शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. वीरेंद्र कुमार हंगामी लोकसभाध्यक्ष, दोनदा अध्यक्षपद पाच जणांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 08:28 IST

लोकसभेचे अध्यक्ष पुढील सभागृहात नसण्याची गेल्या १५ वर्षांपासूनची परंपरा यंदाही कायम राहिल्याने आता हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ खासदार वीरेंद्र कुमार काम पाहणार आहेत.

नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष पुढील सभागृहात नसण्याची गेल्या १५ वर्षांपासूनची परंपरा यंदाही कायम राहिल्याने आता हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ खासदार वीरेंद्र कुमार काम पाहणार आहेत. ते मध्यप्रदेशच्या टिकमकढ मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले आहेत. तेच सर्व निर्वाचित खासदारांना शपथ देतील. १६ व्या लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी यावेळी निवडणूक न लढविल्याने त्या १७ व्या लोकसभेमध्ये नाहीत. आतापर्यंतच्या लोकसभांमध्ये सदनाचे अध्यक्षपद दोनदा भूषविण्याची संधी पाच व्यक्तींना मिळाली आहे.वर्ष २०१४ मध्ये अस्तित्वात आलेल्या १४ व्या लोकसभेत आधीचे अध्यक्ष नव्हते. यंदाही ही परंपरा कायम आहे. सुमित्रा महाजन यांनी निवडणूक लढवली नव्हती. १३ व्या लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी २००४ मधील निवडणुकीत पराभूत झाले.त्यानंतर १४ व्या लोकसभेचे अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनीही निवडणूक लढविली नव्हती, तर पंधराव्या लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमार २०१४ च्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या आणि सोळाव्या लोकसभेमध्ये दिसल्या नाहीत.आतापर्यंत गणेश मावळणकर, शिवराज पाटील, मनोहर जोशी आणि सुमित्रा महाजन या मराठी व्यक्तींना या पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. पहिले अध्यक्ष गणेश मावळणकर हे द्विभाषिक मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व करीत होते.लोकसभेचे अध्यक्षपद दोन वेळा भूषविण्याची संधी आतापर्यंत पाच जणांना मिळाली. यामध्ये एम.ए. अय्यंगार (पहिली व दुसरी लोकसभा), गुरुदयालसिंह धिल्लाँ (चौथी व पाचवी लोकसभा), बलराम जाखड (सातवी व आठवी लोकसभा), जी.एम.सी. बालयोगी (बारावी व तेरावी लोकसभा) यांचा समावेशआहे.>संजीव रेड्डी यांचा आदर्शचौथ्या आणि सहाव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून एन. संजीव रेड्डी यांची निवड झाली होती. लोकसभेचे अध्यक्ष पक्षातीत असावेत, या संसदीय परंपरेचे पालन करण्यासाठी त्यांनी लगेचच कॉँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.त्यानंतर मात्र कोणीही या आदर्शाचे पालन केलेले नाही. रेड्डी यांना दोनदा राष्टÑपतीपदाची उमेदवारी मिळाली. पहिल्या वेळेस, १९६९ मध्ये त्यांचा पराभव झाला, तर दुसऱ्या वेळेस (१९७७) त्यांना राष्टÑपतीपद मिळाले.>रवी राय यांची मागणीभारताने ब्रिटनच्या संसदीय लोकशाहीनुसार संसदीय व्यवस्था ठेवली आहे. त्यामुळे तेथील अनेक प्रथा, परंपरांचे ब्रिटनमध्ये निवडणूक जाहीर झाल्यावर सदनाचे अध्यक्ष, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांची बैठक होते. त्यामध्ये अध्यक्ष कोठून निवडणूक लढणार हे ठरते. तिथे अन्य पक्ष आपला उमेदवार उभा करीत नाहीत. त्यामुळे अध्यक्षांचे पक्षातीत असणे अधोरेखित होते. भारतानेही याच परंपरेचे पालन करावे, अशी मागणी नवव्या लोकसभेचे अध्यक्ष रवी राय यांनी केली होती. अर्थात, ती मागणी कोणीच मान्य केली नाही.