शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

यूपीच्या भविष्याची नासाडी करू नका - मोदींची टीका

By admin | Updated: February 28, 2017 04:24 IST

उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नये, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे काढले.

महू (उत्तर प्रदेश) : भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसने काय वाट्टेल ते करावे, परंतु उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नये, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे काढले. ते निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. उत्तर प्रदेशात आपल्याला बहुमत मिळत नसेल, तर ते कोणालाच मिळू नये, असा प्रयत्न बसपा आणि सपा यांनी चालविला आहे, पण भाजपाला या राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल आणि आमचेच सरकार इथे स्थापन होईल, असा दावाही मोदी यांनी केला. मोदी म्हणाले की, ‘भाजपाला पराभूत करण्यासाठी तुम्हाला जे जे शक्य आहे ते करा, परंतु उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नका. समाजवादी पक्ष-काँग्रेस यांची मैत्री म्हणजे बुडते जहाज आहे,’ असे सांगून मोदी म्हणाले की, ‘अनेक वर्षे राज्याची उपेक्षा करणाऱ्या काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला मतदारांनी शिक्षा करावी. आमचा पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेवर येईल, त्या वेळी आघाडीतील आमच्या मित्र पक्षांना भाजपाच्या सरकारमध्ये सहभागी करून घेतले जाईल,’ असे नरेंद्र मोदी म्हणाले. ‘पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान असताना पूर्व उत्तर प्रदेशच्या विकासासाठी समिती स्थापन केली होती. तिचा अहवाल ५० वर्षे पडून होता. काँग्रेसच्या सरकारांनी या ५0 वर्षांत काहीच केले नाही. आता आम्ही त्याच्यावर काम सुरू केले आहे,’ असा दावा मोदी यांनी केला. ‘पूर्व उत्तर प्रदेशला पुरेसे पाणी आणि वीज यांचा पुरवठा केला जाईल आणि या मागास राहिलेल्या भागाची आन, बान आणि शान पुन्हा मिळवून दिली जाईल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले. रविवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोदी यांनी केलेल्या दिवाळी-रमझान भेदभाव वाक्याबद्दल जोरदार टीका केली होती. >मुस्लिमांना उमेदवारी द्यायला हवी होतीउत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मुस्लिमांना उमेदवारी देणे आवश्यक होते, असे प्रतिपादन भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी येथे केले. उत्तर प्रदेशात बसपा आणि सपाने अनेक मुस्लीम उमेदवार दिले असून, तेथील मुस्लिमांचे प्रमाणही १९ टक्के आहे.पाचव्या टप्प्यात ५७ टक्के मतदानउत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी शांततेत मतदान पार पडले. या टप्प्यात पाच वाजेपर्यंत सुमारे ५७.३६ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मतदान संपण्याच्या वेळी अनेक केंद्रांसमोर मतदारांच्या रांगा होत्या. ते पाहता, ६0 टक्के मतदान होईल, असा अंदाज आहे. मतदानाचे दोन टप्पे शिल्लक आहेत. आधीच्या चार टप्प्यांत ६१ ते ६५ टक्के मतदान झाले आहे. >समाजवादी पक्ष-काँग्रेस यांची मैत्री म्हणजे बुडते जहाज आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी तुम्हाला जे जे शक्य आहे ते करा, परंतु उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नका.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान