शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

"वंदे मातरम म्हणा नाहीतर चालायला लागा"

By admin | Updated: March 30, 2017 09:14 IST

राष्ट्रीय गीत वंदे मातरम म्हणा अन्यथा तुम्हाला संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवेश किंवा उपस्थित राहू दिलं जाणार नाही अशी घोषणा मेरठ महापालिका आयुक्त हरिकांत अहलुवालिया यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 30 - राष्ट्रीय गीत वंदे मातरम म्हणा अन्यथा तुम्हाला संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवेश किंवा उपस्थित राहू दिलं जाणार नाही अशी घोषणा मेरठ महापालिका आयुक्त हरिकांत अहलुवालिया यांनी केली आहे. महापालिकेच्या सर्व सदस्यांना हा नियम लागू करण्यात आला असून पालन न करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ही घोषणा करण्यात आल्यानंतर संचालक मंडळातील काही मुस्लिम सदस्यांनी आपला विरोध दर्शवत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती देत वंदे मातरम म्हणणं अनिवार्य नसल्याचं सांगितलं. 
 
उत्तर प्रदेशात भाजपा सत्तेवर आल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच संचालक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला. 
 
मेरठ महापालिकेत अगोदपासूनच राष्ट्रीय गीत सादरीकरण होत आहे. मात्र ज्यांना सहभागी होण्याची इच्छा नसे त्यांना हॉल सोडून जाण्याची परवानगी होती. राष्ट्रीय गीत संपल्यानंतर त्यांना पुन्हा हॉलमध्ये प्रवेश दिला जाई. मात्र मंगळवारी जेव्हा काही नगरसेवकांनी हॉल सोडून जाण्यास सुरुवात केली तेव्हा भाजपा सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावच लागेल अशा घोषणा भाजपा सदस्यांकडून करण्यात आल्या. 
यानंतर महापालिकेतील वातावरण चांगलंच तापलं आणि शाब्दिक चकमक सुरु झाली. यानंतर महापालिका आयुक्त हरिकांत अहलुवालिया यांनी मध्यस्थी करत वंदे मातरम म्हणायचं की नाही यासाठी आवाजी मतदान घेत ठराव संमत केला. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून मंजूरी मिळणं गरजेचं आहे. 
 
"आपल्या मातृभूमीचा असलेला आदर दाखवण्याचा हा एक मार्ग आहे. जेव्हा महापालिकेत मुस्लिम आयुक्त होते तेव्हाही वंदे मातरम म्हटलं जायचं. मग आता हा सगळा वाद कशासाठी ?", असा सवाल आयुक्त हरिकांत अहलुवालिया यांनी विचारला आहे. 
 
80 सदस्यांच्या महपालिकेत भाजपाचे 45 नगरसेवक असून 25 मुस्लिम नगरसेवक आहेत. महापालिकेतील मुस्लिम नगरसेवक दिवान शरीफ यांनी "वातावरण खूपच तापलं असल्याने आम्ही सुरक्षितपणे बाहेर पडलो. आम्हाला खुप दुख: झालं आहे. आमच्या पुर्वजांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे", अशी प्रतिक्रिया दिली आहे.