शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

सरदारजींवर जोक्स करायचे की नाही?

By admin | Updated: October 30, 2015 22:02 IST

लोकांना हसविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विनोदांमध्ये शीख समुदायाला लक्ष्य बनविण्यात येत असल्याचा आरोप करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी शुक्रवारी दाखल करून घेतली.

नवी दिल्ली : लोकांना हसविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विनोदांमध्ये शीख समुदायाला लक्ष्य बनविण्यात येत असल्याचा आरोप करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी शुक्रवारी दाखल करून घेतली.महिला वकील हरविंदर चौधरी यांनी ही जनहित याचिका केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, शीख समुदाय हा आपल्या निखळ विनोदबुद्धीसाठी ओळखला जातो आणि ते सुद्धा या विनोदाचा आनंद लुटत असतात. आपण खुशवंतसिंग यांचे विनोद ऐकले असतील. हा केवळ एक मनोरंजनाचा भाग असून आपण त्यावर बंदी का आणू इच्छिता? बहुतांश विनोदांमध्ये शीख समुदायाच्या लोकांना मूर्ख अथवा कमी बुद्धी असल्याचे दर्शविण्यात येत असून हा प्रकार अनुचित आहे, अशी भावना याचिकाकर्त्याने व्यक्त केली असून असे विनोद प्रकाशित करणाऱ्या ५००० वर वेबसाईटस्वर निर्बंध अथवा वेबफिल्टर लावण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. सरदारांवरील विनोदांमुळे आमच्या मुलांना अपमान आणि लाज वाटते, असे चौधरी यांचे म्हणणे आहे.पंतप्रधानांनी बिहारी लोक बुद्धिमान असतात असे म्हटले होते. यावरून इतर समुदाय बुद्धिमान नाही, असे संकेत मिळतात, असे याचिकाकर्त्या म्हणाल्या. यावर चिंता करू नका आम्ही पंजाबला जाऊ तेव्हा तेथे शीख बुद्धिमान असतात असे सांगू,अशी टिप्पणी पीठाने केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)