शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पाणी वाया घालवू नका, प्रत्येक थेंब महत्वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Updated: May 22, 2016 11:46 IST

पाणी वाचवा, पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नका. पाणी वाचवणे आणि जंगलाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ - पाणी वाचवा, पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नका. पाणी वाचवणे आणि जंगलाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. मी प्रसारमाध्यमांना विनंती करीन की, त्यांनी पाणी वाचवण्यासाठी जनतेमध्ये जागरुकता निर्माण करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारच्या 'मन की बात' मध्ये बोलताना म्हणाले. 
 
दर महिन्याच्या चौथ्या रविवारी पंतप्रधान मन की बात मधून देशवासियांना संबोधित करतात. दुष्काळाचा सामना करण्यासाठी अनेक राज्यांनी चांगले उपाय योजले, गुजरात आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग केला असे मोदींनी सांगितले.  
 
दुष्काळग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली, सर्वांना एकत्र भेटण्याऐवजी मी प्रत्येकाची स्वतंत्र भेट घेतली असे मोदींनी सांगितले. आगामी रिओ ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर त्यांनी क्रीडा क्षेत्रातील घटनांचाही आढावा घेतला. देशाच्या क्रीडा क्षेत्रासमोर आज अनेक आव्हाने आहेत हे खरे आहे पण रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी चाललेल्या क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळेल असे वातावरण आपण तयार केले पाहिजे असे मोदी म्हणाले. देशात फुटबॉलची लोकप्रियताही वाढत आहे असे मोदींनी सांगितले. 
 
रोख रक्कमेचा वापर कसा कमी होईल यासाठी कॅशलेस सोसायटीच्या दिशेने जगाचा प्रवास सुरु आहे, जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.  कॅशलेस सोसायटीच्या संकल्पना यशस्वी ठरेल  असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.