शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

डाऊनलोड स्पीडमध्ये भारत नेपाळ, बांगलादेशच्याही मागे

By admin | Updated: December 23, 2016 08:57 IST

डाऊनलोड स्पीडमध्ये भारताचा 96 वा क्रमांक लागतो आणि सरासरी बॅण्डविड्थ उपलब्धतेत 105 व्या क्रमांकावर आहोत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - भारतात कॅशलेस आर्थिक व्यवहार नियमित होण्यासाठी अत्यंत महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे सर्वात चांगला इंटरनेट स्पीड आणि उत्तर सायबर सुरक्षा. नोटाबंदीमुळे सध्या डिजीटल आर्थिक व्यवहार करण्यावर भर देण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र डाऊनलोड स्पीडमध्ये भारताचा 96 वा क्रमांक लागतो आणि सरासरी बॅण्डविड्थ उपलब्धतेत 105 व्या क्रमांकावर आहोत. आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. डाऊनलोड स्पीडमध्ये आपण नेपाळ आणि बांगलादेशच्याही मागे आहोत. सायबर हल्ल्यांमध्ये मात्र आपण वरच्या स्थानावर आहोत. बँकांच्या आणि संवेदनशील, गुपित माहितीवर सहज डल्ला मारला जात आहे. 
 
(मुंबई, ठाणे आणि पुण्यात इंटरनेटवर सायबर हल्ला)
 
भारतामधील या परिस्थितीमुळे युझर्स आणि एक्स्पर्ट्स दोघेही चिंतेत आहेत. सायबर एक्स्पर्ट्सच्या म्हणण्याप्रमाणे 'भारतातील लोक सायबर व्यवहार करायला घाबरतात. कारण यामध्ये हॅकिंग होऊन आपली वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची भीती असते. आणि अशावेळी बँक आणि पोलीस मात्र कारवाई करण्याऐवजी हतबलता दाखवत असतात',. सायबर एक्स्पर्ट विजय मुखी यांनी 'आपल्यासारखी व्यक्तिदेखील ऑनलाइन व्यवहार करताना घाबरते', असं सांगितलं आहे.
 
(इंटरनेट स्पीड मोजणारे अ‍ॅप)
 
सुरक्षित ऑनलाइन व्यवहार व्हावा यासाठी सरकारकडूनच काही पावलं उचलण्याची गरज असल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे. सायबर हल्ल्यांविषयी जेव्हा बोललं जातं तेव्हा भारताचा सहावा क्रमांक लागतो. फक्त एका वर्षात सायबर हल्ले दुपटीने वाढले आहेत. 
 
बॅण्डविड्थ उपलब्धतेबद्दल बोलायचं गेल्यास श्रीलंका, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया यांच्यासह अनेक देश आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. सायबर तज्ञांनी डिजीटल व्यवहाराचं स्वागत केलं आहे, मात्र आयटीला मिळणा-या पायाभूत सुविधा आणि शिक्षणावरुन नाराजी व्यक्त केली आहे. 
 
'कार्डद्वारे व्यवहार केला जातो तेव्हा कोणीही आपला पिन क्रमांक किंवा ओटीपी कोणाला देऊ नये. लोक बनावट फोन करुन बँक किंवा सुरक्षेच्या कारणास्तव माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. कार्ड स्वाईप करताना आपल्यासमोर करत जा', असं नागपूरचे पोलीस उपायुक्त (सायबर क्राईम) सचिन पाटील यांनी सांगितलं आहे.