शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

यूपीच्या भविष्याची नासाडी करू नका - मोदींची टीका

By admin | Updated: February 28, 2017 04:24 IST

उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नये, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे काढले.

महू (उत्तर प्रदेश) : भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसने काय वाट्टेल ते करावे, परंतु उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नये, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे काढले. ते निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. उत्तर प्रदेशात आपल्याला बहुमत मिळत नसेल, तर ते कोणालाच मिळू नये, असा प्रयत्न बसपा आणि सपा यांनी चालविला आहे, पण भाजपाला या राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल आणि आमचेच सरकार इथे स्थापन होईल, असा दावाही मोदी यांनी केला. मोदी म्हणाले की, ‘भाजपाला पराभूत करण्यासाठी तुम्हाला जे जे शक्य आहे ते करा, परंतु उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नका. समाजवादी पक्ष-काँग्रेस यांची मैत्री म्हणजे बुडते जहाज आहे,’ असे सांगून मोदी म्हणाले की, ‘अनेक वर्षे राज्याची उपेक्षा करणाऱ्या काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला मतदारांनी शिक्षा करावी. आमचा पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेवर येईल, त्या वेळी आघाडीतील आमच्या मित्र पक्षांना भाजपाच्या सरकारमध्ये सहभागी करून घेतले जाईल,’ असे नरेंद्र मोदी म्हणाले. ‘पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान असताना पूर्व उत्तर प्रदेशच्या विकासासाठी समिती स्थापन केली होती. तिचा अहवाल ५० वर्षे पडून होता. काँग्रेसच्या सरकारांनी या ५0 वर्षांत काहीच केले नाही. आता आम्ही त्याच्यावर काम सुरू केले आहे,’ असा दावा मोदी यांनी केला. ‘पूर्व उत्तर प्रदेशला पुरेसे पाणी आणि वीज यांचा पुरवठा केला जाईल आणि या मागास राहिलेल्या भागाची आन, बान आणि शान पुन्हा मिळवून दिली जाईल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले. रविवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोदी यांनी केलेल्या दिवाळी-रमझान भेदभाव वाक्याबद्दल जोरदार टीका केली होती. >मुस्लिमांना उमेदवारी द्यायला हवी होतीउत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मुस्लिमांना उमेदवारी देणे आवश्यक होते, असे प्रतिपादन भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी येथे केले. उत्तर प्रदेशात बसपा आणि सपाने अनेक मुस्लीम उमेदवार दिले असून, तेथील मुस्लिमांचे प्रमाणही १९ टक्के आहे.पाचव्या टप्प्यात ५७ टक्के मतदानउत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी शांततेत मतदान पार पडले. या टप्प्यात पाच वाजेपर्यंत सुमारे ५७.३६ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मतदान संपण्याच्या वेळी अनेक केंद्रांसमोर मतदारांच्या रांगा होत्या. ते पाहता, ६0 टक्के मतदान होईल, असा अंदाज आहे. मतदानाचे दोन टप्पे शिल्लक आहेत. आधीच्या चार टप्प्यांत ६१ ते ६५ टक्के मतदान झाले आहे. >समाजवादी पक्ष-काँग्रेस यांची मैत्री म्हणजे बुडते जहाज आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी तुम्हाला जे जे शक्य आहे ते करा, परंतु उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नका.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान