनाचे अध्यक्ष, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांची बैठक होते. त्यामध्ये अध्यक्ष कोठून निवडणूक लढणार हे ठरते. तिथे अन्य पक्ष आपला उमेदवार उभा करीत नाहीत. त्यामुळे अध्यक्षांचे पक्षातीत असणे अधोरेखित होते. भारतानेही याच परंपरेचे पालन करावे, अशी मागणी नवव्या लोकसभेचे अध्यक्ष रवी राय यांनी केली होती. अर्थात, ती मागणी कोणीच मान्य केली नाही.