शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मतदान करत नाहीत, मग सरकारला दोषी ठरवण्याचा अधिकार नाही - सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: February 6, 2017 10:03 IST

जर तुम्ही मतदान करत नाही, तर तुम्हाला सरकारला प्रश्न विचारण्याचा किंवा दोष देण्याचा अधिकार नाही', असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 6 - 'जर तुम्ही मतदान करत नाही, तर तुम्हाला सरकारला प्रश्न विचारण्याचा किंवा दोष देण्याचा अधिकार नाही', असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने आपले मत नोंदवले आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या धनेश इरधन यांनी सरकार अतिक्रमण काढण्याबाबत काहीच करत नाही असे सांगत, अतिक्रमण हटवण्यासंदर्भात व्यापक आदेश देण्याची मागणीही केली. 
 
यावेळी कोर्टाने त्यांना ' तुम्ही मतदान करता का?' असा प्रश्न विचारला. त्यावर 'मतदान करत नाही', असे उत्तर इरधन यांनी दिले. यावर कोर्टाने संताप व्यक्त केला आणि मतदान करत नाही, तर सरकारला दोष देण्याचा अधिकार नाही', अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारले.   
(संसदेत दिलेल्या 70 टक्के आश्वासनांचा सरकारला विसर)
 
तसेच 'सुप्रीम कोर्ट अतिक्रमणांसंबंधी व्यापक आदेश जारी करू शकत नाही कारण ही प्रकरणं संबंधित राज्यांशी जोडली गेली आहेत. त्यामुळे त्या राज्यांच्या हायकोर्टात याचिका दाखल करावी लागेल',  असे सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी इरधन यांच्या याचिकेबाबत सांगितले. 
(कुंकू अखंड महाराष्ट्राचं व मंगळसूत्र दुस-याचे, सामनातून मुख्यमंत्र्यांवर ताशेरे)
 
शिवाय, 'तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला दोषी ठरवू शकत नाही. एखादा व्यक्ती मतदान करत नसेल तर त्याला सरकारविरोधात प्रश्न उपस्थित करण्याचा मुळीच अधिकार नाही', असेही कोर्टाने त्यांना ठणकावले.