शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

यंत्रे नको, मतपत्रिकाच वापरा

By admin | Updated: April 11, 2017 00:42 IST

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांत ईव्हीएम्समध्ये छेडछाड झाल्याच्या आरोपानंतर विरोधी पक्षांनी हा प्रश्न संयुक्तरित्या निवडणूक आयोगाकडे नेला.

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांत ईव्हीएम्समध्ये छेडछाड झाल्याच्या आरोपानंतर विरोधी पक्षांनी हा प्रश्न संयुक्तरित्या निवडणूक आयोगाकडे नेला. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊ न आगामी निवडणुकांमध्ये निम्म्या मतपत्रिका आणि व्हीव्हीपीएटीचा (मतदाराला त्याने कोणाला मत दिले त्याची चिठ्ठी) वापर केला जावा, अशी मागणी केली. विरोधी पक्षांचे नेते मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊ नही त्यांच्यापुढे आपले म्हणणे सादर करणार आहेत.विरोधी पक्षांचे नेते सोमवारी संसदेत भेटले. यावर्षी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत निम्म्या मतपत्रिका व निम्म्या व्हीव्हीपीएटीचा वापर करावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली. ही बैठक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या दालनात झाली. यावेळी अहमद पटेल, आनंद शर्मा, कपिल सिबल, विवेक टंखा, जनता दलाचे (यु) अली अन्वर अन्सारी, तृणमूलचे सुखेंदू शेखर रॉय, बसपचे सतीश मिश्र व सपाचे नीरज शेखर आदी उपस्थित होते.केजरीवाल यांचा आरोप; आयोग धृतराष्ट्रासारखा वागतोय- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील (ईव्हीएम) कथित छेडछाडीच्या आरोपांवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगावर सोमवारी जोरदार हल्ला केला. हा आयोग ध्रृतराष्ट्रासारखा वागत असून आपल्या मुलाला (भाजप) विजयासाठी मदत करीत आहे, असा दावा केला. - आयोगाचा एकमेव हेतू हा निवडणुका होत असलेल्या राज्यांत भाजपला सत्तेत आणण्याचा आहे आणि म्हणूनच आयोग सदोष ईव्हीएम्सच्या चौकशीच्या विनंतीकडे लक्ष देत नाही, असा आरोपही त्यांनी केला. - ध्रुतराष्ट्र आपला मुलगा दुर्योधनाला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा तसेच निवडणूक आयोग साम, दाम, दंड आणि भेद अशा सर्व मार्गांनी भाजपला सत्ता मिळवून देण्याची मदत करीत आहे, असे ते म्हणाले. ही यंत्रे दणकट असून त्यात काहीही बदल करता येत नसल्याचा खुलासा रविवारी आयोगाने केला होता.