शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"वंदे मातरम म्हणा नाहीतर चालायला लागा"

By admin | Updated: March 30, 2017 09:14 IST

राष्ट्रीय गीत वंदे मातरम म्हणा अन्यथा तुम्हाला संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवेश किंवा उपस्थित राहू दिलं जाणार नाही अशी घोषणा मेरठ महापालिका आयुक्त हरिकांत अहलुवालिया यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 30 - राष्ट्रीय गीत वंदे मातरम म्हणा अन्यथा तुम्हाला संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवेश किंवा उपस्थित राहू दिलं जाणार नाही अशी घोषणा मेरठ महापालिका आयुक्त हरिकांत अहलुवालिया यांनी केली आहे. महापालिकेच्या सर्व सदस्यांना हा नियम लागू करण्यात आला असून पालन न करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ही घोषणा करण्यात आल्यानंतर संचालक मंडळातील काही मुस्लिम सदस्यांनी आपला विरोध दर्शवत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती देत वंदे मातरम म्हणणं अनिवार्य नसल्याचं सांगितलं. 
 
उत्तर प्रदेशात भाजपा सत्तेवर आल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच संचालक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला. 
 
मेरठ महापालिकेत अगोदपासूनच राष्ट्रीय गीत सादरीकरण होत आहे. मात्र ज्यांना सहभागी होण्याची इच्छा नसे त्यांना हॉल सोडून जाण्याची परवानगी होती. राष्ट्रीय गीत संपल्यानंतर त्यांना पुन्हा हॉलमध्ये प्रवेश दिला जाई. मात्र मंगळवारी जेव्हा काही नगरसेवकांनी हॉल सोडून जाण्यास सुरुवात केली तेव्हा भाजपा सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावच लागेल अशा घोषणा भाजपा सदस्यांकडून करण्यात आल्या. 
यानंतर महापालिकेतील वातावरण चांगलंच तापलं आणि शाब्दिक चकमक सुरु झाली. यानंतर महापालिका आयुक्त हरिकांत अहलुवालिया यांनी मध्यस्थी करत वंदे मातरम म्हणायचं की नाही यासाठी आवाजी मतदान घेत ठराव संमत केला. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून मंजूरी मिळणं गरजेचं आहे. 
 
"आपल्या मातृभूमीचा असलेला आदर दाखवण्याचा हा एक मार्ग आहे. जेव्हा महापालिकेत मुस्लिम आयुक्त होते तेव्हाही वंदे मातरम म्हटलं जायचं. मग आता हा सगळा वाद कशासाठी ?", असा सवाल आयुक्त हरिकांत अहलुवालिया यांनी विचारला आहे. 
 
80 सदस्यांच्या महपालिकेत भाजपाचे 45 नगरसेवक असून 25 मुस्लिम नगरसेवक आहेत. महापालिकेतील मुस्लिम नगरसेवक दिवान शरीफ यांनी "वातावरण खूपच तापलं असल्याने आम्ही सुरक्षितपणे बाहेर पडलो. आम्हाला खुप दुख: झालं आहे. आमच्या पुर्वजांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे", अशी प्रतिक्रिया दिली आहे.