शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

चीनच्या मुद्द्यावर तुम्ही शांत का ? राहुल गांधींचा मोदींना सवाल

By admin | Updated: July 7, 2017 16:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौ-यावर असून राहुल गांधी यांनी त्यांच्या परराष्ट्र नीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. चीनच्या मुद्यावर तुम्ही शांत का ? असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौ-यावर असून राहुल गांधी यांनी त्यांच्या परराष्ट्र नीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भारत आणि चीनमध्ये सध्या सर्व काही आलेबल नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावर कसं काय भाष्य केलं नाही यावरुन राहुल गांधींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सिक्किमच्या सीमेलगत असलेल्या डोकलाम येथे चीनने सुरू केलेल्या रस्ता बांधणीवरून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गेले सुमारे महिनाभर तणातणी सुरू आहे. 
 
आणखी वाचा 
सिक्किमप्रश्नी कूटनीतीच्या माध्यमातूनच तोडगा, भारताची स्पष्ट भूमिका
तर सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ - चीनची उघड धमकी
मोदींचा इस्त्रायल दौरा आपल्या सुरक्षेसाठी धोका - पाकिस्तान मीडिया
"भारताचे कमकुवत पंतप्रधान", राहुल गांधींची मोदींवर टीका
 
16 जून रोजी चीनने डोकलाम येथे रस्ता बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र आठ दिवसानंतर ही गोष्ट उघडकीस आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जूनला अमेरिका दौ-यावर गेल्यापासून फार कमी वेळा भारतात थांबले आहेत. पंतप्रधान मोदींनी चीनचा उल्लेख केला नाही असं नाही, मात्र त्यात त्यांनी कुठेही सीमारेषेवर सुरु असलेल्या तणावाचा उल्लेख केला नाही. जर्मनीत होत असलेल्या जी 20 शिखर परिषदेमध्ये चीनला पुर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सोबतच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांना परिषदेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. 
 
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांनीदेखील भारताचं कौतुक करताना दहशतवादाविरोधात घेतलेली कठोर भूमिका आणि आर्थिक विकासात होत असलेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन केलं. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी 20 शिखर परिषदेसाठी जर्मनीतील हॅमबर्ग येथे आहेत. याआधी नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या इस्त्रायल दौ-यावर होते. अमेरिका दौ-यावरुन परतल्यानंतर काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात होते. त्यानंतर इस्त्रायल दौ-यावर गेले होते.
 
याआधी बुधवारीही राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा दुबळे पंतप्रधान म्हणून उल्लेख केला होता.  एच-1बी व्हिसा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल आणि अमेरिकेने ‘भारत प्रशासित काश्मीर’ असा उल्लेख केला असताना त्याचा विरोध न केल्याबद्दल राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दुबळे पंतप्रधान संबोधले होते. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे वक्तव्य केलं होतं.